शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

वनकामगारांचे आमरण उपोषण

By admin | Updated: August 9, 2015 02:12 IST

वनविभागातील विविध कामांसाठी ठेवण्यात आलेल्या बारमाही वनकामगारांना अचानक कामावरून बंद केले.

अचानक कामावरून केले कमी : दोन दिवसानंतरही प्रशासन सुस्तआष्टी : वनविभागातील विविध कामांसाठी ठेवण्यात आलेल्या बारमाही वनकामगारांना अचानक कामावरून बंद केले. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात एका कर्मचाऱ्याने आमरण तर चौघांनी साखळी उपोषण वनविभागाच्या कार्यालयासमोर सुरू केले आहे. दोन दिवस लोटूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. वर्धा जिल्ह्यातील वनविभागाच्या सेवा जेष्ठता यादीमध्ये २२ वनकामगार कार्यरत होते. यापैकी आष्टी तालुक्यातील ४ कर्मचारी कार्यरत होते. वनविभागाने ३ जून १९९१ साली मोई येथील बाला पवार यांना आॅर्डर दिली. त्यांना सेवाजेष्ठता यादीप्रमाणे नियमीत केले नाही. सेवानिवृत्तीचे वय संपले असल्यावरून कामावरून कमी करण्यात येत असल्याचे पत्र देऊन वनविभाग मोकळा झाला. याविरोधात पवार यांनी उपवनसंरक्षक वर्धा यांच्याकडे पत्रव्यवहार केला. मात्र ह्याचा काहीच फायदा झाला नाही. शिवाय विशाल खोडे, गुलाब केवटे, दिलीप मडावी, प्रितम वानखडे या चारही कर्मचाऱ्यांवरदेखील अन्याय झाला आहे. याविरोधात ७ आॅगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. याकडे वनविभागाचे अधिकारी अद्याप फिरकले नाही. वनविभागातील बारमाही वनकर्मचाऱ्यांनी एफडीसीएम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही फायदा झाला नाही. प्लॅन्टेशनच्या कामावर मजुरांना लावण्यात आले नाही. वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवा देवूनही पेन्शनसुविधा नाही. उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल केले जाते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे, वनविभागात कामे असूनही अधिकाऱ्यांनी कामे दिली नाही. त्यामुळे वनकर्मचारी अरूण उईके, उमरी सावरकर, संगीता कुचकार, आदिनाथ मानकर, अशोक वानखडे आष्टी, जनार्दन पाटील, सरस्वता कानोडे, शेवंता परतेकी या कर्मचाऱ्यांना मृत्यू ओढवला. त्यांना कोणतीही मदत दिली नाही. यासह अनेक मागण्या शासनदरबारी पडून आहे. अधिकारी वेळ काढूपणाची भूमिका राबवित असून न्याय देत नाही. उपोषण मंडपात बसलेले बाला पवार यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यावर प्रशासनाने तत्काळ तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे. आष्टी वनपरिक्षेत्राप्रमाणेच जिल्ह्याची स्थिती आहे.सामाजिक वनीकरण कार्यालयानेही असाच प्रकार केला आहे. वनकर्मचारी यांना कामे दिल्या जात नाही. कुटूंब कसे पोसावे असा प्रश्न मजुरांसमोर आहे.(प्रतिनिधी)एकाची प्रकृती खालावलीवनविभागातील बारमाही वनकर्मचाऱ्यांनी एफडीसीएम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही फायदा झाला नाही. प्लॅन्टेशनच्या कामावर मजुरांना लावण्यात आले नाही. वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवा देवूनही पेन्शनसुविधा नाही. उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल केले जाते. अधिकारी वेळ काढूपणाची भूमिका राबवित असून न्याय देत नसल्याची ओरड होत आहे.