शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धनगर समाजाचा मोर्चा

By admin | Updated: August 8, 2014 00:07 IST

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात आला आहे; मात्र जमातीत असलेल्या सेवा सुविधांचा लाभ धनगर समाजाला मिळत नाही. तो लाभ देण्याकरिता शासनाकडून टाळाटाळ होत आहे.

आरक्षणाची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन सादरवर्धा : धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात आला आहे; मात्र जमातीत असलेल्या सेवा सुविधांचा लाभ धनगर समाजाला मिळत नाही. तो लाभ देण्याकरिता शासनाकडून टाळाटाळ होत आहे. धनगर समाजाला जमातीनुसार आरक्षण देण्यात यावे, या मागणीकरिता गुरुवारी धनगर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मेंढ्या नेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवदेनात, भारतीय संविधानातील अनुसूचित जमातीमध्ये असलेल्या धनगर जमातीला राज्यात गत ६४ वर्षांपासून न्याय मिळाला नाही. संविधानाच्या अनुच्छेद १४, १५, १६, २४४, ३३५ व परिशिष्ट पाच नुसार धनगर, धनगड व ओरेन या जमाती अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असताना राज्य शासनाकडून त्यांना कुठल्याही सवलती दिल्या जात नाहीत. या सवलती देण्याचे राज्यकर्त्यांकडून टाळण्यात येत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे. येथील बॅचलर मार्गावर असलेल्या अहिल्याबाई होळकर स्मारकाजवळून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. बजाज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सदर मोर्चाला न्यायालयाच्या प्रथम द्वाराजवळच अडविले. यानंतर शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. यावेळी समाजाच्या काही युवकांनी कार्यालयात मेंढ्या नेण्याचा प्रयत्न करताना त्यांना पोलिसांनी अडविले. निवदेन देताना राजू गोरडे, प्रकाश भोयर, अरुण लांबाडे, दीपक पुनसे, विनायक नन्नुरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)