शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

शैक्षणिक प्रतिकृतींमधून घडतोय बालकांचा ज्ञानसंवाद

By admin | Updated: April 3, 2017 01:28 IST

बालकांच्या सुप्त कलागुणांना संधी मिळावी. आधुनिक शिक्षणाची जीवनमूल्ये त्यांच्यात रूजावी, यासाठी बालक व पालकांच्या

पालकांचाही सहभाग : ज्ञानरचनावादी शिक्षण प्रणाली राबविण्याकडे कल वर्धा : बालकांच्या सुप्त कलागुणांना संधी मिळावी. आधुनिक शिक्षणाची जीवनमूल्ये त्यांच्यात रूजावी, यासाठी बालक व पालकांच्या सहकार्याने ‘टुगेदर वुई क्रिएट’हा प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. मागील दशकांत जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात वेगाने बदल झाले. इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृतीच्या आगमनाने शालेयपूर्व शिक्षणाचा गाभा पूर्णत: बदलल्याचे दिसून येत आहे. प्रचंड स्पर्धा व पालकांच्या पाल्यांविषयीच्या वाढत्या अपेक्षांमुळे तालुकास्तरावरही कॉन्व्हेंटची गर्दी वाढू लागली. मात्र, बालमानस व शिक्षण या दोन घटकांचा संबंध लक्षात न घेता केवळ व्यावसायिक हेतू पुढे ठेवून कॉन्व्हेंट सुरू केल्याचे दिसतात. त्यामुळे बालकांना वेगळे काहीतरी देण्याच्या प्रयत्नातून स्कूल आॅफ स्कॉलर्सने प्रेरणादायी शैक्षणिक परंपरा निर्माण करणारा उपक्रम राबविला. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा अवलंब करुन हे उपक्रम राबविण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शैक्षणिक अभ्यासक्रमासह मुलांचेर व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपक्रमशील शिक्षकांच्या माध्यमातून बालकांची मने सुसंस्कारीत करण्याचे उपक्रम राबविण्यात आले. बालक पालकांच्या ज्ञानात्मक कलाकृतींचा आविष्कार त्याचेच फलीत आहे. या उपक्रमाबाबत प्राचार्य आरती चौबे म्हणाल्या, केवळ वर्गात बसून शिक्षण देणे याला मर्यादा आहेत. बालकांना आजूबाजूच्या सामाजिक व कौटुंबिक पर्यावरणातूनही बऱ्याच गोष्टी शिकता येतात. त्यासाठी आम्ही अभ्यासक्रमात तसे बदल करण्याची गरज आहे. बालकांच्या भावविश्वाला बळ देणाऱ्या उपक्रमांमुळे आत्मविश्वास वाढतो. बालके स्वत:हून विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात करू लागतात. यावर त्यांनी भाष्य केले. पर्यवेक्षिका मोनाली ठाकरे यांनी सांगितले की, बालक वर्गात आल्यानंतर शिक्षिकेच्या सानिध्यात राहतात. मात्र, सर्वाधिक वेळ पालकांच्या सहवासातच जातो. त्यामुळे अध्ययन व अध्यापनाच्या प्रक्रियेत पालकांना सहभाग वाढावा. शैक्षणिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आम्ही पालकांना सामावून घेण्याचा उपक्रम राबविला. त्याचे प्रेरणादायी परिणाम बालकांवर दिसून आले. बालकांनी आई-वडिलांच्या सहकार्याने ज्ञानाला चालना देणारे अनेक मॉडेल्स तयार केले. मुख्य म्हणजे प्रत्येक मॉडेल बालकांचा ज्ञानात्मक पाया समृद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक उद्दीष्टांचा भाग होता. या उपक्रमाद्वारे कल्पनाशक्ती, गणित, विज्ञान, बुद्धीमत्ता, संभाषण, कौशल्य, सामान्य ज्ञान, विषय समजावून सांगण्याची हातोटी यासारख्या अनेक गुणांना चालना मिळत आहे. या उपक्रमासाठी शीतल सरोदे, अश्विनी वानखेडे, सुलक्षणा ठाकरे, अल्का वोरा, आरती गवळी, ममता काकडे आदी शिक्षिकांनी मोलाची भूमिका बजावली. यावेळी उपस्थित पालकांनी प्रश्न उपस्थित केले. या संवादाच्या माध्यमातून पालकांच्या अडचणी जाणुन घेत यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)