शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

अखेर वर्धा पालिकेला आली जाग

By admin | Updated: May 21, 2015 02:02 IST

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांचा उपसा करून पाणी वाहून जाण्याकरिता त्या मोकळ्या करण्याची जबाबदारी पालिकेची आहे.

वर्धा : पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांचा उपसा करून पाणी वाहून जाण्याकरिता त्या मोकळ्या करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. असे असताना त्यांच्याकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले. याची दखल घेत पालिकेच्या बांधकाम विभागाद्वारे शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली. वर्धा शहरातून तीन मोठे नाले वाहत आहेत. शहरातील छोट्या नालीतील पाणी या मोठ्या नाल्यात येते. यामुळे या नाल्यातील कचरा उपसण्याची गरज आहे. यंदा जून महिन्याच्या प्रारंभीलाच मान्सून धडकणार असल्याचे संकेत वेध शाळेने दिले आहे. त्या अनुशंगाने पालिकेच्यावतीने शहरातील नाल्यांची स्वच्छता करणे क्रमाप्राप्त असतानाही यासंदर्भातील उपाययोजनेसंदर्भात पालिकेत साधी बैठकही घेण्यात आली नव्हती.नालेसफाई व्हावी तसेच ही बाब शहरवासीयांच्या निदर्शनास यावी यासाठी लोकमतमध्ये ‘पावसाच्या तोडावर नाल्या तुंबलेल्याच’ आणि ‘शहरातील स्वच्छतेवर पालिकेची चुप्पी’ अश्या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच सुरू झालेल्या सफाईच्या कामांवरूनही ही बाब प्रत्ययास येत आहे. यासंदर्भात पालिकेतील संबंधित अधिकारी वर्गाला या बाबत विचारले असता पालिकेच्या पैशाची बचत करण्यासाठी पालिकेच्याच बांधकाम विभागाला नाले सफाईसंदर्भात पत्र देण्यात आले. त्यानुसार पालिकेतील सफाई कामगारांच्या सहकार्याने नालेसफाईला सुरुवात केली असून लवकरच काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. सध्या शहरातील मुख्य मार्गावरील नाल्यांच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. पावसापूर्वीच शहरातील सर्वच नाल्यांची सफाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सफाईकामांमुळे नाल्याही मोकळा श्वास घेत असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी)