शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाने कामे रखडली

By admin | Updated: August 6, 2014 23:59 IST

शासनाने प्रलंबित समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने १ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शासकीय कार्यालये ओस

आर्वी : शासनाने प्रलंबित समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने १ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शासकीय कार्यालये ओस पडली असून नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत़ यावर तोडगा निघाला नसल्याने सामान्य नागरिक नाहक वेठीस धरले जात आहे.महसूल विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला होता़ मात्र शासनाने या आंदोलनाची दखल न घेता केवळ आश्वासने देण्यात आली, असा आरोप संघटनेने केला आहे़ नायब तहसीलदार पदाला राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला़ परंतु वेतन वाढवून देण्यात आले नाही़ महसूल विभागातील लिपिकाचे पदनाम बदलून त्यांना महसूल सहाय्यक असे पदनाम देण्यात यावे, नायब तहसीलदार संवर्गातील पदे पदोन्नतीच्या माध्यमाने भरण्यात यावे, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी पदाकरिता गृहविभागाच्या धर्तीवर महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के जागा रिक्त ठेवण्यात यावे, राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सायकल ऐवजी मोटरसायकलचे अग्रीम रक्कम देण्यात यावी, शिपाई प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना तलाठी पदासाठी पदोन्नती द्यावी, अनुकंपा तत्वावर सेवाभरतीसाठी टक्केवारीची अट रद्द करावी, हवालदार नाईक दप्तरी पदाचे मुळवेतन लिपिकाप्रमाणे द्यावे, जे वाहनचालक १२ ते १६ तास काम करतात त्यांना विशेष भत्ता द्यावा, व्यापगत झालेली पदे पुन्हा नव्याने भरण्यात यावी, महसूल कर्मचाऱ्यांवर अनेकदा विनाकारण हल्ले व मारहाण करण्याचे प्रकार सुरू झाले़ त्यावर आळा घालण्यासाठी विशेष कायदा करावा, शासनाच्या अनेक योजना राबविताना शासन महसूल विभागावर विशेष भर देते़ यापुढे या योजनांसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावे, इत्यादी मागण्या संघटनेने शासनाकडे पुढे केल्या आहेत़आंदोलनात सरचिटणीस एच़ एम़ लोखंडे, व्ही़ आऱ गोमासे, पी़ एस़ घाडगे, एम़ पी़ दहेलकर, ड़ी़ सी़ राऊत, यु़ जी़ कळंबे, एम़ व्ही़ गोल्डे, आशा निंभोरकर, एम़ व्ही़ तितरे, व्ही़ एस़ ढुमणे, एस़ एस़ मानेकर, आऱ बी़ मानेकर, आऱ बी़ वनकर, एम़ आऱ थुल, आऱ एच़ देशमुख, पी़ के़ अग्निहोत्री, सुमन इंगोले, जी़ डी़ फरकाडे, व्ही़ एम़ मांडवकर यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत़ या मागण्या तातडीने निकाली काढून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)