शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीतील नवे बदल संशोधनाला ऊर्जा देणारे

By admin | Updated: April 23, 2016 02:10 IST

तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात असिमित झेप घेतल्याने सर्व क्षेत्रांचा कायापालट होत आहे. हे नवे बदल, प्रगत तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्राला बळ देणारे ...

सत्यनारायणा : बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद, २५२ शोधनिबंध सादरवर्धा : तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात असिमित झेप घेतल्याने सर्व क्षेत्रांचा कायापालट होत आहे. हे नवे बदल, प्रगत तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्राला बळ देणारे असून संशोधनाची, नाविण्यतेची ऊर्जा निर्मिती करणारे ठरेल, असे विचार मुंबई येथील टाटा इन्स्टिट्युट आॅफ फन्डामेंटल रिसर्चच्या हाय एनर्जी फिजिक्स विभागाचे सायंटिफिक आॅफिसर डॉ. सत्यनारायणा यांनी व्यक्त केले.बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वॉलिटी अपग्रेडेशन इन इंजिनिअरिंग, सायन्स अ‍ॅन्ड टैक्नॉलॉजी विषयावर आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विचारपुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे बी.सी.यु.डी. चे संचालक डॉ. डी.के. अग्रवाल, प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड, विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचे संयोजक डॉ. एम.डी. चौधरी, आय.सी. क्वेस्टचे समन्वयक डॉ. नितिकेत म्हाला, सहसंयोजक प्रा. एम.एन. ठाकरे, आयोजन सचिव प्रा. मनोज सायंकार यांची उपस्थिती होती.‘प्रोबिंग द फ्रन्टायर आॅफ सायन्स युजिंग अ‍ॅडव्हासिंग टेक्नॉलॉजिक्स अ‍ॅन्ड इजिनिअरिंग टुल्स’ या विषयावर बीजभाषण करताना डॉ. सत्यनारायणा म्हणाले, अभियांत्रिकी क्षेत्रात उदयास येणारे तंत्रज्ञान विकसित राष्ट्राकडे वाटचाल करणारे आहे. यात सातत्याने होणारे बदल, नाविन्यपूर्ण कल्पना, विज्ञान व तंत्रज्ञानाला नवी दिशा देणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून अभियांत्रिकी शाखेत नाविन्यता निर्माण झाली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. अग्रवाल यांनी सद्यस्थित असलेली संशोधनाची पद्धत विशद केली. संशोधनाची गरज, उपयोगिता याविषयी त्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. संशोधनात जे बदल होत आहे त्याचा पुरेपूर उपयोग देशाच्या व समाजाच्या प्रगतीकरिता करता येईल, असे सांगत अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदेची सातत्याने आवश्यकता असल्याचेही सांगितले. डॉ. चौधरी यांनी शासनाच्या धोरणामध्ये सुधारणा करून संशोधन, मूलभूत सुविधा व तांत्रिक कौशल्य विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी वेगवेगळ्या संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधनात संवाद असण्याची गरज असल्याचे सांगत उत्तम संशोधन साकार करण्याकरिता सार्वत्रिक प्रयत्नाची आवश्यकता बोलून दाखविली. समन्वयक डॉ. म्हाला यांनी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजनामागील भूमिका विशद केली. परिषदेत संपूर्ण देशभरातून ३७० शोधनिबंध प्राप्त झाले होते. यामधून २५२ शोधनिबंध निवडण्यात आले. संचालन प्रा. एम.एस. निंबार्ते व प्रा. एम.आर. सायंकार यांनी केले. आभार प्रा. ठाकरे यांनी व्यक्त केले. परिषदेला प्राध्यापक, संशोधनकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)