शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अखेर वर्धा पालिकेला आली जाग

By admin | Updated: May 21, 2015 02:02 IST

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांचा उपसा करून पाणी वाहून जाण्याकरिता त्या मोकळ्या करण्याची जबाबदारी पालिकेची आहे.

वर्धा : पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांचा उपसा करून पाणी वाहून जाण्याकरिता त्या मोकळ्या करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. असे असताना त्यांच्याकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले. याची दखल घेत पालिकेच्या बांधकाम विभागाद्वारे शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली. वर्धा शहरातून तीन मोठे नाले वाहत आहेत. शहरातील छोट्या नालीतील पाणी या मोठ्या नाल्यात येते. यामुळे या नाल्यातील कचरा उपसण्याची गरज आहे. यंदा जून महिन्याच्या प्रारंभीलाच मान्सून धडकणार असल्याचे संकेत वेध शाळेने दिले आहे. त्या अनुशंगाने पालिकेच्यावतीने शहरातील नाल्यांची स्वच्छता करणे क्रमाप्राप्त असतानाही यासंदर्भातील उपाययोजनेसंदर्भात पालिकेत साधी बैठकही घेण्यात आली नव्हती.नालेसफाई व्हावी तसेच ही बाब शहरवासीयांच्या निदर्शनास यावी यासाठी लोकमतमध्ये ‘पावसाच्या तोडावर नाल्या तुंबलेल्याच’ आणि ‘शहरातील स्वच्छतेवर पालिकेची चुप्पी’ अश्या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच सुरू झालेल्या सफाईच्या कामांवरूनही ही बाब प्रत्ययास येत आहे. यासंदर्भात पालिकेतील संबंधित अधिकारी वर्गाला या बाबत विचारले असता पालिकेच्या पैशाची बचत करण्यासाठी पालिकेच्याच बांधकाम विभागाला नाले सफाईसंदर्भात पत्र देण्यात आले. त्यानुसार पालिकेतील सफाई कामगारांच्या सहकार्याने नालेसफाईला सुरुवात केली असून लवकरच काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. सध्या शहरातील मुख्य मार्गावरील नाल्यांच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. पावसापूर्वीच शहरातील सर्वच नाल्यांची सफाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सफाईकामांमुळे नाल्याही मोकळा श्वास घेत असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी)