शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कॅनमुळे माठ विक्रीवर संकट

By admin | Updated: April 6, 2017 00:15 IST

उन्हाळा लागला की पूर्वी घरोघरी माठ किंवा रांजण खरेदी केले जात. मात्र ही जागा आता फ्रीज आणि प्लॉस्टिक कॅनने घेतल्याचे दिसते.

कालौघात मागणीत घट : उत्पादन खर्च वाढला वर्धा : उन्हाळा लागला की पूर्वी घरोघरी माठ किंवा रांजण खरेदी केले जात. मात्र ही जागा आता फ्रीज आणि प्लॉस्टिक कॅनने घेतल्याचे दिसते. याशिवाय शासकीय कार्यालय, संस्था, शाळा, महाविद्यालय येथेही प्लास्टीक कॅन किंवा फ्रिजर लावण्यात आल्याने माठ आणि रांजणाची मागणी कमालीची घटली आहे. प्लॉस्टिक कॅनचा थंड पाण्याचा व्यवसाय सुरू झाल्यापासून व्यापारी प्रतिष्ठाण, शासकीय व निअशासकीय कार्यालयात बाराही महिने थंड पाण्याचा पुरवठा केल्या जातो. यात शाळांचाही समावेश आहे. सहजतेने पिण्याचे थंड पाणी उपलब्ध होत असल्याने माठ आणि रांजण मागे पडले आहे. आजकाल प्रत्येक समारंभात प्लॉस्टिक कॅन नजरेस पडतात. याचा थेट परिणाम माठ विक्रीवर झाला आहे. काही विक्रेत्यांकडे तर मागील वर्षीचा माल पडून आहे. मागणी नसल्याने विक्रेत्यांना याचा फटका बसला असून त्यांच्या व्यवसायावर संकट ओढवले आहे.(स्थानिक प्रतिनिधी) कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न सेवाग्राम - होळी झाल्यावर उन्हाचे चटके जाणवायला लागतात. यंदा तर मार्च महिन्यातच रात्रीला थंडी व दिवसाला उन्ह अशा स्थितीचा नागरिकांना सामना करावा लागला. उष्णतामान वाढल्यावर शीतपेय, कुलर, थंड पाणी याची गरज पडते. पूर्वी उन्हाळ्याला प्रारंभ होताच थंड पाण्याची व्यवस्था म्हणून घरोघरी नवीन माठ खरेदी केला जात. कालौघात ही प्रथा मागे पडल्याचे दिसते. पूर्वीच्या तुलनेत माठाचे विक्री कमी होत असल्याचे कुंभार कारागीर सांगतात. नैसर्गिक व आरोग्यवर्धक थंडजल देणारे माठ स्थानिक बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. या माठाची किंमत ८० ते १५० रुपयांपर्यंत आहे. तर रांजणाची किंमत ३०० रूपयांपासून ७०० पर्यंत आहे, अशी माहिती येथील विज्रेता इंदू पाठक यांनी दिली. या व्यवसायावर प्लास्टीक कॅनचे संकट निर्माण झाल्याने मागणी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. सेवाग्राम मेडिकल चौकात गत २५ वर्षांपासून माठ विक्रीची दुकाने लागतात. याशिवाय मातीपासून निर्मित मूर्त्या, माठ, सुगडे, झाकण्या, पणत्या आदी विक्रीला ठेवतात. चानकी (कोपरा) येथील काही कुटुंब या व्यवसायात आहे. मात्र बदलत्या काळात या व्यवसायावर संकट निर्माण झाले. माठ व रांजनाची मागणी घटल्याचे चित्र असल्याने दिवसभर दुकानाकडे ग्राहक फिरकत नसल्याचे वास्तव विक्रेत्यांनी कथन केले. भविष्यात पुजेकरिता लागणारे माठच विकावे लागेल काय अशी शंका व्यक्त करण्यात येते. नव्या व्यवसायामुळे ग्रामीण भागात माठविक्रीचा व्यवसाय धोक्यात आला आहे. आरोग्यवर्धक असून थंडपाणी देणारे माठ आता हळूहळू हद्दपार होताना दिसून येत आहे. उन्हाळ्यात शाळा, संस्थेमध्ये रांजनाची मागणी असायची. मात्र यातही घट झाल्याचे दिसते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी माठाची निर्मिती केली जाते. तरीही तुमसर, मध्यप्रदेशातून विविध आकारातील आकर्षक माठ विक्रीकरिता बाजारपेठेत आले आहे. मात्र माठ निर्मिती त्याची विक्री करणाऱ्या कुटुंबापुढे आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्लास्टिक कँनच्या वाढत्या व्यवसायामुळे हा पारंपरिक व्यवसाय माघारत असल्याचे दिसून येते.