शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

देशात सामाजिक न्यायाची संकल्पना रुजायला हवी

By admin | Updated: October 22, 2014 23:23 IST

सामाजिक न्याय हा भारतीय संविधानाचा गाभा आहे. किंबहुना सामाजिक न्यायाचा अभिलेख म्हणजे भारतीय संविधान होय. आजच्या सुमारास भारतात सतत वाढत जाणारी पराकोटीची गरीबी, सामाजिक विषमता,

वर्धा : सामाजिक न्याय हा भारतीय संविधानाचा गाभा आहे. किंबहुना सामाजिक न्यायाचा अभिलेख म्हणजे भारतीय संविधान होय. आजच्या सुमारास भारतात सतत वाढत जाणारी पराकोटीची गरीबी, सामाजिक विषमता, स्त्री-पुरुष भेदभाव याबाबी सामाजिक न्यायाच्या मार्गातील अडसर ठरत आहे. याकरिता सर्व जागरुक नागरिकांनी सर्व स्तरावर विषमता निर्मूलनाची मोहीम राबवून देशात सामाजिक न्यायाची संकल्पना रूजवावी असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एस. कासारे यांनी केले. स्थानिक यशवंत महाविद्यालय येथे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. प्रमुख उपस्थिती प्रा. रवींद्र बेले, प्रा. एकनाथ मुरकुटे, प्रा. राजेश भटकर, प्रा. वैशाली देशमुख यांची होती.यावेळी सामाजिक न्याय व लोकशाही या विषयावर झालेल्या विचारमंथनात डॉ. कासारे यांनी विविध मुद्दे मांडले. भारतातील उपेक्षित पीडितांना रोजगाराची समान संधी, स्त्रीयांना विकासप्रक्रियेत समान वाटा मिळावा. मुख्यत: सामाजिक न्यायाशी संबंधित तरतूदी संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये असून नागरिकांनी सजग राहून शासनाकडून त्याची अंमलबजावणी करुन घेतली तरच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित होईल, असे विचार व्यक्त केले. यानंतर बोलताना डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना समाजाप्रती सहकार्य व बांधिलकीची जाणीव जोपासण्याचे आवाहन केले. याकरिता समाजाच्या विकासात योगदान द्यावे, तसेच त्यांनी यासाठी अभ्यासाचा व्यासंग जोपासत सामाजिक न्यायासाठी प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन करीत यातून येणाऱ्या पिढ्यावर सामाजिक न्यायाचे संस्कार होईल, लोकशाहीत वर्तमान नागरिकांप्रमाणेच भावी नागरिकांनाही महत्त्वाचे स्थान असते, असे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय बोबडे यांनी केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल सोनाली सालोडकर हिला मान्यवरांनी सन्मानित केले. कार्यक्रमाचे संचालन सुरज कांबळे यांनी केले तर आभार अपर्णा नारायणे यांनी मानले. तसेच अभ्यासमंडळ गठित करण्यात आले. यावेळी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)