शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
2
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
3
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
4
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
5
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
6
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
7
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
8
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
9
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
11
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
12
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
13
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
15
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
16
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
17
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
18
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
19
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
20
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य

गुरूदेव क्रांती ज्योत यात्रा सेवाग्राम आश्रमात

By admin | Updated: September 1, 2014 00:08 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच हजारो हुतात्म्याची बलीदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिले. गांधीजी आणि महाराजांचे स्वातंत्र्य पूर्वीचे व नंतरचे कार्य देशालाच नव्हे

सेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधी, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच हजारो हुतात्म्याची बलीदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिले. गांधीजी आणि महाराजांचे स्वातंत्र्य पूर्वीचे व नंतरचे कार्य देशालाच नव्हे तर जगासाठी आदर्श आहे. आज त्यांचे विचार, कार्य, भजने, गीत व तत्वज्ञान जगासाठी प्रासंगिक होत आहेत. देशातील नव्या पिढीला हा इतिहास माहिती व्हावा. राष्ट्रभक्ती, पे्रम, बलीदान याची जाणिव व जागृती निर्माण व्हावी तसेच राष्ट्रपुरुषांच्या यादीत वं. तुकडोजी महाराजांचा समावेश असावा यासाठी गुरुदेव क्रांती ज्योत यात्रा क्रांती दिनापासून काढण्यात आली आहे. शनिवारी ती सेवाग्राम आश्रमात पोहचली.आदी निवास मध्ये पालखी व क्रांती ज्योत ठेवून सामूदायिक प्रार्थना व सर्वधर्म प्रार्थना झाल्यानंतर उपस्थितांनी ज्योतिचे दर्शन घेतले. याबाबत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ आश्रमचे प्रचार सेवाधिकारी बबन वानखेडे यांनी यात्रेची माहिती दिली. ९ आॅगस्ट हा क्रांती दिन. याच दिवशी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्याच्या प्रचार युद्धात उडी घेतली. आष्टी (शहीद) येथे सभा घेतली. पुढे तळेगाव, आर्वी, खरांगणा, वर्धा, हिंगणघाट, वरोरा आणि चिमूर येथे सभा झाल्या. स्वातंत्र्यासाठी सर्वांनी लढा द्या. प्राणांचे बलीदान देण्याचा प्रसंग आला तरी मागे फिरू नका. हा देश आपला आहे. या माय भूमीला गुलामीतून मुक्त करण्याचे आवाहन महाराजांनी केले होते. भजन, गीते, खंजेरी यातून क्रांती घडली. २८ आॅगस्ट १९४२ रोजी चंद्रपूर येथे ब्रिटीशांनी त्यांच्या भजनातील शब्दाचा ‘गरूड’ आणि पत्थर सारे बनेंगे ‘बॉम्ब’ असा चुकीचा अर्थ काढून त्यांना तुरुंगात डांबले. यामुळे जनतेचा विरोध, आक्रोश वाढतच गेला. शेवटी तीन महिन्यानंतर दबावाला घाबरून सरकारने त्यांना मुक्त केले. वास्तविक महात्मा गांधीजींचे कार्य महाराजांनी पुढे नेले. खेड्या पाड्यात पोहचविले. हा इतिहास विसरून चालणार नाही. हाच इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवायचा आहे असे त्यांनी यावेळी ‘लोकमतशी’ बोलतांना सांगितले.वं. राष्ट्रसंतांच्या कार्याची भजनांची व गितांची दखल जगाने घेतली. ग्रामगीता हा ग्रंथ घरोघरी पोहचला. देशाचे प्रथम प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांशी सल्लामसलत केली. जपानमध्ये गाईलेले ‘हर देश मे तू’ या गाण्यातून परमेश्वर एक असल्याचे सांगितले. महाराजांचे कार्य एका क्रांतीकाराचे असले तरी, तरी ते अहिंसावादी होते. त्यांनी रचनात्मक कार्याला प्रेरणा दिली. असे असताना त्यांचा शासनाला विसर पडला आहे. याकरिता ही यात्रा काढण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. क्रांती ज्योत यात्रेत दमोधर पाटील, भानूदास कराळे, माणिक टोंग, नामदेव गव्हाळे, रामदास देशमुख, मंगेश सिरसाट सहभागी आहेत. आश्रमात दत्ताभाऊ राऊत, डॉ. शिवरचण ठाकूर, बाबाराव खैरकर, अशोक गिरी, सिद्धेश्वर, प्रशांत, हिराभाई, सागर कोल्हे, मालती, शोभा, ललीता, संगिता चव्हाण, प्रभा शहाणे, वैशाली आत्राम, माया ताकसांडे, वैशाली बघेल उपस्थित होते. (वार्ताहर)