शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

सहा गावात क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: June 8, 2014 00:05 IST

सद्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे. नागरिकांना गावाच्या बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. काही गावात ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाद्वारे

अमोल सोटे - आष्टी(शहीद)सद्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे. नागरिकांना गावाच्या बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. काही गावात ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.आष्टी(श.) तालुक्यातील थार, बेलोरा(खुर्द), पंचाळा, हरिषवाडा, चामला, किन्ही या सहा गावात क्षाराचे प्रमाण अधिक आहे. नळाच्या पाण्यातून येणारे पाणी जड आहे. पाणी साठविण्याची भांडी, कुलर, अँल्युमिनिअमच्या वस्तुला मोठ्या प्रमाणात क्षार चढत असतो. माणसाच्या शरीरामध्ये क्षारयुक्त पाणी विविध आजार निर्माण करीत असते. थार गावात पाणीपुरवठा करणारी सर्व उपलब्ध साधने संपुष्टात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गावापासून दोन किमी अंतरावर शेतात असणार्‍या विहिरीतून पाणी आणणे पसंत केले आहे. तापल्या उन्हातही पाणी आणायला दुरवर जावे लागत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.बेलोरा(खुर्द) गावात क्षारयुक्त व दूषित पाण्यामुळे आतापर्यंत ३ रुग्णांना डेंग्यू झाला आहे. प्रशासनाने उपाययोजना करण्याचे सोडून थातूर-मातूर कारवाई केल्याचे दाखविल्या जात आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. पाणीपुरवठय़ात तात्काळ सुधारणा करण्याची मागणी बेलोरावासियांनी वरिष्ठांकडे केली आहे. तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेला जलशुद्धीकरण केंद्र नाही. त्यामुळे नदी, विहिरी यावरुन थेट पाणीपुरवठा केल्या जात आहे. शेवाळ, चामडोक व इतर किटक, अळ्या पाण्यातून येत आहे. ब्लिचिंग पावडर प्रमाणीत केल्यानुसार टाकल्या जात नाही. त्यामुळे दूषित व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.हरिषवाडा गाव उंचावर आहे. येथे दरवर्षी पाणीटंचाई असते. गावाला नदीच्या पात्रातून व विहिरीद्वारे पाणीपुरवठा केल्या जातो. या पाण्याचा वास येत असल्यामुळे नागरिक प्रचंड रोष व्यक्त करीत आहे. चामला गावात खाजगी विहिरीवरुन पाणी पुरवठा सुरु आहे. या गावात गवळी समाज मोठय़ा प्रमाणात आहे. दही, ताक, तुप, दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह केल्या जातो. मात्र पाण्याची टंचाई व दूषित पाणी गावकर्‍यांना सतावत आहे. ग्रामीण भागात आरोग्याची सुविधा नसल्यामुळे तालुक्याला यावे लागते. किन्ही गाव डोंगरमाथ्यवर आहे. लाल माती, मुरुम असलेल्या भागात शुद्ध पाणी मिळण्याची अपेक्षा नाही. गावाला लागून नदी आहे. या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो मात्र दूषित पाणी असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पंचाळा गावातही पाण्याचा हाहाकार आहे. गावाला लागून कुठलीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक दुरवरुन शेतामधून पाणी आणतात. या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे आजारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.