शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

लग्नाचा खर्च मीच करतो...फक्त मुलगी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:57 IST

पुरुषप्रधान समाजात उपवरांचे पारडे जड असायचे, हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्याही घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देउपवधुसाठी दाहीदिशा : हुंडा नको, फक्त मुलगी हवी म्हणण्याची मुलांवर आलीय वेळ

गौरव देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : पुरुषप्रधान समाजात उपवरांचे पारडे जड असायचे, हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्याही घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सध्या चक्र पालटले असून ‘आम्हा हुंडा नको फक्त तुुमची मुलगीच हवी’, अशी आर्जव करण्याची वेळ उपवर पित्यांवर आलेली दिसून येत आहे.निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतीचे वाईट दिवस आले आहे. त्यामुळे प्रत्येक पित्याला आपली मुलगी सुखी समाधानाने नांदावी अशीच आस असते. त्यापोटीच चांगला वर शोधण्यासाठी पिता समाजात फिरतांना दिसतो. सध्या ग्रामीण भागासह शहरी भागातील वधू पित्याची नजर कमावत्या मुलांकडे वळली आहे. त्या दृष्टीने वधू पिता मुलांकरिता शोध मोहीम राबवित असल्याचे दिसून येत आहे. पण, शेतकरी पित्याची मुलगी असो वा नोकरदार पित्याची मुलगी, सर्वच शेतकरी मुलाकडे दुर्लक्ष करीत आहे.निसर्गाच्या दृष्टचक्र तोट्याचा ठरणारा शेती व्यवसाय आणि मुलींच्या पित्यांचे असलेले नोकरदार मुलांचे स्वप्न त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाहाच्छूक मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी आत्महत्यांमागे नैसर्गिक आणि शासनाच्या अनास्थेने निर्माण झालेल्या कारणांप्रमाणेच शेतकऱ्यांनी स्वत: भोवती गुंडाळून घेतलेले सामाजिक प्रतिष्ठेची प्रथाही कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते. पूर्वी मुला-मुलींच्या लग्नाचे बार धुमधडाक्यात उरकविण्याकरिता वाट्टेल ते करणाºया बहुतांश शेतकरी कुटुंबियांना आता बदलत्या परिस्थितीत मुलांचे लग्न जुळविण्याकरिता आटापिटा करावा लागत आहे. त्यामुळे मुलांकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करायला तयार होत आहे. तर काहींनी मुलींना हुंडाही दिल्याचे वास्तव असल्याने या परिस्थितीवरुन ‘मुला पेक्षा मुलगी बरी’ असे म्हणण्याची वेळ वर पित्यावर आली आहे.मुलींच्या शोधात वाढतेय वयवर्धा तालुक्यातील ६०० ते १ हजार लोकसंख्या असलेल्या अनेक गावांमध्ये लग्नाचे वय होऊनही लग्न जमत नसलेल्या शेतकरी मुलांचे वय आता ३५ ते ४० पार गेलेले दिसून येत आहे. परिसरात अनेक गावांमधील तरुण मंडळी मागील तीन ते चार वर्षांपासून लग्नाच्या प्रतिक्षेत आहे. तरी मुलगी मिळत नसल्याने शोधमोहीम सुरुच आहे. काही मुलांनी ‘तुम्हाला पाहिजे असेल तर पैसा देता, लग्नाचा संपूर्ण खर्च आम्हीच करतो. फक्त मुलगी द्या’ असाही निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. तरीही मुलगी मिळत नसल्याचे वास्तव आहेत.ही परिस्थिती वर्धा तालुक्याचीच नाही तर इतरही भागात हीच अवस्था आहेत.शेतकरी नवरा नको पण शेती हवीय...शेतकरी असलेल्या मुलांना मुली देण्यासाठी सध्या कोणताही पिता तयार होत नाही. आधी नोकरीला प्राधान्य दिले जाते. मुलगा नोकरीवर असल्यास त्याला मुलगी देण्याकरिता होकार दर्शवितात. परंतू काही ठिकाणी सध्या नोकरीसोबतच शेती आहे काय? असाही प्रश्न पुढे येतो.काहींना नोकरीसोबतच मुलाकडे शेतीही पाहिजे आहेत. यावरुन शेतकरी नवरा नको पण, शेती हवीय... कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :marriageलग्न