शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

तलाठ्याला कार्यालयाचे वावडे

By admin | Updated: September 13, 2014 02:10 IST

येथील तलाठी गत एक महिन्यापासून स्थानिक कार्यालयात सापडत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

रोहणा : येथील तलाठी गत एक महिन्यापासून स्थानिक कार्यालयात सापडत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या विविध शेती विषयक योजनांसाठी आवश्यक असलेले सात-बारा, व नकाशे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.सविस्तर वृत्त असे की, जेव्हा जावे तेव्हा ग्राम सचिवालयातील तलाठी कार्यालयाला कुलूप लागून राहत असल्याने तलाठ्याकडून मिळणारे दाखले शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. पूर्वी रोहणा येथील तलाठी आठवड्यात दोन-तीन दिवस कार्यालयात भेटायचे. निदान आठवड्यातील बाजाराच्या दिवशी मंगळवारला हमखास कार्यालयात भेटायचे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात बारा, आठ अ व शेताचा नकाशा यासारखे दाखले स्थानिक पातळीवर आठवडाभऱ्यात मिळत होते. पण जमीन खरडून गेल्याच्या नुकसान भरपाईत तलाठी कार्यालयाकडून झालेला घोटाळा उघड झाल्यापासून सदर तलाठी कार्यालयात आलेच नाही. परिणामी एक महिन्यापासून सदर कार्यालयाला कुलूप राहते. ते कधी उघडले तर तिथे पटवारी नसून कोतवाल हजर असतो. तो केवळ पटवारीसाहेब आले नाही एवढेच उत्तर देतो. परिणामी शेतकऱ्यांना आवश्यक दाखले वेळेवर मिळत नाही. काही शेतकरी आर्वीला जाऊन दाखले मिळवितात. एकंदरीत आवश्यक दाखल्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागते. रोहणा येथील तलाठ्याप्रमाणे आठवड्यातील दोन-तीन दिवस तरी कार्यालयात बसावे अशी मागणी रोहण्यातील शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)