शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

सीसीआयकडे ३० कोटींचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

हिंगणघाट तालुक्यात सीसीआयने आतापर्यंत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हिंगणघाटला तीन केंद्रातून तर वडनेरमध्ये एका केंद्रावर तीन हजाराच्यावर शेतकऱ्यांकडून जवळपास ५५ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. याच कापसाचे जवळपास ३० कोटी रुपये सीसीआयकडे थकीत असून शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे अद्याप मिळालेले नाही.

ठळक मुद्देकापूस उत्पादकांची वाढली चिंता : लॉकडाऊनचा बळीराजाला जबर फटका

भास्कर कलोडे।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शासनाद्वारा हमी भावात खरेदी केलेल्या ३० कोटींपेक्षा जास्त कापसाचे चुकारे दीड महिन्यांपासून सीसीआयकडे थकीत आहे. तर पंधरा दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने घरी पडून असलेल्या कापसाचे करायचे काय या विचाराने शेतकरी सध्या आहे. शासनाने त्वरित थकीत चुकारे देत कापूस खरेदी करून करावी अशी मागणी आहे.हिंगणघाट तालुक्यात सीसीआयने आतापर्यंत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हिंगणघाटला तीन केंद्रातून तर वडनेरमध्ये एका केंद्रावर तीन हजाराच्यावर शेतकऱ्यांकडून जवळपास ५५ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. याच कापसाचे जवळपास ३० कोटी रुपये सीसीआयकडे थकीत असून शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे अद्याप मिळालेले नाही. यावर्षी खुल्या बाजारात कपाशीचे क्विंटलमागे ४,८०० रुपये दर असताना केंद्र शासनाकडून हमीदर ५ हजार ५५० रुपये देण्यात आला आहे. क्विंटलमागे हजार रुपयापर्यंत फरक पडत असल्याने यावर्षी शेतकºयांचा सीसीआयकडे हमी दरात कापूस विक्री करण्यासाठी ओढा आहे.सुरुवातीला सीसीआयद्वारे खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे पाच ते सात दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होते; पण नंतर हा कालावधी वाढत जाऊन आता तब्बल दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे सीसीआयकडून देण्यात आलेले नाही. सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली तेव्हा उच्च प्रतीच्या कपाशीला क्विंटलमागे ५,५५० रुपये दर दिला जात होता.नंतर हाच दर ५,४५० रुपयांवर स्थिरावला. तालुक्याचा विचार करता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येथे १९ मार्च पासून सीसीआयची कापूस खरेदी बंद केली आहे. मागील पंधरा दिवसांपासून सीसीआयची कापूस खरेदी बंद असून गत वर्षी याच कालावधीत ६५ हजार १२२ क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. मध्यतरी झालेल्या अवकाळी पावसासह वादळीवाºयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर्वीच शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच कापसाचे चुकारे वेळीच मिळत नसल्याने तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.काहींच्या बँक खात्यात जमा झाली रक्कम१८ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे चुकारे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. मात्र, १८ मार्चपर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत सुमारे तीन हजार शेतकऱ्यांनी विकलेल्या ५५ हजार क्विंटल कापसाचे ३० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप जमा झालेले नाही.कांही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कागदपत्रातील त्रुटी, काहींचे एस बँके द्वारा व्यवहार, संगणकीय लिंक, तसेच लॉक डाऊन आदी अडचणीमुळे शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे मिळण्यास विलंब झाला आहे. परंतु २९ फेब्रुवारीपर्यंतचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बुधवारपर्यंत तर उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच कापसाचे चुकारे देण्यात येईल.- दीपक पाटोले, केंद्र प्रभारी प्रमुख, सीसीआय, हिंगणघाट.

टॅग्स :cottonकापूसGovernmentसरकार