शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

जीर्ण पं.स. इमारतीचा कायापालट होणार काय?

By admin | Updated: March 6, 2017 01:05 IST

विद्यमान पं.स. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. नवनिर्वाचित सदस्य पं.स.चा कार्यभार सांभाळणार आहे.

नागरिकांचा सवाल : कित्येक सभापती, अधिकारी बदलले; पण दुरवस्था कायमचसेलू : विद्यमान पं.स. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. नवनिर्वाचित सदस्य पं.स.चा कार्यभार सांभाळणार आहे. या पाच वर्षांच्या काळात तरी पं.स. च्या जीर्ण इमारतीचा कायापालट होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ७ सप्टेंबर १९६२ रोजी सेलू पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून अमृत सिताराम काटकर यांनी पदभार सांभाळला होता. तेव्हा येथे इमारत, विभागवार कार्यालये आणि कर्मचारी वसाहत होता. आज याला ५५ वर्षे होत आहेत. ५५ वर्षांच्या कालावधीत १४ व्यक्तींनी सभापतीपद भूषविले. दरम्यानच्या काळात कार्यालयाची इमारत जीर्ण झाली. कर्मचारी वसाहत तर अस्तित्वातच राहिली नाही. ज्या मुख्य इमारतीत गटविकास अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, लेखा, कृषी व पंचायत विभाग आहे, त्या इमारतीच्या छतावर बारमाही ताडपत्रीचे पांघरून घालावे लागते. पशुसंवर्धन, शिक्षण आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे कार्यालय असलेल्या इमारतीला तडे गेले आहेत. हे चित्र इमारत जीर्ण झाल्याचे सांगते.सभापती, उपसभापतीकरिता असलेला कक्ष पाहता राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात दबदबा असलेल्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न सामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. पंचायत समितीच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या दुरूस्ती, नवीन इमारत याबाबत अनेकदा प्रस्ताव पाठविण्यात आले. येथील तहसील कार्यालयाला नवीन इमारत मिळत आहे; पण पं.स. इमारतीचे भिजत घोंगडे कायमच आहे. याबाबत शासनदरबारी पाठपुरावाही करण्यात आला; पण दाद मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. आजपर्यंतच्या सभापती, अधिकारी व पदाधिकाऱ्यांना पं.स. कार्यालयासाठी नवीन इमारत मिळविता आली नाही. आता नव्याने निवडून आलेले पदाधिकारी येथील पं.स.च्या जीर्ण इमारतीचा कायापालट करून नवीन इमारतीसाठी पुढाकार घेणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)महत्त्वाची कार्यालये असलेल्या बहुतांश इमारतींची दुरवस्थासेलू हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आणि संवेदनशिल तथा राजकीय वजन असलेला तालुका मानला जातो. यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणा सक्षम व सुसज्ज असावी, अशी अपेक्षा असते; पण ही अपेक्षा फोलच ठरताना दिसते. सेलू शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांच्या इमारतींची दुरवस्था झाल्याचेच पाहावयास मिळते. पंचायत समितीच्या इमारतीला तर वारंवार डागडुजी करावी लागते. अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले असून पावसाळ्यात कार्यालयात बसणेही कठीण होते. यामुळे नवीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून नवीन इमारतीची अपेक्षा केली जात आहे.