शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण पं.स. इमारतीचा कायापालट होणार काय?

By admin | Updated: March 6, 2017 01:05 IST

विद्यमान पं.स. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. नवनिर्वाचित सदस्य पं.स.चा कार्यभार सांभाळणार आहे.

नागरिकांचा सवाल : कित्येक सभापती, अधिकारी बदलले; पण दुरवस्था कायमचसेलू : विद्यमान पं.स. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. नवनिर्वाचित सदस्य पं.स.चा कार्यभार सांभाळणार आहे. या पाच वर्षांच्या काळात तरी पं.स. च्या जीर्ण इमारतीचा कायापालट होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ७ सप्टेंबर १९६२ रोजी सेलू पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून अमृत सिताराम काटकर यांनी पदभार सांभाळला होता. तेव्हा येथे इमारत, विभागवार कार्यालये आणि कर्मचारी वसाहत होता. आज याला ५५ वर्षे होत आहेत. ५५ वर्षांच्या कालावधीत १४ व्यक्तींनी सभापतीपद भूषविले. दरम्यानच्या काळात कार्यालयाची इमारत जीर्ण झाली. कर्मचारी वसाहत तर अस्तित्वातच राहिली नाही. ज्या मुख्य इमारतीत गटविकास अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, लेखा, कृषी व पंचायत विभाग आहे, त्या इमारतीच्या छतावर बारमाही ताडपत्रीचे पांघरून घालावे लागते. पशुसंवर्धन, शिक्षण आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे कार्यालय असलेल्या इमारतीला तडे गेले आहेत. हे चित्र इमारत जीर्ण झाल्याचे सांगते.सभापती, उपसभापतीकरिता असलेला कक्ष पाहता राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात दबदबा असलेल्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न सामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. पंचायत समितीच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या दुरूस्ती, नवीन इमारत याबाबत अनेकदा प्रस्ताव पाठविण्यात आले. येथील तहसील कार्यालयाला नवीन इमारत मिळत आहे; पण पं.स. इमारतीचे भिजत घोंगडे कायमच आहे. याबाबत शासनदरबारी पाठपुरावाही करण्यात आला; पण दाद मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. आजपर्यंतच्या सभापती, अधिकारी व पदाधिकाऱ्यांना पं.स. कार्यालयासाठी नवीन इमारत मिळविता आली नाही. आता नव्याने निवडून आलेले पदाधिकारी येथील पं.स.च्या जीर्ण इमारतीचा कायापालट करून नवीन इमारतीसाठी पुढाकार घेणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)महत्त्वाची कार्यालये असलेल्या बहुतांश इमारतींची दुरवस्थासेलू हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आणि संवेदनशिल तथा राजकीय वजन असलेला तालुका मानला जातो. यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणा सक्षम व सुसज्ज असावी, अशी अपेक्षा असते; पण ही अपेक्षा फोलच ठरताना दिसते. सेलू शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांच्या इमारतींची दुरवस्था झाल्याचेच पाहावयास मिळते. पंचायत समितीच्या इमारतीला तर वारंवार डागडुजी करावी लागते. अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले असून पावसाळ्यात कार्यालयात बसणेही कठीण होते. यामुळे नवीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून नवीन इमारतीची अपेक्षा केली जात आहे.