शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

नियमबाह्य नियुक्त्या; चौकशी झाली पण, कारवाईचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

पंचायत राज संस्थांच्या कारभारामध्ये एकसूत्रता आणि पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा-दाखले त्यांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरुपात मिळणे आदी सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्यात या उद्देशाने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. ई-पंचायत या प्रकल्पाची अंमलबजावणी एका खासगी कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामपंचायत पातळीवरील कामकाज पारदर्शक व पेपरलेस करण्याकरिता आपले सरकार योजनेंतर्गत ई-ग्रामसॉफ्ट संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. याकरिता खासगी कंपनीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती करताना नियमबाह्यपणे अनेकांची नियुक्ती केल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची चौकशी झाली पण, कारवाईचे घोडे कुठे अडले, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे.पंचायत राज संस्थांच्या कारभारामध्ये एकसूत्रता आणि पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा-दाखले त्यांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरुपात मिळणे आदी सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्यात या उद्देशाने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. ई-पंचायत या प्रकल्पाची अंमलबजावणी एका खासगी कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे. कंपनीकडून जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली. संगणक परिचालकाची नियुक्ती करताना ती व्यक्ती गावातील किंवा ५ किलोमीटर अंतरावराच्या आतील रहिवासी असावी, असा आदेश आहे. परंतु व्यवस्थापकांनी शासनाचा आदेश डावलून स्वमर्जीने २० ते ४० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या व्यक्तींची निवड केली. काही तर दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असून ते संगणक परिचालक म्हणून कार्यरत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकील पालकमंत्री सुनील केदार यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करुन चौकशीची मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन ग्रामपंचायत, केंद्रचालकाचे नाव, केंद्रचालक रुजू होण्याचा दिनांक, केंद्रचालकाच्या राहण्याच्या ठिकाणापासून ग्रामपंचायतीचे अंतर, त्या चालका संदर्भात तक्रार प्राप्त झाली काय, आदी माहितीचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले होते. आता दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही कुठलीही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तालुका संघटनांकडूनही तक्रार- ग्रामपंचायत संगणक परिचालक नेमणुकीत सीएसी-एसपीव्ही हा कंपनीकडून आर्थिक व्यवहार झाला असून या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे जास्त अंतरावरील व्यक्तीची संगणक परिचालक म्हणून नियुक्ती केल्याची तक्रार संगणक परिचालक संघटना देवळी तालुका यांनी जिल्हा परिषद सदस्यांसह खासदारांकडे केली होती. त्यांच्या या तक्रारीमध्ये तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या आठ संगणक परिचालकांची नावेही देण्यात आली होती. पण, त्यांच्याही तक्रारीवर काहीच कारवाई झाली नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडूनही रोष व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत