शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
3
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
4
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
5
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
6
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
7
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
8
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
9
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
10
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
11
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
12
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
13
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
14
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
15
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
16
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
17
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
18
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
19
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
20
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न

आयटकचे ‘जेलभरो व जवाब दो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 22:22 IST

अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशावर्कर व गट प्रवर्तक यांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबीत आहे. शासनाने वारंवार आश्वासन दिली. पण, अद्यापही ते पुर्णत्वास गेले नसल्याने आज गुरुवारला आयटक प्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, आशा व गटप्रवर्तक संघटना,.......

ठळक मुद्देपोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात : प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशावर्कर व गट प्रवर्तक यांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबीत आहे. शासनाने वारंवार आश्वासन दिली. पण, अद्यापही ते पुर्णत्वास गेले नसल्याने आज गुरुवारला आयटक प्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, आशा व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन यांच्यावतीने ‘जेलभरो व जवाब दो ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करुन स्थानबध्द केले.स्थानिक शास्त्री चौकातून आयटकच्या नेतृत्वात सर्व संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. शहरातील मुख्य मार्गांनी निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी ठाकरे चौकात अडवून त्यांना स्थानबध्द केले. वित्तमंत्री अरूण जेटली यांनी १७ आॅगस्ट २०१६ रोजी अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशावर्कर यांना प्रतिदिन ३५० रुपये तर गटप्रवर्तकांना प्रतिदिन ४५० रुपये वेतन, भविष्यनिर्वाह भत्ता व आरोग्य सुविधा लागू करण्याची घोषणा केली होती.परंतू केंद्र सरकारने २ वर्ष लोटुनही शासन आदेश काढलेला नाही. तो आदेश तात्काळ काढावा तसेच केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे अंगणवाडी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आयटकच्या राज्य कौन्सीलच्या अहवालानुसार असंघटीत कामगारांचे प्रश्न व जनतेचे प्रश्न सोडवावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले असून या मागण्याचे निवेदन पंंतप्रधान, वित्तमंत्री, मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्यसचिव दिलीप उटाणे, मनोहर पचारे,गजेंद्र सुरकार, असलम पठाण, विजया पावडे, गुणवंत डकरे, सुजाता भगत, ज्ञानेश्वरी डंभारे, वंदना कोळणकर, जयमाला बेलगे, मैना उईके, वैशाली ठवरे, प्रतिभा वाघमारे, वंदना खोब्रागडे, विमल कौरती, शोभा तिवारी, माला भगत, सुनंदा आखाडे, रेखा काचोळे, निर्मला सातपुडके, बबीता चिमोटे, वैशाली नंदरे, वीणा पाटील, रेखा नवले, रमेश बोंदलकर, यमुना नगराळे, शोभा सायंकार, ज्योती कुलकर्णी, शबाना खान, संगीता टोणपे, सुनिता टिपले, सुलभा तिरभाने, सिमा गढीया, अल्का भानसे, आशा गळहाट, कमल डबले, रंजना तांबेकर, विनायक नन्नोरे, रजनी पाटील, माला कुत्तरमारे, इरफाना पठाण, पार्वता जुनघरे, पुष्पा नरांजे, हिरा बावणे, योगिता डहाके, ज्योती वाघमारे, अरूणा नागोसे यांनी केले. या आंदोलनात जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते.दहा वचनांचा मागितला जवाब२०१४ मध्ये पंतप्रधानांनी १० मोठे दिलेले वचन, प्रत्येक वर्षी दोन करोड नवीन नौकºया, शेतकºयांना लागत खर्च अधिक ५० टक्के हमीभाव, विदेशातील काळा पैसा १०० दिवसांत परत आणणार. सर्वांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, १०० स्मार्टसिटी, राममंदिर निर्माण, कश्मिरमधील धारा ३७० हटविणार, गंगा शुद्धीकरण, डॉलर ४० रुपयांवर आणणार, लोकपाल गठन करणार यापैकी कोणते वचन पूर्ण केले व २०१९ पर्यंत पूर्ण करणार काय ? याचा जवाब विचारण्यात आला आहे.इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये होत असलेल्या चुकीचा व्यवहार थांबवून खºया कामगारांची नोंदणी करा. या मागणीसाठी सरकारी कामगार अधिकारी धुर्वे यांना निवेदन देण्यात आले.नुकतेच भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारुन प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

टॅग्स :WomenमहिलाMorchaमोर्चा