शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

निम्न वर्धाची पाच दारे उघडली

By admin | Updated: August 5, 2015 02:06 IST

जिल्ह्यात सोमवारी दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्रभर सुरू असल्याने आठही तालुक्यात सरासरी २९६.५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

दमदार पाऊस : बळीराजा सुखावलावर्धा: जिल्ह्यात सोमवारी दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्रभर सुरू असल्याने आठही तालुक्यात सरासरी २९६.५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ही नोंद मंगळवारी सकाळची असून दिवसभर पाऊस सुरूच होता. यामुळे दुपारी ३ वाजताच्या सुमारास निम्न वर्धा धरणाची पाच दारे २२ सेंटीमिटरने उघडण्यात आली. यातून ६२ क्यूसेक पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती आहे.सोमवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारी दुपारीही सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी कमी उंचीच्या नाल्यावरून पाणी गेल्याने नागरिकांना पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागली. वर्धा शहरातील रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्याचे दिसून आले आहे. तर बॅचलर मार्गावरील न्यू आर्टस् महाविद्यालयाजवळही पाणी साचले होते. याचा त्रास या मार्गाने जात असलेल्या नागरिकांना सहन करावा लागला. तर हवालदारपूरा येथील जनार्धन पाटील यांच्या घराशेजारी असलेल्या एका जुन्या इमारतीची भिंत कोसळली. यात कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी पाटील यांच्या घरात तिचा मलबा पडला आहे. तळेगाव (श्यामजीपंत) येथील राष्ट्रीय महामार्गावरील पाणी शेतात शिरले. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे. हमदारपूर मार्गावर असलेल्या कमी उंचीच्या पुलावरून पाणी गेल्याने नागरिकांना पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. जिल्ह्यातील काही भागात पाणबसण जमिनीत पाणी साचल्याने उभी असलेली पिके पिवळी पडण्याचा धोका उद्भवण्याचे संकेत शेतकऱ्यांनी दिले आहेत. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेला हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असला तरी सर्वाधिक पाऊस वर्धा तालुक्यात पडल्याची नोंद आहे. वर्धा तालुक्यात ५९ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. गत १५ दिवसांपूर्वी बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाऊस आला. त्यावेळी आलेला पाऊस मरणासन्न अवस्थेत असलेल्या पिकांकरिता संजीवनी ठरला. त्या काळापासून पाऊस बेपत्ता झाला. तो सोमवारी दुपारपासून बरसला आहे. त्याची धार मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरूच होती. हा पाऊस असाच सुरू राहिला तर निम्न वर्धा धरणाची आणखी दारे उघडण्याची वेळ येवू शकते असे तेथील अभियंत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुरू असलेला पाऊस असाच राहिला तर जलसाठ्यांची खालावलेली पातळी लवकरच भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गत २४ तासात जिल्ह्यात एकूण २९६.५० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. सरासरी ३७.०६ मि.मी. एवढा पाऊस झालेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ हजार ७२०.१५ मि.मी. पाऊस झाला असून सरासरी ४६५.०२ एवढा पाऊस झाला आहे. २४ तासात वर्धा तालुक्यात सर्वाधिक ५९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ४६५.०२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.तालुका पाऊस मिमीवर्धा ५९.००सेलू११.००देवळी४४.००हिंगणघाट२८.३०समुद्रपूर ४३.००आर्वी ३५.००आष्टी५१.४०कारंजा२४.८०