शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

नियमबाह्य नियुक्त्या; चौकशी झाली पण, कारवाईचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

पंचायत राज संस्थांच्या कारभारामध्ये एकसूत्रता आणि पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा-दाखले त्यांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरुपात मिळणे आदी सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्यात या उद्देशाने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. ई-पंचायत या प्रकल्पाची अंमलबजावणी एका खासगी कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामपंचायत पातळीवरील कामकाज पारदर्शक व पेपरलेस करण्याकरिता आपले सरकार योजनेंतर्गत ई-ग्रामसॉफ्ट संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. याकरिता खासगी कंपनीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती करताना नियमबाह्यपणे अनेकांची नियुक्ती केल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची चौकशी झाली पण, कारवाईचे घोडे कुठे अडले, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे.पंचायत राज संस्थांच्या कारभारामध्ये एकसूत्रता आणि पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा-दाखले त्यांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरुपात मिळणे आदी सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्यात या उद्देशाने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. ई-पंचायत या प्रकल्पाची अंमलबजावणी एका खासगी कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे. कंपनीकडून जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली. संगणक परिचालकाची नियुक्ती करताना ती व्यक्ती गावातील किंवा ५ किलोमीटर अंतरावराच्या आतील रहिवासी असावी, असा आदेश आहे. परंतु व्यवस्थापकांनी शासनाचा आदेश डावलून स्वमर्जीने २० ते ४० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या व्यक्तींची निवड केली. काही तर दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असून ते संगणक परिचालक म्हणून कार्यरत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकील पालकमंत्री सुनील केदार यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करुन चौकशीची मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन ग्रामपंचायत, केंद्रचालकाचे नाव, केंद्रचालक रुजू होण्याचा दिनांक, केंद्रचालकाच्या राहण्याच्या ठिकाणापासून ग्रामपंचायतीचे अंतर, त्या चालका संदर्भात तक्रार प्राप्त झाली काय, आदी माहितीचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले होते. आता दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही कुठलीही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तालुका संघटनांकडूनही तक्रार- ग्रामपंचायत संगणक परिचालक नेमणुकीत सीएसी-एसपीव्ही हा कंपनीकडून आर्थिक व्यवहार झाला असून या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे जास्त अंतरावरील व्यक्तीची संगणक परिचालक म्हणून नियुक्ती केल्याची तक्रार संगणक परिचालक संघटना देवळी तालुका यांनी जिल्हा परिषद सदस्यांसह खासदारांकडे केली होती. त्यांच्या या तक्रारीमध्ये तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या आठ संगणक परिचालकांची नावेही देण्यात आली होती. पण, त्यांच्याही तक्रारीवर काहीच कारवाई झाली नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडूनही रोष व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत