शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कॅनमुळे माठ विक्रीवर संकट

By admin | Updated: April 6, 2017 00:15 IST

उन्हाळा लागला की पूर्वी घरोघरी माठ किंवा रांजण खरेदी केले जात. मात्र ही जागा आता फ्रीज आणि प्लॉस्टिक कॅनने घेतल्याचे दिसते.

कालौघात मागणीत घट : उत्पादन खर्च वाढला वर्धा : उन्हाळा लागला की पूर्वी घरोघरी माठ किंवा रांजण खरेदी केले जात. मात्र ही जागा आता फ्रीज आणि प्लॉस्टिक कॅनने घेतल्याचे दिसते. याशिवाय शासकीय कार्यालय, संस्था, शाळा, महाविद्यालय येथेही प्लास्टीक कॅन किंवा फ्रिजर लावण्यात आल्याने माठ आणि रांजणाची मागणी कमालीची घटली आहे. प्लॉस्टिक कॅनचा थंड पाण्याचा व्यवसाय सुरू झाल्यापासून व्यापारी प्रतिष्ठाण, शासकीय व निअशासकीय कार्यालयात बाराही महिने थंड पाण्याचा पुरवठा केल्या जातो. यात शाळांचाही समावेश आहे. सहजतेने पिण्याचे थंड पाणी उपलब्ध होत असल्याने माठ आणि रांजण मागे पडले आहे. आजकाल प्रत्येक समारंभात प्लॉस्टिक कॅन नजरेस पडतात. याचा थेट परिणाम माठ विक्रीवर झाला आहे. काही विक्रेत्यांकडे तर मागील वर्षीचा माल पडून आहे. मागणी नसल्याने विक्रेत्यांना याचा फटका बसला असून त्यांच्या व्यवसायावर संकट ओढवले आहे.(स्थानिक प्रतिनिधी) कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न सेवाग्राम - होळी झाल्यावर उन्हाचे चटके जाणवायला लागतात. यंदा तर मार्च महिन्यातच रात्रीला थंडी व दिवसाला उन्ह अशा स्थितीचा नागरिकांना सामना करावा लागला. उष्णतामान वाढल्यावर शीतपेय, कुलर, थंड पाणी याची गरज पडते. पूर्वी उन्हाळ्याला प्रारंभ होताच थंड पाण्याची व्यवस्था म्हणून घरोघरी नवीन माठ खरेदी केला जात. कालौघात ही प्रथा मागे पडल्याचे दिसते. पूर्वीच्या तुलनेत माठाचे विक्री कमी होत असल्याचे कुंभार कारागीर सांगतात. नैसर्गिक व आरोग्यवर्धक थंडजल देणारे माठ स्थानिक बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. या माठाची किंमत ८० ते १५० रुपयांपर्यंत आहे. तर रांजणाची किंमत ३०० रूपयांपासून ७०० पर्यंत आहे, अशी माहिती येथील विज्रेता इंदू पाठक यांनी दिली. या व्यवसायावर प्लास्टीक कॅनचे संकट निर्माण झाल्याने मागणी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. सेवाग्राम मेडिकल चौकात गत २५ वर्षांपासून माठ विक्रीची दुकाने लागतात. याशिवाय मातीपासून निर्मित मूर्त्या, माठ, सुगडे, झाकण्या, पणत्या आदी विक्रीला ठेवतात. चानकी (कोपरा) येथील काही कुटुंब या व्यवसायात आहे. मात्र बदलत्या काळात या व्यवसायावर संकट निर्माण झाले. माठ व रांजनाची मागणी घटल्याचे चित्र असल्याने दिवसभर दुकानाकडे ग्राहक फिरकत नसल्याचे वास्तव विक्रेत्यांनी कथन केले. भविष्यात पुजेकरिता लागणारे माठच विकावे लागेल काय अशी शंका व्यक्त करण्यात येते. नव्या व्यवसायामुळे ग्रामीण भागात माठविक्रीचा व्यवसाय धोक्यात आला आहे. आरोग्यवर्धक असून थंडपाणी देणारे माठ आता हळूहळू हद्दपार होताना दिसून येत आहे. उन्हाळ्यात शाळा, संस्थेमध्ये रांजनाची मागणी असायची. मात्र यातही घट झाल्याचे दिसते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी माठाची निर्मिती केली जाते. तरीही तुमसर, मध्यप्रदेशातून विविध आकारातील आकर्षक माठ विक्रीकरिता बाजारपेठेत आले आहे. मात्र माठ निर्मिती त्याची विक्री करणाऱ्या कुटुंबापुढे आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्लास्टिक कँनच्या वाढत्या व्यवसायामुळे हा पारंपरिक व्यवसाय माघारत असल्याचे दिसून येते.