शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण

By admin | Updated: November 29, 2014 23:25 IST

दुबार-तिबार पेरणीमुळे मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला आता हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे. यंदा एकामागून एक अस्मानी संकट बळीराजाचा पाठलाग करीत याचा सामना करून कसेबसे पीक वाचविले.

वर्धा : दुबार-तिबार पेरणीमुळे मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला आता हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे. यंदा एकामागून एक अस्मानी संकट बळीराजाचा पाठलाग करीत याचा सामना करून कसेबसे पीक वाचविले. यातून किमान मशागतीचा खर्च निघेल अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र आता कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सेलु तालुक्यातील तुळजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी शासनानकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. पिकावर लाल्याने आक्रमण केल्याने, उभे पीक वाळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आला आहे. एकीकडे कर्जाचा वाढता डोंगर आणि उत्पन्नाची हमी शून्य अशा विदारक स्थितीचा सामना करण्याकरिता शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे ठरत आहे. येथील तुळजापूर(वघाळा), टाकळी(किटे), जयपूर, तळोदी, कुटकी, सेलू (स्टेशन) परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या भागातील कपाशीचे पीक लाल्याच्या विळख्यात सापडले आहे. यामुळे पिके वाळत आहे. काही शेतात तर संपूर्ण पीक वाळले असून उत्पन्नाची हमी राहिलेली नाही.एकरी सोयाबीनचा उतारा कमीआल्याने शेतकऱ्यांच्या आशा कपाशीवर टिकुन होत्या. यातून यंदाचा लागवड खर्च निघेल अशी अपेक्षा असताना लाल्यामुळे कपाशीचे पिकही हातचे गेले आहे. सोयाबीनचे एकरी दिड-दोन क्विंटल असे अल्प उत्पन्न मिळत असल्याने काहींनी तर कापणी करण्याचे ताळले आहे. कपाशीचे पीक वाळत आहे. तूत पिकाला बहर नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे ओलिताची सुविधा आहे. पण वीज वितरण कपंनीकडून होत असलेल्या अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे ओलित करणे शक्य होत नआही. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. काही शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे. मात्र ऊसाला अल्प भाव असल्याने शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिकांना हमीभाव देण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)