शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशांच्या बंधनातून पुलगाव-आर्वी शकुंतला मुक्त करा

By admin | Updated: August 27, 2016 00:31 IST

जिल्ह्याची ओळख असलेली इंग्रजकालीन नॅरोगेज रेल्वे म्हणजेच जिवाभावाची शकुंतला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बिटीशांची गाडी म्हणून ओलखली जात आहे.

रामदास तडस : आमला स्टेशनपर्यंत मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी लोकसभेत शून्य प्रहरात मागणीपुलगाव : जिल्ह्याची ओळख असलेली इंग्रजकालीन नॅरोगेज रेल्वे म्हणजेच जिवाभावाची शकुंतला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बिटीशांची गाडी म्हणून ओलखली जात आहे. काही वर्षांपूर्वी ती बंदही करण्यात आली. त्यामुळे ब्रिटिशांच्या बंधनातून पुलगाव आर्वी शकुंतला रेल्वे मुक्त करून ती ब्रॉडगेज करा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी शून्य प्रहारात लोकसभेत केली.व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रज भारतात आले आणि राज्यकर्ते होऊन बसले. जिल्ह्यात कवठा येथे त्यांचे मुख्यालय होते. येथूनच त्यांचा व्यापार चालत असे. सर्व भौगोलिक सुविधा व वऱ्हाडातील कापसाचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन, बाजारपेठ परिसरात चालणारा दूध दही व लोण्याचा व्यापार, आष्टी-वरूड भागातील उत्पादन या सर्व बाबीचा व्यावसायिक दृष्टीने विचार करून हावडा-मुंबई या रेल्वे मार्गावर वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम करून ब्रीज टाऊन पुलगाव शहराची निर्मिती करून ब्रिटिशांनी केली. या परिसराचे महत्व लक्षात घेत पुलगाव-आर्वी हा नॅरोगेज रेल्वेमार्ग शतकापूर्वी सुरू करून परिसरातील जनतेसाठी दळणवळणाचे नवीन दालन सुरू केले होते. देश १९४७ साली स्वातंत्र्य झाला. परंतु ही शकुंतला २०१६ पर्यंत ब्रिटीशांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे ब्रिटीशांच्या बंधनातून पुलगाव-आर्वी शकुंतला मुक्त करून आमला स्टेशन पर्यंत तिचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करा, अशी मागणी वर्धा लोकसभा क्षेत्राचे खा. रामदास तडस यांना शून्य प्रहारात लोकसभेत केली.शतकापूर्वी सुरू करण्यात आलेली ही पुलगाव आर्वी शकुंतला दशकापूर्वी तत्कालीन केंद्र शासनाने बंद केली. पूर्वी दळणवळणाचे कुठलेही साधन नसताना ५ आण्यात आर्वीचा प्रवास होत असे. पुलगाव-आर्वी दरम्यान येणाऱ्या ग्रामीण भागातील दळणवळणाचे एकमात्र साधन असलेली ही शकुंतला दिवसातून तीनदा धावत होती. त्यामुळे या दोन शहरादरम्यान दुग्धव्यवसाय करणारे गोपाल, नोकरीसाठी शहरात येणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी यांचे आवागमन चालत असे. प्रवासी गाडीच्या व्यतिरिक्त पुलगाव-आर्वी दरम्यान व्यावसायिक दृष्ट्या मालगाडी देखील धावत होती. ही रेल्वे ब्रिटीश कंपनीच्या ताब्यात असल्यामुळे दर दहा वर्षानी या रेल्वेचा भारतीय रेल्वे व ब्रिटीश कंपनीमध्ये करार व्हायचा. शेवटचा करार २००६ मध्ये होवून २०१६ पर्यंत राहणार आहे.पुलगाव शहरात १८८९ साली पुलगाव कॉटन मील या मोठ्या वस्त्रोद्योगाची सुरूवात झाली. केंद्रीय दारूगोळा भांडारही स्थापन झाले. हेच महत्व लक्षात घेत पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेगाडी सुरू करून पुलगाव जंक्शन झाले. परंतु २००७ पासून ही शकुंतला बंद करून या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगे्रजमध्ये रूपांतर करून आमला या रेल्वे स्थानकापर्यंत ही रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीला वाटण्याच्या अक्षदा दाखविण्यात आल्या. खासदार तडस यांनी ६ आॅगस्ट २०१४ रोजी लोकसभेत रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी पुलगाव-आर्वी आमला रेल्वे मार्गाच्या रूंदीकरणाचा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान केंद्र शासनाने अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ या रेल्वे मार्गासाठी १५०० कोटी दिले. मग पुलगाव आर्वी आमला या रेल्वेमार्गासाठी भेदभाव का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्वी-आष्टी वरूड-पुलगाव येथील नागरिकांनी १०० कि़मी. रेल्वे मिशन समिती स्थापन करून ही मागणी लावून धरली आहे. शहरातील विविध संस्था व संघटनांचे या चळवळीला सहकार्य मिळत आहे.(तालुका प्रतिनिधी)