शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पं.स.ची १४ व्या वित्त आयोगाची मागणी

By admin | Updated: August 15, 2015 02:10 IST

१४ व्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना दिल्या जातो. पंचायत समितीला या वित्त आयोगाशिवाय विकास करण्याच्यादृष्टीने

स्वातंत्रदिनाची पूर्वसंध्या : वन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, सेवाग्राम येथे बसकरिता आंदोलन वर्धा : १४ व्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना दिल्या जातो. पंचायत समितीला या वित्त आयोगाशिवाय विकास करण्याच्यादृष्टीने कुठल्याही निधी उपलब्ध नसल्यामुळे पंचायत समिती कार्यक्षेत्राचा विकास पाहिजे त्या प्रमाणात होणार नाही, असा आरोप करीत शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी पंचायत समिती अंतर्गत खर्च करण्याबाबत कारवाई करावी, अशी मागणी वर्धा पंचायत समितीच्या सदस्यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन शुक्रवार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविण्यात आले आहे.निवेदनात नमुद केल्याप्रमाणे, पूर्वी १३ व्या वित्त आयोगाचा ७० टक्के निधी ग्रामपंचायत, २० टक्के पंचायत समिती आणि १० टक्के निधी जिल्हा परिषद स्तावर ठेऊन पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदार संघाचा विकास केल्या जात होता. परंतु १४ व्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना दिल्या जात असून पंचायत समितीला या वित्त आयोगाशिवाय विकास करण्याचे दृष्टीने कुठलाही निधी उपलब्ध नसल्यामुळे पंचायत समिती कार्यक्षेत्राचा विकास पाहिजे त्या प्रमाणात होणार नाही. जनसामान्यांच्या तसेच ग्रामस्थांच्या लोकप्रतिनिधीकडून विकास होण्याबाबत मागण्या असल्यामुळे पंचायत समिती स्तरावर १४ व्यास वित्त आयोगाचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मागणीचा विचार न झाल्यास पंचायत समितीचे सर्व सदस्य सामूहिक राजीनामे देऊ, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना पं.स. सभापतीर कुंदा भोयर, उपसभापती संदेश किटे, पं.स. सदस्य संतोष सेलूकर, स्वाती उईके, रजनी परिम, बाळकृष्ण माऊसकर, धैर्यशील जगताप, विजय नरांजे, शेख फारूख खैर महम्मद, मालती कांबळे, अमित शेंडे, अविनाश आत्राम, बेबी कांबळे, निता शिंदे, विमल वरभे, सविता भालकर यासह आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)