शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जिल्ह्यात अतिसार पंधरवड्यालाच ‘अतिसार’

By admin | Updated: August 1, 2014 00:24 IST

अतिसारावर प्रतिबंध लाावण्याकरिता शासनाच्यावतीने अतिसार पंधरवडा जाहीर केला. दोन आठवड्यात राबविण्यात येत असलेल्या या पंधरवड्यात वाटण्यात येणार असलेल्या गोळ्या व ओआरएस पावडरचा

औषधीच नाही : सव्वा लाख चिमुकल्यांना प्रतीक्षारूपेश खेरी - वर्धाअतिसारावर प्रतिबंध लाावण्याकरिता शासनाच्यावतीने अतिसार पंधरवडा जाहीर केला. दोन आठवड्यात राबविण्यात येत असलेल्या या पंधरवड्यात वाटण्यात येणार असलेल्या गोळ्या व ओआरएस पावडरचा साठाच आला नाही. पंधरवडा सुरू होऊन पाच दिवसांचा कालावधी होत असला तरी जिल्ह्यात आवश्यक औषधीसाठा आला नसल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडत आहे.नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अतिसारामुळे चिमुकल्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले. हे प्रमाण शंभर बालकांमागे ११ असे असल्याने यावर प्रतिबंध लावण्याकरिता शासनाच्यावतीने २८ जुलैपासून अतिसार पंधरवाडा जाहीर करण्यात आला. या पंधरवड्यात शुन्य ते पाच वयोगटातील चिमुकल्यांच्या घरांचा शोध घेत त्यांना ओआरएस पावडर व झिंक या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पंधरवडा जाहीर करण्यापूर्वी आवश्यक औषधीसाठा जिल्ह्यात येणे आवश्यक होत; मात्र तसे झाले नाही.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत येत असलेल्या रुग्णालयांना औषधी पुरविण्याकरिता शासनाकडून केंद्रीय स्तरावर खरेदी केली जाते. तेथून आवश्यकतेनुसार जिल्ह्यात तो औषधीसाठा पुरविण्यात येतो. या पंरवड्याकरिता औषधीसाठा खरेदी करताना ोंधळ झाल्याने पंधरवडा सुरू झाला तरी जिल्ह्यात औषधीसाठा आला नाही. यामुळे शासनाच्या या पंधरवड्यादरम्यान जिल्ह्यात काय वाटाप करावा, असा प्रश्न आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. या पंधरवड्यात केवळ औषध वाटप करणे केवळ हाच उद्देश नाही तर या आजाराबाबत जनजागृती करण्याचाही उद्देश आरोग्य विभागाचा होता; मात्र औषधीसाठा आलाच नसल्याने शासनाने जाहीर केलेला उद्देश पूर्ण होत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात हव्या १७.७५ लाख गोळ्या शासनाच्या अतिसार पंधरवड्यात जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील सव्वा लाख चिमुकल्यांना या गोळ्या देण्यात येणार आहे. यात एका बालकाला या पंधरवड्यात १४ गोळ्या देण्यात येणार आहे. सोबतच ओआरएसचे पावडरही देण्यात येणार आहे. गोळ्यांचे प्रमाण व मुलांची संख्या याचे गणित केल्यास जिल्ह्यात १७ लाख ७५ हजार गोळ्यांची गरज आहे. यात शून्य ते सहा वयोगटातील मुलांना अर्धीच गोळी देण्यात येणार असल्याने संख्या कमी जास्त होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.जिल्ह्यात २७ प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी २७ प्राथमिक आरोग्यकेंद्राकडे आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत जिल्ह्यात सव्वा लाख बालके येत आहेत. या बालकांना हे औषध पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या बालकांना पावसाळ्याच्या दिवसात अतिसाराची लागण होत असून त्यांना औषधी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.