शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
4
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
5
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
6
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
7
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
8
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
9
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
10
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
11
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
12
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
13
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
14
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
15
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
16
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
17
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
18
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
19
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
20
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

जीर्ण पं.स. इमारतीचा कायापालट होणार काय?

By admin | Updated: March 6, 2017 01:05 IST

विद्यमान पं.स. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. नवनिर्वाचित सदस्य पं.स.चा कार्यभार सांभाळणार आहे.

नागरिकांचा सवाल : कित्येक सभापती, अधिकारी बदलले; पण दुरवस्था कायमचसेलू : विद्यमान पं.स. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. नवनिर्वाचित सदस्य पं.स.चा कार्यभार सांभाळणार आहे. या पाच वर्षांच्या काळात तरी पं.स. च्या जीर्ण इमारतीचा कायापालट होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ७ सप्टेंबर १९६२ रोजी सेलू पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून अमृत सिताराम काटकर यांनी पदभार सांभाळला होता. तेव्हा येथे इमारत, विभागवार कार्यालये आणि कर्मचारी वसाहत होता. आज याला ५५ वर्षे होत आहेत. ५५ वर्षांच्या कालावधीत १४ व्यक्तींनी सभापतीपद भूषविले. दरम्यानच्या काळात कार्यालयाची इमारत जीर्ण झाली. कर्मचारी वसाहत तर अस्तित्वातच राहिली नाही. ज्या मुख्य इमारतीत गटविकास अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, लेखा, कृषी व पंचायत विभाग आहे, त्या इमारतीच्या छतावर बारमाही ताडपत्रीचे पांघरून घालावे लागते. पशुसंवर्धन, शिक्षण आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे कार्यालय असलेल्या इमारतीला तडे गेले आहेत. हे चित्र इमारत जीर्ण झाल्याचे सांगते.सभापती, उपसभापतीकरिता असलेला कक्ष पाहता राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात दबदबा असलेल्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न सामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. पंचायत समितीच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या दुरूस्ती, नवीन इमारत याबाबत अनेकदा प्रस्ताव पाठविण्यात आले. येथील तहसील कार्यालयाला नवीन इमारत मिळत आहे; पण पं.स. इमारतीचे भिजत घोंगडे कायमच आहे. याबाबत शासनदरबारी पाठपुरावाही करण्यात आला; पण दाद मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. आजपर्यंतच्या सभापती, अधिकारी व पदाधिकाऱ्यांना पं.स. कार्यालयासाठी नवीन इमारत मिळविता आली नाही. आता नव्याने निवडून आलेले पदाधिकारी येथील पं.स.च्या जीर्ण इमारतीचा कायापालट करून नवीन इमारतीसाठी पुढाकार घेणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)महत्त्वाची कार्यालये असलेल्या बहुतांश इमारतींची दुरवस्थासेलू हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आणि संवेदनशिल तथा राजकीय वजन असलेला तालुका मानला जातो. यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणा सक्षम व सुसज्ज असावी, अशी अपेक्षा असते; पण ही अपेक्षा फोलच ठरताना दिसते. सेलू शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांच्या इमारतींची दुरवस्था झाल्याचेच पाहावयास मिळते. पंचायत समितीच्या इमारतीला तर वारंवार डागडुजी करावी लागते. अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले असून पावसाळ्यात कार्यालयात बसणेही कठीण होते. यामुळे नवीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून नवीन इमारतीची अपेक्षा केली जात आहे.