शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशांच्या बंधनातून पुलगाव-आर्वी शकुंतला मुक्त करा

By admin | Updated: August 27, 2016 00:31 IST

जिल्ह्याची ओळख असलेली इंग्रजकालीन नॅरोगेज रेल्वे म्हणजेच जिवाभावाची शकुंतला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बिटीशांची गाडी म्हणून ओलखली जात आहे.

रामदास तडस : आमला स्टेशनपर्यंत मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी लोकसभेत शून्य प्रहरात मागणीपुलगाव : जिल्ह्याची ओळख असलेली इंग्रजकालीन नॅरोगेज रेल्वे म्हणजेच जिवाभावाची शकुंतला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बिटीशांची गाडी म्हणून ओलखली जात आहे. काही वर्षांपूर्वी ती बंदही करण्यात आली. त्यामुळे ब्रिटिशांच्या बंधनातून पुलगाव आर्वी शकुंतला रेल्वे मुक्त करून ती ब्रॉडगेज करा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी शून्य प्रहारात लोकसभेत केली.व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रज भारतात आले आणि राज्यकर्ते होऊन बसले. जिल्ह्यात कवठा येथे त्यांचे मुख्यालय होते. येथूनच त्यांचा व्यापार चालत असे. सर्व भौगोलिक सुविधा व वऱ्हाडातील कापसाचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन, बाजारपेठ परिसरात चालणारा दूध दही व लोण्याचा व्यापार, आष्टी-वरूड भागातील उत्पादन या सर्व बाबीचा व्यावसायिक दृष्टीने विचार करून हावडा-मुंबई या रेल्वे मार्गावर वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम करून ब्रीज टाऊन पुलगाव शहराची निर्मिती करून ब्रिटिशांनी केली. या परिसराचे महत्व लक्षात घेत पुलगाव-आर्वी हा नॅरोगेज रेल्वेमार्ग शतकापूर्वी सुरू करून परिसरातील जनतेसाठी दळणवळणाचे नवीन दालन सुरू केले होते. देश १९४७ साली स्वातंत्र्य झाला. परंतु ही शकुंतला २०१६ पर्यंत ब्रिटीशांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे ब्रिटीशांच्या बंधनातून पुलगाव-आर्वी शकुंतला मुक्त करून आमला स्टेशन पर्यंत तिचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करा, अशी मागणी वर्धा लोकसभा क्षेत्राचे खा. रामदास तडस यांना शून्य प्रहारात लोकसभेत केली.शतकापूर्वी सुरू करण्यात आलेली ही पुलगाव आर्वी शकुंतला दशकापूर्वी तत्कालीन केंद्र शासनाने बंद केली. पूर्वी दळणवळणाचे कुठलेही साधन नसताना ५ आण्यात आर्वीचा प्रवास होत असे. पुलगाव-आर्वी दरम्यान येणाऱ्या ग्रामीण भागातील दळणवळणाचे एकमात्र साधन असलेली ही शकुंतला दिवसातून तीनदा धावत होती. त्यामुळे या दोन शहरादरम्यान दुग्धव्यवसाय करणारे गोपाल, नोकरीसाठी शहरात येणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी यांचे आवागमन चालत असे. प्रवासी गाडीच्या व्यतिरिक्त पुलगाव-आर्वी दरम्यान व्यावसायिक दृष्ट्या मालगाडी देखील धावत होती. ही रेल्वे ब्रिटीश कंपनीच्या ताब्यात असल्यामुळे दर दहा वर्षानी या रेल्वेचा भारतीय रेल्वे व ब्रिटीश कंपनीमध्ये करार व्हायचा. शेवटचा करार २००६ मध्ये होवून २०१६ पर्यंत राहणार आहे.पुलगाव शहरात १८८९ साली पुलगाव कॉटन मील या मोठ्या वस्त्रोद्योगाची सुरूवात झाली. केंद्रीय दारूगोळा भांडारही स्थापन झाले. हेच महत्व लक्षात घेत पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेगाडी सुरू करून पुलगाव जंक्शन झाले. परंतु २००७ पासून ही शकुंतला बंद करून या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगे्रजमध्ये रूपांतर करून आमला या रेल्वे स्थानकापर्यंत ही रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीला वाटण्याच्या अक्षदा दाखविण्यात आल्या. खासदार तडस यांनी ६ आॅगस्ट २०१४ रोजी लोकसभेत रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी पुलगाव-आर्वी आमला रेल्वे मार्गाच्या रूंदीकरणाचा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान केंद्र शासनाने अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ या रेल्वे मार्गासाठी १५०० कोटी दिले. मग पुलगाव आर्वी आमला या रेल्वेमार्गासाठी भेदभाव का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्वी-आष्टी वरूड-पुलगाव येथील नागरिकांनी १०० कि़मी. रेल्वे मिशन समिती स्थापन करून ही मागणी लावून धरली आहे. शहरातील विविध संस्था व संघटनांचे या चळवळीला सहकार्य मिळत आहे.(तालुका प्रतिनिधी)