शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

लॉकडाऊनमुळे कर थकला दोन टक्के दंडाचा भार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार नगरपंचायत व नगरपालिकांचा कर १ एप्रिल या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देय असतो. मालमत्ताधारकांनी हा कर ३१ मार्चपूर्वी न भरल्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ या उपविधीचा अंगीकार केलेला असल्यामुळे कलम १५० अ (१) नुसार दोन टक्के शास्ती (दंड) लावण्याची तरतूद अधिनियमात आहे.

ठळक मुद्देमालमत्ताधारकांची आर्थिक कोंडी : पालिकांना शासनाच्या मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यभरात कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांचा रोजगारही हिरावला तसेच संचारबंदीमुळे नागरिक नगरपालिका व नगरपंचायत कार्यालयात येऊन मालमत्ता कर देऊ शकले नाही. परंतु, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमांतर्गत मालमत्ताधारकांना दोन टक्के दंड भरावा लागणार असल्याने राज्यभरातील मालमत्ताधारकांची आर्थिक कोंंडी झाली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून नगरपंचायत व नगरपालिकांना अद्याप मार्गदर्शन मिळाले नसल्याने अंमलबजाणी करताना त्यांचीही पंचाईत होत आहे.महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार नगरपंचायत व नगरपालिकांचा कर १ एप्रिल या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देय असतो. मालमत्ताधारकांनी हा कर ३१ मार्चपूर्वी न भरल्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ या उपविधीचा अंगीकार केलेला असल्यामुळे कलम १५० अ (१) नुसार दोन टक्के शास्ती (दंड) लावण्याची तरतूद अधिनियमात आहे. मात्र, मार्च महिन्यातच कोरोना विषाणूचा प्रकोप वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले.संचारबंदी लागू असल्याने मालकत्ताधारकांना पालिका किंवा नगरपंचायतीचा मालकत्ता कर भरता आला नाही. यामुळे नियमित करदात्यांनाही आता दोन टक्के दंडाची रक्कम भरावी लागत आहे. आधीच मालमत्ता कर भरणारे नागरिक आर्थिक संकट असताना आपत्तीकाळात मालमत्ताकरावरील व्याज भरताना नागरिकांची मोठी अडचण होत आहे. यामुळे या कोरोना संकटाच्या आपत्तीकाळात हा दंड माफ करण्याची गरज व्यक्त होत आहे. शिवाय तशी वर्धा शहरातील नागरिकांचीही मागणी आहे.शासनाने आपत्तीकाळात तत्काळ जनहितार्थ निर्णय घ्यावाकेंद्र सरकारने इतर आर्थिक बाबींसाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे. त्याचप्रमाणे नगरपालिका व नगरपंचायतीचा मालमत्ता कर भरण्याकरिता नागरिकांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, तसेच त्यावरील २ टक्के व्याजाची रक्कम रद्द करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे वर्धा नगरपालिकेने संचालनालयाशी संपर्क साधून विचारणा केली असता याबाबत कोणताही आदेश नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे जनहिताच्या दृष्टिकोनातून त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी वर्धा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, सदस्य श्रेया देशमुख, वरुण पाठक, कैलास राखडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. निवेदन नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री आदींना पाठविण्यात आले आहे.कोरोनामुळे नागरिकांवर आधीच आर्थिक संकट ओढवले आहे. संचारबंदी व आर्थिक कोंडीमुळे नियमित असलेले करदातेही मालमत्ता कर भरू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना आता दोन टक्के व्याज भरण्याची वेळ आली आहे. नागरिकांकडून हे व्याज माफ करण्याची मागणी होत आहे. पण, शासनाने मार्गदर्शक सूचना किंवा उपाययोजना केल्या नसल्याने पालिकेचीही अडचण होत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ निर्णय घेऊन राज्यातील मालमत्ताधारकांना दिलासा द्यावा.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTaxकर