शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

वनकामगारांचे आमरण उपोषण

By admin | Updated: August 9, 2015 02:12 IST

वनविभागातील विविध कामांसाठी ठेवण्यात आलेल्या बारमाही वनकामगारांना अचानक कामावरून बंद केले.

अचानक कामावरून केले कमी : दोन दिवसानंतरही प्रशासन सुस्तआष्टी : वनविभागातील विविध कामांसाठी ठेवण्यात आलेल्या बारमाही वनकामगारांना अचानक कामावरून बंद केले. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात एका कर्मचाऱ्याने आमरण तर चौघांनी साखळी उपोषण वनविभागाच्या कार्यालयासमोर सुरू केले आहे. दोन दिवस लोटूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. वर्धा जिल्ह्यातील वनविभागाच्या सेवा जेष्ठता यादीमध्ये २२ वनकामगार कार्यरत होते. यापैकी आष्टी तालुक्यातील ४ कर्मचारी कार्यरत होते. वनविभागाने ३ जून १९९१ साली मोई येथील बाला पवार यांना आॅर्डर दिली. त्यांना सेवाजेष्ठता यादीप्रमाणे नियमीत केले नाही. सेवानिवृत्तीचे वय संपले असल्यावरून कामावरून कमी करण्यात येत असल्याचे पत्र देऊन वनविभाग मोकळा झाला. याविरोधात पवार यांनी उपवनसंरक्षक वर्धा यांच्याकडे पत्रव्यवहार केला. मात्र ह्याचा काहीच फायदा झाला नाही. शिवाय विशाल खोडे, गुलाब केवटे, दिलीप मडावी, प्रितम वानखडे या चारही कर्मचाऱ्यांवरदेखील अन्याय झाला आहे. याविरोधात ७ आॅगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. याकडे वनविभागाचे अधिकारी अद्याप फिरकले नाही. वनविभागातील बारमाही वनकर्मचाऱ्यांनी एफडीसीएम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही फायदा झाला नाही. प्लॅन्टेशनच्या कामावर मजुरांना लावण्यात आले नाही. वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवा देवूनही पेन्शनसुविधा नाही. उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल केले जाते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे, वनविभागात कामे असूनही अधिकाऱ्यांनी कामे दिली नाही. त्यामुळे वनकर्मचारी अरूण उईके, उमरी सावरकर, संगीता कुचकार, आदिनाथ मानकर, अशोक वानखडे आष्टी, जनार्दन पाटील, सरस्वता कानोडे, शेवंता परतेकी या कर्मचाऱ्यांना मृत्यू ओढवला. त्यांना कोणतीही मदत दिली नाही. यासह अनेक मागण्या शासनदरबारी पडून आहे. अधिकारी वेळ काढूपणाची भूमिका राबवित असून न्याय देत नाही. उपोषण मंडपात बसलेले बाला पवार यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यावर प्रशासनाने तत्काळ तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे. आष्टी वनपरिक्षेत्राप्रमाणेच जिल्ह्याची स्थिती आहे.सामाजिक वनीकरण कार्यालयानेही असाच प्रकार केला आहे. वनकर्मचारी यांना कामे दिल्या जात नाही. कुटूंब कसे पोसावे असा प्रश्न मजुरांसमोर आहे.(प्रतिनिधी)एकाची प्रकृती खालावलीवनविभागातील बारमाही वनकर्मचाऱ्यांनी एफडीसीएम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही फायदा झाला नाही. प्लॅन्टेशनच्या कामावर मजुरांना लावण्यात आले नाही. वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवा देवूनही पेन्शनसुविधा नाही. उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल केले जाते. अधिकारी वेळ काढूपणाची भूमिका राबवित असून न्याय देत नसल्याची ओरड होत आहे.