शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

परतीच्या पावसाने कपाशीचे उत्पन्न लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST

दरवर्षी शेतकऱ्यांचा दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरी येतो. परंतु यावर्षी मात्र शितदहीपलीकडे अद्याप कापसाचा वेचा सुरू झाला नाही. परतीच्या पाऊस, ढगाळ वातावरण, रोगराई याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागदरा, शिरपूर, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, दहेगाव, पाचेगाव, खुबगाव, लाडेगाव, देऊरवाड्यासह तालुक्यातील ७० गावांतील शेतशिवारात ही परिस्थिती आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची व्यथा कोण समजणार? : शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : दरवर्षी दसऱ्याला पांढरे सोने शेतकऱ्यांच्या घरात येते. यावर्षी पहिल्यांदा सतत एक महिना त्यानंतर २८ आॅक्टोबर व अगोदर झालेल्या परतीच्या पावसाने कपाशी पीक धोक्यात येऊन पिवळे पडले. त्यात ढगाळ वातावरणाने पावसाची बोंडे फुटली नाही. परिणामी, दिवाळी होऊनही कापसाची आवक अद्याप शेतकऱ्यांच्या घरात सुरू झालेली नाही. परतीच्या पावसाने कपाशी उत्पन्न लांबणीवर गेल्याने शेतकरी नैराश्याच्या खाईत लोटला गेला आहे. मात्र, त्याची ही अवस्था कोण समजून घेणार, हा प्रश्न आहे.आर्वी तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस, त्यानंतर ढगाळ वातावरण त्यामुळे कपाशी पिकाला दिवसाला १० ते १२ तासांच्या सूर्यप्रकाशाची गरज असताना शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली.तालुक्यात कपाशीची २३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी असून तालुका कॉटनचा हुकमी पट्टा म्हणून ओळखला जातो. जवळपास १५ ते २० हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक पिवळे पडून बोंडे सडली. अतिपावसाने कपाशीला बुरशीची लागण झाल्याने दरवर्षी दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कपाशीची गंजी व आवक .दिसायची ती यावर्षी दिवाळीनंतर १० दिवस उलटूनही दिसत नाही. महागड्या फवारण्या, खते, सततच्या पावसाने वाढलेले तण यामुळे यावर्षी कपाशी पिकाचा खर्च दुप्पट झाला आहे. दिवाळी उलटूनही कापूस घरात येत नसल्याने झालेला खर्च तरी निघणार का? या विवंचनेत शेतकरी आहेत.दरवर्षी शेतकऱ्यांचा दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरी येतो. परंतु यावर्षी मात्र शितदहीपलीकडे अद्याप कापसाचा वेचा सुरू झाला नाही. परतीच्या पाऊस, ढगाळ वातावरण, रोगराई याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागदरा, शिरपूर, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, दहेगाव, पाचेगाव, खुबगाव, लाडेगाव, देऊरवाड्यासह तालुक्यातील ७० गावांतील शेतशिवारात ही परिस्थिती आहे.शासनाने नुकसानभरपाऊ देण्याबाबत आदेश काढले. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सोयाबीनपाठोपाठ कापूस उत्पादक शेतकरीही यावर्षी संकटात सापडला आहे. अनेक भागात नोव्हेंबर महिना उजाडूनही वेचणीला सुरुवात झाली नाही. लावलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी निराश आहेत. शासनाने तातडीने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.माझ्याकडे ४ एकर कापूस लागवड आहे. परंतु अद्यापही शितादहीशिवाय कापूस वेचणीला सुरुवात झाली नाही. दरवर्षी दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरात भरून राहतो. मात्र यावर्षी सततच्या पावसाने कापसाची आवक मंदावली, झालेला खर्चही निघणार नाही. नुकसानीची पाहणी करण्यासाठी अद्याप कुणीही आले नाही.- भाष्कर चौकोने, कापूस उत्पादक शेतकरी, दहेगाव (मुस्तफा), ता. आर्वी.

टॅग्स :cottonकापूस