शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

आयटकचे ‘जेलभरो व जवाब दो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 22:22 IST

अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशावर्कर व गट प्रवर्तक यांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबीत आहे. शासनाने वारंवार आश्वासन दिली. पण, अद्यापही ते पुर्णत्वास गेले नसल्याने आज गुरुवारला आयटक प्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, आशा व गटप्रवर्तक संघटना,.......

ठळक मुद्देपोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात : प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशावर्कर व गट प्रवर्तक यांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबीत आहे. शासनाने वारंवार आश्वासन दिली. पण, अद्यापही ते पुर्णत्वास गेले नसल्याने आज गुरुवारला आयटक प्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, आशा व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन यांच्यावतीने ‘जेलभरो व जवाब दो ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करुन स्थानबध्द केले.स्थानिक शास्त्री चौकातून आयटकच्या नेतृत्वात सर्व संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. शहरातील मुख्य मार्गांनी निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी ठाकरे चौकात अडवून त्यांना स्थानबध्द केले. वित्तमंत्री अरूण जेटली यांनी १७ आॅगस्ट २०१६ रोजी अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशावर्कर यांना प्रतिदिन ३५० रुपये तर गटप्रवर्तकांना प्रतिदिन ४५० रुपये वेतन, भविष्यनिर्वाह भत्ता व आरोग्य सुविधा लागू करण्याची घोषणा केली होती.परंतू केंद्र सरकारने २ वर्ष लोटुनही शासन आदेश काढलेला नाही. तो आदेश तात्काळ काढावा तसेच केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे अंगणवाडी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आयटकच्या राज्य कौन्सीलच्या अहवालानुसार असंघटीत कामगारांचे प्रश्न व जनतेचे प्रश्न सोडवावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले असून या मागण्याचे निवेदन पंंतप्रधान, वित्तमंत्री, मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्यसचिव दिलीप उटाणे, मनोहर पचारे,गजेंद्र सुरकार, असलम पठाण, विजया पावडे, गुणवंत डकरे, सुजाता भगत, ज्ञानेश्वरी डंभारे, वंदना कोळणकर, जयमाला बेलगे, मैना उईके, वैशाली ठवरे, प्रतिभा वाघमारे, वंदना खोब्रागडे, विमल कौरती, शोभा तिवारी, माला भगत, सुनंदा आखाडे, रेखा काचोळे, निर्मला सातपुडके, बबीता चिमोटे, वैशाली नंदरे, वीणा पाटील, रेखा नवले, रमेश बोंदलकर, यमुना नगराळे, शोभा सायंकार, ज्योती कुलकर्णी, शबाना खान, संगीता टोणपे, सुनिता टिपले, सुलभा तिरभाने, सिमा गढीया, अल्का भानसे, आशा गळहाट, कमल डबले, रंजना तांबेकर, विनायक नन्नोरे, रजनी पाटील, माला कुत्तरमारे, इरफाना पठाण, पार्वता जुनघरे, पुष्पा नरांजे, हिरा बावणे, योगिता डहाके, ज्योती वाघमारे, अरूणा नागोसे यांनी केले. या आंदोलनात जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते.दहा वचनांचा मागितला जवाब२०१४ मध्ये पंतप्रधानांनी १० मोठे दिलेले वचन, प्रत्येक वर्षी दोन करोड नवीन नौकºया, शेतकºयांना लागत खर्च अधिक ५० टक्के हमीभाव, विदेशातील काळा पैसा १०० दिवसांत परत आणणार. सर्वांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, १०० स्मार्टसिटी, राममंदिर निर्माण, कश्मिरमधील धारा ३७० हटविणार, गंगा शुद्धीकरण, डॉलर ४० रुपयांवर आणणार, लोकपाल गठन करणार यापैकी कोणते वचन पूर्ण केले व २०१९ पर्यंत पूर्ण करणार काय ? याचा जवाब विचारण्यात आला आहे.इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये होत असलेल्या चुकीचा व्यवहार थांबवून खºया कामगारांची नोंदणी करा. या मागणीसाठी सरकारी कामगार अधिकारी धुर्वे यांना निवेदन देण्यात आले.नुकतेच भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारुन प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

टॅग्स :WomenमहिलाMorchaमोर्चा