शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण

By admin | Updated: November 29, 2014 23:25 IST

दुबार-तिबार पेरणीमुळे मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला आता हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे. यंदा एकामागून एक अस्मानी संकट बळीराजाचा पाठलाग करीत याचा सामना करून कसेबसे पीक वाचविले.

वर्धा : दुबार-तिबार पेरणीमुळे मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला आता हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे. यंदा एकामागून एक अस्मानी संकट बळीराजाचा पाठलाग करीत याचा सामना करून कसेबसे पीक वाचविले. यातून किमान मशागतीचा खर्च निघेल अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र आता कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सेलु तालुक्यातील तुळजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी शासनानकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. पिकावर लाल्याने आक्रमण केल्याने, उभे पीक वाळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आला आहे. एकीकडे कर्जाचा वाढता डोंगर आणि उत्पन्नाची हमी शून्य अशा विदारक स्थितीचा सामना करण्याकरिता शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे ठरत आहे. येथील तुळजापूर(वघाळा), टाकळी(किटे), जयपूर, तळोदी, कुटकी, सेलू (स्टेशन) परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या भागातील कपाशीचे पीक लाल्याच्या विळख्यात सापडले आहे. यामुळे पिके वाळत आहे. काही शेतात तर संपूर्ण पीक वाळले असून उत्पन्नाची हमी राहिलेली नाही.एकरी सोयाबीनचा उतारा कमीआल्याने शेतकऱ्यांच्या आशा कपाशीवर टिकुन होत्या. यातून यंदाचा लागवड खर्च निघेल अशी अपेक्षा असताना लाल्यामुळे कपाशीचे पिकही हातचे गेले आहे. सोयाबीनचे एकरी दिड-दोन क्विंटल असे अल्प उत्पन्न मिळत असल्याने काहींनी तर कापणी करण्याचे ताळले आहे. कपाशीचे पीक वाळत आहे. तूत पिकाला बहर नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे ओलिताची सुविधा आहे. पण वीज वितरण कपंनीकडून होत असलेल्या अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे ओलित करणे शक्य होत नआही. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. काही शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे. मात्र ऊसाला अल्प भाव असल्याने शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिकांना हमीभाव देण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)