शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

बाकळी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: February 23, 2015 01:48 IST

देशात नदी स्वच्छता मोहीम तर राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे़ एकाचा उद्देश नद्यांचे पात्र स्वच्छ करून प्रदूषणापासून बचाव करण्याचा...

वर्धा : देशात नदी स्वच्छता मोहीम तर राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे़ एकाचा उद्देश नद्यांचे पात्र स्वच्छ करून प्रदूषणापासून बचाव करण्याचा तर दुसऱ्या योजनेचा उद्देश पाणीटंचाईवर कायम उपाययोजना करण्याचा आहे; पण या दोन्ही योजना अद्यापही जिल्ह्यातील नद्यांना शिवल्याच नसल्याचे दिसते़ आर्वी आणि आष्टी तालुक्यात पावसाळ्यात कहर माजविणारी बाकळी नदी अद्यापही स्वच्छतेपासून कोसोदूर आहे़ ही नदी प्रदूषणाच्या विळख्यातून कधी बाहेर निघणार, असा सवाल नांदपूर, टाकरखेड व आर्वी येथील नागरिक उपस्थित करीत आहेत़देशस्तरावर गंगा स्वच्छता अभियान राबविले जात आहे़ या अभियानामुळे देशातील अन्य नद्याही घाण आणि प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; पण वर्धा जिल्ह्यात नदी स्वच्छता अभियान धाम नदीलाच केवळ शिवलेच़ या अभियानात नदीचे पात्र तसूभरही स्वच्छ झाले नाही़ लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सुरू झालेले हे अभियान केवळ दिवसापूरतेच राहिले़ यानंतर कुठेही नदी स्वच्छता अभियान हा उपक्रम राबविण्यात आला नाही़ वर्धा जिल्ह्याला बोर, धाम, वर्धा, वणा, बाकळी, भदाडी, यशोदा आदी नद्यांचे सामर्थ्य लाभले आहे़ या नद्यांचे पात्रही स्वच्छ होणे गरजेचे आहे; पण याकडे कुणाचे लक्षच गेले नसल्याचे दिसून येत आहे़ बाकळी नदीला येणाऱ्या पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होते; पण ही नदी स्वच्छ करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे़ या नद्या स्वच्छ होणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)बाकळीच्या पात्रामध्ये काटेरी झुडपे; नदीचे अस्तित्व धोक्यातटाकरखेड, नांदपूर, आर्वी अशी निरंतर वाहणारी बाकळी नदीच सध्या काटेरी झुडपे, घाणीचे साम्राज्य, नदीच्या काठावरील विटांच्या भट्ट्या आणि अन्य कारणांमुळे धोक्यात आली आहे़ बाकळीच्या पात्रात प्रत्येक ठिकाणी केवळ काटेरी झुडपे दिसून येतात़ यामुळे नदीचे पात्र अत्यंत निमूळते झाले आहे़ काही ठिकाणी ही नदी नसून नाला असल्याचाच भास होतो़ सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणारी, वर्षभर विहिरी, हातपंपांची पाणी पातळी टिकवून ठेवणारी आणि वेळप्रसंगी पिण्यायोग्य गोड पाणी पुरविणारी बाकळी नदी सध्या प्रदूषणाच्याच विळख्यात सापडली आहे़ नांदपूर येथे तर या नदीचे पात्र नाल्यासमच झाले आहे़ यामुळे पावसाळ्यात पूर आल्यास नागरिकांच्या घरांमध्ये, शेतांमध्ये पाणी शिरते व लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागते़ हा प्रकार गत तीन वर्षांपासून जिल्ह्यात घडत आहे़पावसाळ्यातच आठवतात उपाययोजनापावसाळ्यामध्ये वर्धा, बोर आणि बाकळी नदीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाला उपाययोजनांची आठवण होते़ त्याही तात्पूरत्या स्वरूपाच्याच असतात़ कुटुंबांचे स्थलांतरण व बचावासाठी प्रयत्न होत असताना नुकसानच होऊ नये म्हणून कुठलेही प्रयत्न होत नाही़ बाकळी नदीचे पात्र साफ करून खोलीकरण व रूंदीकरण केल्यास नुकसान टाळणे शक्य आहे़