शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाचा शिक्षकच वारसा व्हावा

By admin | Updated: February 22, 2015 01:55 IST

केवळ शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, त्यांचे वेतन व भत्ते, सेवा सुरक्षा आदींकरिता अधिवेशने घेऊन समारंभ साजरे करण्यापेक्षा यापूढे जाऊन शिक्षणाच्या सर्व बाबीवर

हिंगणघाट : केवळ शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, त्यांचे वेतन व भत्ते, सेवा सुरक्षा आदींकरिता अधिवेशने घेऊन समारंभ साजरे करण्यापेक्षा यापूढे जाऊन शिक्षणाच्या सर्व बाबीवर सर्वंकष चर्चा झाली पाहिजे. समाजातील सर्व घटकापर्यंत शिक्षणाविषयी चेतना निर्माण झाली पाहिजे. वैयक्तिक प्रश्नाबरोबर कौटुंबिक, सामाजिक जाणीव निर्माण होणे, ही आजची गरज आहे. यासाठी शैक्षणिक व सामाजिक उत्थानाचा मार्ग असलेले गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण वारसा रूपाने भावी पिढीला प्रदान करणे हे शिक्षकांचे नैतिक कर्तव्य आहे. नव्हे तर गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणाचा शिक्षकच वारसा व्हावे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ यशवंत मनोहर यांनी केले़प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी राजे यांच्या जयंतीदिनी गुरूवारी स्थानिक कलोडे सभागृहात पाचची शिक्षण हक्क परिषद घेण्यात आली़ यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते़ डॉ. यशवंत मनोहर पूढे म्हणाले की, परिघ आणि परिघाबाहेरील लोकांना शिक्षण नाकारण्याचेच डावपेच आज आखले जात आहेत़ त्याची कटाक्षाने अंमलबजावणी केली जात आहे. गोर-गरिबांच्या वस्त्यांकडे धावणारे शिक्षणाचे ओघ अडविले व आटवले जात आहे. सरंमजामदार व भांडवलदारांच्या तालावर आणि त्यांच्या हितसंबंधीच्या ठेक्यावर थिरकणारे शासनही खासगीकरणाच्या नावाखाली गरिबांना शिक्षणाच्या परिघाबाहेर ढकलायला लागले. गुणवत्ता व बुद्धीमत्ता असणाऱ्यासंचे शिक्षण नाही तर ज्यांच्याकडे पैसा त्यांचे शिक्षण, असे धनदांडग्यांना म्हणजे शिक्षकांच्या हिताचे समिकरण झाले आहे़ गोर-गरिबांना मेहनतीच्या वा बुद्धीच्या स्पर्धेत उतरता येईल; पण त्यांना पैशाच्या स्पर्धेत टिकता येणे अवघड आहे. यामुळे आज सरंमजामदार व भांडवलदारांच्या बळावर राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शिक्षण महाग केले. शिक्षण ही क्रांतीकारी शक्ती गरीबांपर्यंत पोहोचू नये, गोरगरिबांच्या मुक्त होण्याच्या वाटाच आज उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले़ परिषदेला चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागभिड, ब्रह्मपूरी, कोरपना येथील शेकडो शिक्षक, कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)