शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

दारू विक्रेत्यांना पकडा व दोन हजार रुपये मिळवा

By admin | Updated: September 9, 2014 23:53 IST

पहिले सर्वेक्षण नंतर रहिवासी प्रमाणपत्र नाकारण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला होता. यातून गावात दारूबंदी शक्य असल्याचे चित्र निर्माण झाले. अशात ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांच्या

किशोर तेलंग - तळेगाव(टा.)पहिले सर्वेक्षण नंतर रहिवासी प्रमाणपत्र नाकारण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला होता. यातून गावात दारूबंदी शक्य असल्याचे चित्र निर्माण झाले. अशात ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांच्या सहकार्याने दारूबंदी महिला मंडळ निर्माण करण्यात आले. आता गावात दारूविक्री करीत असलेल्या इसमास पकडा व दोन हजार रुपये मिळवा असा नवा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला आहे. दारूबंदी असताना तळेगाव येथे गल्लोगल्ली दारू मिळत होती. त्यामुळे गावात नेहमी वाद विवाद होत होते. शिवाय शाळकरी मुले दारूच्या आहारी गेले होते. या कारणाने गावात शांतता नांदावी यासाठी चार महिन्याअगोदर दारूबंदी बाबत सहमत व असहमत सर्वेक्षण चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहमत नोंदविले. यानंतर ग्रामपंचायतमध्ये दारूविक्रेत्यांची बैठक बोलावून चर्चा केली. त्यांच्याशी चर्चा करून १४ आॅगस्टपासून बंदीची घोषणा करीत गावभर दारूबंदीचे बॅनर लावून बंदी जाहीर केली. यावेळी अल्लीपूरचे ठाणेदार विजय मगर, ग्रामविकास अधिकारी हिरालाल राठोड, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थित दारूबंदीची सभा झाली. सभेमध्येही ठाणेदारांनी कुणी दारूविक्री करताना आढळल्यास मला भ्रमणध्वनी करा. मी फोन येताच पोलीस ताफा घेवून येईल, असे सांगतले. त्या गावात सकाळी पाच वाजतापासून दारूचे पाट वाहत होते व वादविवाद होत होते. पण आज गावात थोडी का होईना शांतता पाहायला मिळत आहे. रोज गावामध्ये पोलिसांचा ताफा येत आहे. शिवाय तेजस्वीनी महिला मंडळ दररोज गावात रात्री फिरत आहे.महिला मंडळ दररोज गावात फिरत असल्याने या पोलिसांचे दर्शनही गावात होत असल्याने दारूविक्रेत्यांचे धाबे दणानले आहे. त्या गावात सदैव सकाळपासून दारूचे पाट वाहत होते त्या गावात शांतता नांदत आहे. शिवाय पोलीस प्रशासनाचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यात काहींनी गडबड करण्याचा प्रयत्न केला. गावातील काही विघ्नसंतोषी नागरिकांनी दारू विक्रेत्यांना मदत करीत त्यांना दारू विकण्याचा प्रयत्न चालविल्याचे समोर आले. गावातील तेजस्वीनी महिला मंडळाच्या महिला रोजच्या वेळेत गावात गेले असता काही दारू विकत असताना आढळून आले. लगेच पोलिसाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र दारू विक्रेते पोलिसांच्या हाती आले नाही. यामुळे दारूबंदीला जोपर्यंत गावकरी हातभार लावीत नाही तोपर्यंत पूर्णपणे अंमलबजावणी शक्य नसल्याचे समोर आले. यामुळे ग्रामपंचायतीने कुणी दारू विक्रेत्यांना पकडून दिल्यास दोन हजार रुपये पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला.