शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

बोर अधिग्रहीत क्षेत्रातील चराई बंदीचा प्रश्न लोकसभेत

By admin | Updated: August 8, 2014 00:07 IST

बोर अभयारण्य परिसरात जनावरांवर असलेल्या चराईबंदीचा प्रश्न लोकसभेत पोहचला. शून्य अवधीत मांडलेल्या या प्रश्नाच्या माध्यमातून जनावरे चारण्यासाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे

वर्धा : बोर अभयारण्य परिसरात जनावरांवर असलेल्या चराईबंदीचा प्रश्न लोकसभेत पोहचला. शून्य अवधीत मांडलेल्या या प्रश्नाच्या माध्यमातून जनावरे चारण्यासाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेवून जनावरांना चरण्यासाठीची बंदी उठवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यातील बोर क्षेत्रात १९७० मध्ये अभयारण्याची घोषणा सरकारच्यावतीने करण्यात आली. यानंतर २०१२ मध्ये पुन्हा अभयारण्याची घोषणा करतानाच सीमा वाढविण्यात आली. यामध्ये परिसरातील सुमारे ४० गावांचे अधिग्रहण करण्यात आले. यामुळे गावकऱ्यांकडील १० हजारांवर जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. वास्तविक, या परिसरातील गावकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय मुख्य आहे. असे असताना या गावकऱ्यांच्या जनावरांना अधिग्रहीत क्षेत्रात चराईवर बंदी घालण्यात आली. जनावरांच्या चाऱ्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे ही जनावरे अधिग्रहीत क्षेत्रात चारण्यासाठी नेली असता वनविभागामार्फत ती जप्त केली जात आहेत. तसेच पशुपालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या कारवाईच्या भीतीने अनेक पशुपालकांनी जनावरे कसायाला विकली आहेत. परिणामी गावातील नागरिकांचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय डबघाईस आला असून गावकरी आणि शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत शून्य वेळेत लक्ष वेधले. यावर शासनाचे उत्तर काय येते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.(जिल्हा प्रतिनिधी)