शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

कापूस खरेदीस नकार; शेतकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

परतीच्या पावसामुळे बाजारात विकायला आलेल्या कापसात काही प्रमाणात आद्रता आहे. त्यातच सीसीआयची खरेदी सुरू झाल्याने चांगल्या भावाच्या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे; पण सीसीआयच्या म्हणण्यानुसार कापसातील आठ टक्क्यापर्यंतची आद्रता गृहीत धरून प्रती क्विंटल ५ हजार ५५० रूपये पर्यंतचे भाव देण्याचे ठरले आहे.

ठळक मुद्देरास्तारोको : सीसीआयने सरसकट ५,५५० भाव द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : कापसाची आद्रता जास्त असल्याने सीसीआयच्यावतीने कापूस खरेदीस नकार देण्यात आला. याच शेतकरी विरोधी निर्णयाच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी वर्धा-यवतमाळ मार्गावर सुमारे अर्धातास रास्तारोको आंदोलन केले. सीसीआयने शेतकऱ्यांच्या कापसाला सरसकट प्रती क्विंटल ५,५५० रुपये भाव द्यावा, अशी मागणी या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी रेटली होती. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे आणि पोलिसांच्या मध्यस्थीअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.परतीच्या पावसामुळे बाजारात विकायला आलेल्या कापसात काही प्रमाणात आद्रता आहे. त्यातच सीसीआयची खरेदी सुरू झाल्याने चांगल्या भावाच्या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे; पण सीसीआयच्या म्हणण्यानुसार कापसातील आठ टक्क्यापर्यंतची आद्रता गृहीत धरून प्रती क्विंटल ५ हजार ५५० रूपये पर्यंतचे भाव देण्याचे ठरले आहे. यानंतर आठ ते बारा टक्क्यापर्यंतच्या आद्रतेसाठी क्विंटल मागे ५५ रूपये कमी देण्याचे तसेच बारा टक्क्याचे वरती आद्रता असलेल्या कापसाची खरेदी न करण्याचे धोरण ठरले आहे. शासनाचे निर्देशानुसार हे धोरण राबत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या कापसात १४ ते १६ टक्क्यापर्यंत आद्रता असल्याचे कारण पुढे करीत कापूस खरेदी करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे शेतकºयांचाही पार चढला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच सभापती खडसे व पोलिसांनी मध्यस्ती करीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कापसाची आद्रता तीन ठिकाणी तपासण्याच्या सूचना देत आद्रतेबाबचे धोरण ठरल्याचे सांगितले. सीसीआयने शेतकऱ्यांच्या कापसाला सरसकट प्रती क्विंटल ५ हजार ५५० रूपयांचा भाव द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटली होती. या आंदोलनामुळे काही काळाकरिता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार झाल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :StrikeसंपFarmer strikeशेतकरी संप