शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

अल्पदरात आरोग्य सुविधा द्या

By admin | Updated: August 5, 2015 02:10 IST

कस्त्ुूरबा हेल्थ सोसायटी द्वारे संचालित सेवाग्राम येथील रुग्णालयात जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर भारतातून रुग्ण उपचारासाठी येतात.

रुग्णांची मागणी : लोकार्पण सेवा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनवर्धा : कस्त्ुूरबा हेल्थ सोसायटी द्वारे संचालित सेवाग्राम येथील रुग्णालयात जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर भारतातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथील रुग्णांना सवलतीच्या दरात सुविधा प्रदान करा, अशी मागणी सामान्य रुग्णांद्वारे केली जात आहे. याबाबत लोकार्पण सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी सलील यांना निवेदन सादर करण्यात आले. या रुग्णालयाला केंद्र व राज्य शासनामार्फत अनुदान दिले जाते. १९५२ पासून स्थापना केलेल्या या आयुर्विज्ञान संस्थेचा उद्देश गोरगरिबांना सवलतीच्या दरात आरोग्य विषयक सुविधा प्रदान करणे हा होता. संस्थेच्या संस्थापक डॉ. सुशिला नायर शासनाने पुरविलेल्या अनुदानाच्या प्रमाणात गोरगरीब रुग्णांना स्वस्त दरात औषधोपचार सेवा-सुविधा पुरवित होत्या. परंतु त्यांच्या निधनानंतर काही वर्षातच संपूर्ण संस्थानात सेवा-सुविधांचे व्यापारीकरण झाले व मिळणाऱ्या सेवा-सुविधा महागड्या झाल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणारे हे संस्थान सामान्य रुग्णांना परवडणारे राहिलेले नाही. त्यामुळे अनेकदा रुग्णांना उपचार न करताच परत जावे लागते. त्यामुळे आशेने येत असलेल्या रुग्णांना पूर्वीप्रमाणेच अल्पदरात सुविधा देण्याची मागणी होत आहे. यामध्ये राज्य व केंद्र शासनाकडून ७५ टक्के अनुदान येते. पूर्वी रुग्णालयात विमाकार्डमध्ये ७५ टक्के सवलत मिळत होती. ती आता बंद करण्यात आली आहे, त्यामुळे ती पूर्ववत सुरू करण्यात यावी. येथील रुग्णालयात रुग्णांना अनेकदा काही बाबी समजत नाही. अशावेळी त्यांना त्या बाबी नीट समजावून सांगण्याचेरे सोय करण्यात यावी, औषधी आणखी अल्पदरात मिळाव्या, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या मागण्यांसाठी लोकार्पण सेवा समितीच्या वतीने यापूर्वी ७ जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. चर्चेतून मागण्या सुटाव्यात अशी आग्रही भूमिका लोकार्पण सेवा समितीने व्यवस्थापनाला केली होती. परंतु व्यवस्थापनाने सदर मागण्यांसंदर्भात चर्चेबाबत पूर्णत: असमर्थता दर्शविली. यामुळे जिल्हाधिकारी सलिल यांना देण्यात आले. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष नाना अनकर, सचिव विलास खडसे, रहिम कुमार साहू, हातीम बाबू, संजय काकडे, नाना चावरे, दिनेश वाकडे, शाम जगताप, विजय धुमाळे, रवी भुजाडे व इतर नागरिक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)