शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

समूह संसाधन व्यक्तीची वर्धा-ठाणे वर्धिनी फेरी सुरू

By admin | Updated: August 9, 2015 02:14 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत येथे समूह संसाधन व्यक्ती यांची वर्धा ते ठाणे ८४ वर्धिनीच्या फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत येथे समूह संसाधन व्यक्ती यांची वर्धा ते ठाणे ८४ वर्धिनीच्या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीला जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे आदींच्या उपस्थितीत सहाय्यक प्रकल्प अधिकारी (डीआरडीए) प्रवीण भालेराव यांनी हिरवी झेंडी दाखविली.या फेरीचे नियोजन जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाद्वारे जिल्हा व्यवस्थापक अमोलसिंग रोटले, मनीष कावडे, मीनाक्षी अत्कुलवार, प्रवीण भांडारकर, सुकेशनी पाथार्डे व वर्धिनी संसाधन केंद्र चमू यांनी केले. वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी व सेलू या तालुक्यात इन्टेसिव्ह पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मुलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केलेली आहे. गरीब गरीबीतून बाहेर पडू शकतो, त्यासाठी त्यास आवश्यक सहाय्य दिले पाहिजे. या विश्वासातून गरिबांनी गरिबांच्या संस्था निर्माण करून त्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरिबांच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने कुशल आणि प्रभावी व्यासपीठ देण्यात येत आहे. भारतातील ज्या ज्या राज्यात दारिद्रय निर्मूलनाचे प्रयोग यशस्वी झाले. अशा राज्यामध्ये समुदाय संसाधन व्यक्ती यांनी अंत्यत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समुदाय संसाधन व्यक्ती म्हणजे गावपातळीवर कार्यरत असणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना मार्गदर्शन संघटन आणि सनियंत्रण करणाऱ्या व्यक्ती. अशा व्यक्ती त्या गावातील स्थानिक असाव्यात. समुदायातील असाव्यात जेणेकरुन त्याचे प्रश्न समस्या व गरजा इतरापेक्षा चांगल्या रितीने जाणू शकतात व सोडवू शकतात. वर्धिनी प्रत्यक्ष गावस्तरावर १५ दिवस रहवासी राहून सर्व्हे करणे, गटामध्ये समाविष्ट असणारे व गटाबाहेर असणाऱ्या महिलांची माहिती करणे, नवीन गटाची निर्मिती करणे, महिलांना अभियानात सहभागी करणे, गटाच्या सभा घेणे, मूलभूत गटाचे प्रशिक्षण घेणे, लेखे अध्यावत प्रशिक्षण घेणे, व्यावहारिक सजगता आणि बँक लिंकेजेसचे महत्त्व सांगणे, पंचायत राज व्यवस्थेबद्दल माहिती व ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढवणे इत्यादी कार्य करीत असतात. वर्धा जिल्ह्यातील एक स्वतंत्र कार्यप्रणाली असून ती एक प्रारूप म्हणून विकसित करावयाची आहे. वर्धा जिल्ह्यात एकूण १८४ वर्धिनीचे कॅडर तयार करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातून जिल्हास्तरावर स्वतंत्ररित्या रांउड पाढविण्यात येत असून आतापर्यंत यवतमाळ, गोंदिया येथे राउंड पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. या वर्धिनी फेरी यशस्वी करण्याकरिता जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाने सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)