शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

परतीच्या पावसाने कपाशीचे उत्पन्न लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST

दरवर्षी शेतकऱ्यांचा दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरी येतो. परंतु यावर्षी मात्र शितदहीपलीकडे अद्याप कापसाचा वेचा सुरू झाला नाही. परतीच्या पाऊस, ढगाळ वातावरण, रोगराई याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागदरा, शिरपूर, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, दहेगाव, पाचेगाव, खुबगाव, लाडेगाव, देऊरवाड्यासह तालुक्यातील ७० गावांतील शेतशिवारात ही परिस्थिती आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची व्यथा कोण समजणार? : शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : दरवर्षी दसऱ्याला पांढरे सोने शेतकऱ्यांच्या घरात येते. यावर्षी पहिल्यांदा सतत एक महिना त्यानंतर २८ आॅक्टोबर व अगोदर झालेल्या परतीच्या पावसाने कपाशी पीक धोक्यात येऊन पिवळे पडले. त्यात ढगाळ वातावरणाने पावसाची बोंडे फुटली नाही. परिणामी, दिवाळी होऊनही कापसाची आवक अद्याप शेतकऱ्यांच्या घरात सुरू झालेली नाही. परतीच्या पावसाने कपाशी उत्पन्न लांबणीवर गेल्याने शेतकरी नैराश्याच्या खाईत लोटला गेला आहे. मात्र, त्याची ही अवस्था कोण समजून घेणार, हा प्रश्न आहे.आर्वी तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस, त्यानंतर ढगाळ वातावरण त्यामुळे कपाशी पिकाला दिवसाला १० ते १२ तासांच्या सूर्यप्रकाशाची गरज असताना शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली.तालुक्यात कपाशीची २३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी असून तालुका कॉटनचा हुकमी पट्टा म्हणून ओळखला जातो. जवळपास १५ ते २० हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक पिवळे पडून बोंडे सडली. अतिपावसाने कपाशीला बुरशीची लागण झाल्याने दरवर्षी दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कपाशीची गंजी व आवक .दिसायची ती यावर्षी दिवाळीनंतर १० दिवस उलटूनही दिसत नाही. महागड्या फवारण्या, खते, सततच्या पावसाने वाढलेले तण यामुळे यावर्षी कपाशी पिकाचा खर्च दुप्पट झाला आहे. दिवाळी उलटूनही कापूस घरात येत नसल्याने झालेला खर्च तरी निघणार का? या विवंचनेत शेतकरी आहेत.दरवर्षी शेतकऱ्यांचा दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरी येतो. परंतु यावर्षी मात्र शितदहीपलीकडे अद्याप कापसाचा वेचा सुरू झाला नाही. परतीच्या पाऊस, ढगाळ वातावरण, रोगराई याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागदरा, शिरपूर, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, दहेगाव, पाचेगाव, खुबगाव, लाडेगाव, देऊरवाड्यासह तालुक्यातील ७० गावांतील शेतशिवारात ही परिस्थिती आहे.शासनाने नुकसानभरपाऊ देण्याबाबत आदेश काढले. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सोयाबीनपाठोपाठ कापूस उत्पादक शेतकरीही यावर्षी संकटात सापडला आहे. अनेक भागात नोव्हेंबर महिना उजाडूनही वेचणीला सुरुवात झाली नाही. लावलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी निराश आहेत. शासनाने तातडीने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.माझ्याकडे ४ एकर कापूस लागवड आहे. परंतु अद्यापही शितादहीशिवाय कापूस वेचणीला सुरुवात झाली नाही. दरवर्षी दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरात भरून राहतो. मात्र यावर्षी सततच्या पावसाने कापसाची आवक मंदावली, झालेला खर्चही निघणार नाही. नुकसानीची पाहणी करण्यासाठी अद्याप कुणीही आले नाही.- भाष्कर चौकोने, कापूस उत्पादक शेतकरी, दहेगाव (मुस्तफा), ता. आर्वी.

टॅग्स :cottonकापूस