शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

अनुदान वा आत्महत्येची परवानगी द्या !

By admin | Updated: May 25, 2016 02:18 IST

एक वर्ष लोटूनही मनरेगा अंतर्गत बांधलेल्या विहिरीचे अनुदान मिळाले नाही. यामुळे त्रस्त झालेल्या ...

मनरेगा विहीर बांधकामाचा तिढा : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनकारंजा (घा.) : एक वर्ष लोटूनही मनरेगा अंतर्गत बांधलेल्या विहिरीचे अनुदान मिळाले नाही. यामुळे त्रस्त झालेल्या येथील लाभार्थ्यांनी त्वरित अनुदान द्या, अन्यथा जीवन संपविण्याची परवानगी द्या, अशी लेखी मागणी शासनाकडे केली आहे. येथील शेतकरी मिराबाई माधवराव काळबांडे व ना. झो. बारई यांनी कारंजा ग्रामपंचायत असताना एक वर्षापूर्वी मनरेगा अंतर्गत आपल्या शेतात रितसर मंजुरी घेऊन सिंचन विहिरीचे खोदकाम व बांधकाम केले. बांधकाम करण्यासाठी नातेवाईक, मित्र मंडळी व गणगोताकडून रक्कम उभारली. स्वत: जवळ होते तेवढे पैसे खर्च केले. शासकीय अनुदान मिळेल, ओलित करून पीक घेऊ आणि उधारी फेडू, अशी आशा शेतकऱ्यांना होती; पण एक वर्ष लोटले तरी अद्याप विहिरीचे अनुदान प्राप्त झाले नाही. यामुळे या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. गतवर्षी नापिकी झाली. सोयाबीनने दगा दिला. कापसाला भाव मिळाला नाही. उत्पादन खर्चही निघाला नाही. पीक कर्ज थकित राहिले. मित्र मंडळीची उधारी परत करता आली नाही. कर्जदात्यांचा तगादा सुरू आहे. काय करावे कळत नाही. उपासमारीची वेळ आली आहे. यावर्षीची शेती कशी करायची, बियाणे, खते कुठून व कसे आणायचे हा प्रश्न आहे. कर्ज व व्याजाचा डोंगर वाढत आहे. शेती पडिक ठेवणे, हाच पर्याय आहे. कारंजा ग्रा.पं. चे रूपांतर आता नगर पंचायतमध्ये झाल्याने मनरेगा अंतर्गत झालेल्या विहिरीच्या बांधकामाचे पैसे नगर पंचायतला काढता येत नाही. पूर्ण झालेल्या या विहिरीच्या बांधकामाचे अनुदान कुणी द्यावे, हा तांत्रिक प्रश्न निर्माण झाला आहे. तांत्रिक अडचण सोडविण्याची जबाबदारी शासनाची असताना दिरंगाई केली जात आहे. बदललेल्या व्यवस्थेला अनेक गरीब शेतकरी बळी पडले आहे. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)शौचालय बांधकामाचे अनुदानही अडलेमनरेगा अंतर्गत झालेल्या विहिरीप्रमाणेच ग्रामपंचायत असताना ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत शौचालयांचे बांधकाम झाले. या बांधकामांचा निधी कुणी द्यायचा, हाही प्रश्न निर्माण झाला आहे. शेकडो नागरिकांनी या योजनेंतर्गत शौचालयांचे बांधकाम केले. काहीचे बांधकाम पूर्ण तर काहींचे अपूर्ण आहे; पण अद्याप अनुदान मिळाले नाही. शासनाची योजना व आदेशानुसार केलेल्या विहिरी असो वा शौचालय, बांधकामाचे अनुदान त्वरित मिळणे गरजेचे आहे. मनरेगातील विहिरींचे अनुदान शासनाने १५ दिवसांत द्यावे. अनुदान देण्याची कुवत व नियत नसेल तर आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी लेखी विनंती काळबांडे व बारई यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. अमर काळे, नगर पंचायत मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली आहे.