शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

अवैध प्रवासी वाहतूक जोरात

By admin | Updated: September 18, 2014 00:02 IST

शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतुकीने त्रस्त झाले आहे. पोलीस प्रशासनाचा यावर वचक नसल्यामुळे पोलिस स्टेशन समोरुनच ही अवैध प्रवासी वाहतूक होत असते.

पुलगाव : शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतुकीने त्रस्त झाले आहे. पोलीस प्रशासनाचा यावर वचक नसल्यामुळे पोलिस स्टेशन समोरुनच ही अवैध प्रवासी वाहतूक होत असते. शिवाय मुख्य मार्गाच्या बाजूला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते.शहरातून हैद्राबाद-भोपाल व नागपूर-मुंबई हे महामार्ग जात असून या दोन्ही मार्गावर जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच अहेरी-परतवाडा या मार्गावरही वाहनांची वर्दळ वाढली आहे. या मार्गांवर मुख्य बाजारपेठ व शाळा, महाविद्यालये असून विद्यार्थ्यांची वर्दळ असते. याच मार्गावरील रेल्वे स्टेशन ते बालाजी मंदिर व कॉटन मील ते नगरपरिषद हायस्कूलपर्यंत रस्त्याच्या बाजूला वाहनांची रांग लागली असते. तासनतास जडवाहन उभी असतात. त्यामुळे या मार्गावरील जोड रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना समोरून येणारी वाहने दिसत नसल्यामुळे येथे लहान मोठे अपघात घडत असतात. स्टेशन चौकात वाहतुक नियंत्रक शिपायांची नेमणूक असते, परंतु हे शिपाई महामार्ग किंवा गल्लीबोळातून जाणाऱ्या आॅटो चालकाची गळाला लागण्याची वाट पहात फिरत असल्याचे चित्र आहे. यामुळे या वाहतुकीकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसल्याची स्थिती आहे. इतकेच नव्हे तर अवैध प्रवासी वाहने गांधी चौक सारख्या वर्दळीच्या ठिकाणी सुध्दा भरधाव नेतांना दिसतात. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना भीती वाटते. मात्र पोलिस प्रशासन या सर्व गोष्टीकडे डोळे मिटून पहात असल्याचा शहरवासीयांचा आरोप आहे. पोलिस प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.शहराची वाहतूक या जड वाहनांमुळे प्रभावित होते. बरेचदा रस्त्याच्या कडेला वाहन उभे राहत असल्याने समोरुन येत असलेल्या वाहन चालकांना याचा अंदाज येत नाही. म्हणून येथे अपघात घडतात. याकरिता रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांवर कारवाई केल्यास याला पायबंद बसेल. या मागणीकडे लक्ष देत तातडीने कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)