शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाचा शिक्षकच वारसा व्हावा

By admin | Updated: February 22, 2015 01:55 IST

केवळ शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, त्यांचे वेतन व भत्ते, सेवा सुरक्षा आदींकरिता अधिवेशने घेऊन समारंभ साजरे करण्यापेक्षा यापूढे जाऊन शिक्षणाच्या सर्व बाबीवर

हिंगणघाट : केवळ शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, त्यांचे वेतन व भत्ते, सेवा सुरक्षा आदींकरिता अधिवेशने घेऊन समारंभ साजरे करण्यापेक्षा यापूढे जाऊन शिक्षणाच्या सर्व बाबीवर सर्वंकष चर्चा झाली पाहिजे. समाजातील सर्व घटकापर्यंत शिक्षणाविषयी चेतना निर्माण झाली पाहिजे. वैयक्तिक प्रश्नाबरोबर कौटुंबिक, सामाजिक जाणीव निर्माण होणे, ही आजची गरज आहे. यासाठी शैक्षणिक व सामाजिक उत्थानाचा मार्ग असलेले गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण वारसा रूपाने भावी पिढीला प्रदान करणे हे शिक्षकांचे नैतिक कर्तव्य आहे. नव्हे तर गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणाचा शिक्षकच वारसा व्हावे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ यशवंत मनोहर यांनी केले़प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी राजे यांच्या जयंतीदिनी गुरूवारी स्थानिक कलोडे सभागृहात पाचची शिक्षण हक्क परिषद घेण्यात आली़ यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते़ डॉ. यशवंत मनोहर पूढे म्हणाले की, परिघ आणि परिघाबाहेरील लोकांना शिक्षण नाकारण्याचेच डावपेच आज आखले जात आहेत़ त्याची कटाक्षाने अंमलबजावणी केली जात आहे. गोर-गरिबांच्या वस्त्यांकडे धावणारे शिक्षणाचे ओघ अडविले व आटवले जात आहे. सरंमजामदार व भांडवलदारांच्या तालावर आणि त्यांच्या हितसंबंधीच्या ठेक्यावर थिरकणारे शासनही खासगीकरणाच्या नावाखाली गरिबांना शिक्षणाच्या परिघाबाहेर ढकलायला लागले. गुणवत्ता व बुद्धीमत्ता असणाऱ्यासंचे शिक्षण नाही तर ज्यांच्याकडे पैसा त्यांचे शिक्षण, असे धनदांडग्यांना म्हणजे शिक्षकांच्या हिताचे समिकरण झाले आहे़ गोर-गरिबांना मेहनतीच्या वा बुद्धीच्या स्पर्धेत उतरता येईल; पण त्यांना पैशाच्या स्पर्धेत टिकता येणे अवघड आहे. यामुळे आज सरंमजामदार व भांडवलदारांच्या बळावर राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शिक्षण महाग केले. शिक्षण ही क्रांतीकारी शक्ती गरीबांपर्यंत पोहोचू नये, गोरगरिबांच्या मुक्त होण्याच्या वाटाच आज उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले़ परिषदेला चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागभिड, ब्रह्मपूरी, कोरपना येथील शेकडो शिक्षक, कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)