शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

लग्नाचा खर्च मीच करतो...फक्त मुलगी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:57 IST

पुरुषप्रधान समाजात उपवरांचे पारडे जड असायचे, हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्याही घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देउपवधुसाठी दाहीदिशा : हुंडा नको, फक्त मुलगी हवी म्हणण्याची मुलांवर आलीय वेळ

गौरव देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : पुरुषप्रधान समाजात उपवरांचे पारडे जड असायचे, हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्याही घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सध्या चक्र पालटले असून ‘आम्हा हुंडा नको फक्त तुुमची मुलगीच हवी’, अशी आर्जव करण्याची वेळ उपवर पित्यांवर आलेली दिसून येत आहे.निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतीचे वाईट दिवस आले आहे. त्यामुळे प्रत्येक पित्याला आपली मुलगी सुखी समाधानाने नांदावी अशीच आस असते. त्यापोटीच चांगला वर शोधण्यासाठी पिता समाजात फिरतांना दिसतो. सध्या ग्रामीण भागासह शहरी भागातील वधू पित्याची नजर कमावत्या मुलांकडे वळली आहे. त्या दृष्टीने वधू पिता मुलांकरिता शोध मोहीम राबवित असल्याचे दिसून येत आहे. पण, शेतकरी पित्याची मुलगी असो वा नोकरदार पित्याची मुलगी, सर्वच शेतकरी मुलाकडे दुर्लक्ष करीत आहे.निसर्गाच्या दृष्टचक्र तोट्याचा ठरणारा शेती व्यवसाय आणि मुलींच्या पित्यांचे असलेले नोकरदार मुलांचे स्वप्न त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाहाच्छूक मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी आत्महत्यांमागे नैसर्गिक आणि शासनाच्या अनास्थेने निर्माण झालेल्या कारणांप्रमाणेच शेतकऱ्यांनी स्वत: भोवती गुंडाळून घेतलेले सामाजिक प्रतिष्ठेची प्रथाही कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते. पूर्वी मुला-मुलींच्या लग्नाचे बार धुमधडाक्यात उरकविण्याकरिता वाट्टेल ते करणाºया बहुतांश शेतकरी कुटुंबियांना आता बदलत्या परिस्थितीत मुलांचे लग्न जुळविण्याकरिता आटापिटा करावा लागत आहे. त्यामुळे मुलांकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करायला तयार होत आहे. तर काहींनी मुलींना हुंडाही दिल्याचे वास्तव असल्याने या परिस्थितीवरुन ‘मुला पेक्षा मुलगी बरी’ असे म्हणण्याची वेळ वर पित्यावर आली आहे.मुलींच्या शोधात वाढतेय वयवर्धा तालुक्यातील ६०० ते १ हजार लोकसंख्या असलेल्या अनेक गावांमध्ये लग्नाचे वय होऊनही लग्न जमत नसलेल्या शेतकरी मुलांचे वय आता ३५ ते ४० पार गेलेले दिसून येत आहे. परिसरात अनेक गावांमधील तरुण मंडळी मागील तीन ते चार वर्षांपासून लग्नाच्या प्रतिक्षेत आहे. तरी मुलगी मिळत नसल्याने शोधमोहीम सुरुच आहे. काही मुलांनी ‘तुम्हाला पाहिजे असेल तर पैसा देता, लग्नाचा संपूर्ण खर्च आम्हीच करतो. फक्त मुलगी द्या’ असाही निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. तरीही मुलगी मिळत नसल्याचे वास्तव आहेत.ही परिस्थिती वर्धा तालुक्याचीच नाही तर इतरही भागात हीच अवस्था आहेत.शेतकरी नवरा नको पण शेती हवीय...शेतकरी असलेल्या मुलांना मुली देण्यासाठी सध्या कोणताही पिता तयार होत नाही. आधी नोकरीला प्राधान्य दिले जाते. मुलगा नोकरीवर असल्यास त्याला मुलगी देण्याकरिता होकार दर्शवितात. परंतू काही ठिकाणी सध्या नोकरीसोबतच शेती आहे काय? असाही प्रश्न पुढे येतो.काहींना नोकरीसोबतच मुलाकडे शेतीही पाहिजे आहेत. यावरुन शेतकरी नवरा नको पण, शेती हवीय... कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :marriageलग्न