शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पूर्वी अतिवृष्टीने मोडले कंबरडे; आता भाववाढीकडे नजरा, अडीच लाखांहून अधिक कापूस घरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 16:00 IST

१० लाख क्विंटल कापूस उत्पादनाचा कृषी विभागाचा अंदाज

महेश सायखेडे

वर्धा : कापूस उत्पादकांचा हब अशी वर्धा जिल्ह्याची ओळख. यंदाच्या वर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील सात बाजार समित्यांतर्गत ८.२२ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. असे असले तरी अजूनही भाववाढीच्या आशेने वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस साठवून आहे. शेतकऱ्यांच्या घरी असलेला हा कापूस सुमारे अडीच लाख क्विंटलच्या घरात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात २.१५ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. त्यानंतर अंकुरलेले पीक बघून यंदा नक्कीच समाधानकारक उत्पन्न होईल असा कयास शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात होता. अशातच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी झाली. त्यामुळे कपाशी पिकाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याने यंदा हेक्टरी पाच क्विंटल उत्पादनाचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा वर्धा जिल्ह्यातील कापूस उत्पादनाचा विचार केल्यास जिल्ह्यात सुमारे १० लाख ७५ हजार क्विंटल कापसाचे उत्पादन झाले आहे. त्यापैकी ८ लाख २२ हजार क्विंटल कापूस शेतकऱ्यांची बाजार समितींच्या अधिकृत व्यापाऱ्यांना विकला असल्याचे वास्तव असून, सद्य:स्थितीत अडीच लाख क्विंटल कापूस वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरीच असल्याचे बोलले जात आहे. एकूणच पूर्वी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, तर आता भाववाढीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

कापूस खरेदीत हिंगणघाट अव्वल

यंदाच्या वर्षी जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी अद्यापही सुरू झाली नसली तरी आतापर्यंत बाजार समितीच्या नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी ५ मार्च २०२३ पर्यंत तब्बल ८.२२ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. कापूस खरेदीत हिंगणघाट बाजार समिती अव्वल असून, तेथे ३३२५६३.०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

बाजार समितीनिहाय यंदाची कापूस खरेदीची स्थिती

  • वर्धा : ७१,१६९.१५ क्विंटल
  • पुलगाव : १,४५,९३७.८० क्विंटल
  • आर्वी : ९७७७६.७० क्विंटल
  • आष्टी : १४,८९३.०० क्विंटल
  • सिंदी : ८०,०१२.०० क्विंटल
  • समुद्रपूर : ८०,०१२.०० क्विंटल
  • हिंगणघाट : ३,३२,५६३.०० क्विंटल

 

गतवर्षी बाजार समित्यांनी खरेदी केला २०.४६ लाख क्विंटल कापूस

कोविड संकटकाळात कृषी क्षेत्राने जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला सुस्थितीत ठेवले. मागील वर्षी म्हणजेच २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील सात बाजार समित्यांच्या नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी एकूण २० लाख ४६ हजार १४३.७७ क्विंटल कापसाची खरेदी केली होती. त्याबाबतची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. तर यंदा ५ मार्चपर्यंत ८ लाख २२ हजार ३६३.६५ क्विंटल कापूस खरेदी बाजार समितीच्या अधिकृत व्यापाऱ्यांनी केली आहे.

वर्षनिहाय बाजार समित्यांची कापूस खरेदीची स्थिती

  • २०१७-१८ : १,६६,७०,८४.३३ क्विंटल
  • २०१८-१९ : २६,६३,४७६.८० क्विंटल
  • २०१९-२० : २४,१३,११५.७९ क्विंटल
  • २०२०-२१ : २९,३४,५१८.८१ क्विंटल
  • २०२१-२२ : २०,४६,१४३.७७ क्विंटल
  • २०२२-२३ : ८,२२,३६३.६५ क्विंटल

 

खरीप हंगामात जिल्ह्यात सव्वादाेन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. पण, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यांत वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या कपाशी पिकाचे ५० टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याने उत्पादनातही घट झाली. यंदा जिल्ह्यात सरासरी हेक्टरी पाच क्विंटल कापसाचे उत्पादन झाले आहे.

- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीwardha-acवर्धा