शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

सांडपाण्याने बंधारा दूषित

By admin | Updated: April 24, 2015 01:57 IST

गावालगत असलेल्या बोरनदीवरील बंधाऱ्यात सेलू शहरातील सांडपाणी साचले असले आहे.

सेलू : गावालगत असलेल्या बोरनदीवरील बंधाऱ्यात सेलू शहरातील सांडपाणी साचले असले आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.सेलू येथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बंधण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बोर नदी प्रवाह बंद होतो. त्यामुळे या बंधाऱ्यात अडणारे पाणी सेलू शहराची तहान भागवत असते. शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा धोरणाचा पुरेपूर अवलंब येथे होत असला तरी या बंधाऱ्यात अडणारे पाणी कोणते याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे.गावाचे रूपांतर आता शहरात झाले. गावाचा विकास झपाट्याने झाला. रस्ते, नाल्याचे बांधकाम झाले. पण गावातील संपूर्ण सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीच्या पात्रात सोडण्यात येते. असे पाणी बंधाऱ्यात अडून राहात असल्याने पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पाण्यावर शेवाळीची झालर पसरली असल्याने ते आणखी दूषित होत आहे. या बोरतिरावर सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी सार्वजनिक विहीर आहे. याच तिरावर आठवडी बाजारही भरतो. मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात भाजीपाला ताजा राहावा म्हणून याच नदीचे पाणी त्यावर शिंपडल्या जाते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या नदीचे सेलू शहरालगत असलेले संपूर्ण पात्र बेशरमच्या झाडांनी व शेवाळाने व्यापले आहे. ग्रामपंचायतद्वारे नदी स्वच्छता अभियान राबवून पात्राचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याच्या हालचाली सुरू असताना सेलू ग्रामपंचायत बरखास्त करून नगर पंचायतीची स्थापना झाली. सध्या प्रशासक नियुक्त असून नगर पंचायतच्या निवडणुका झाल्यानंतर गावातील सांडपाणी नदीच्या पात्रात येणार नाही यासाठी प्रयत्न होणार काय याकडे सेलू वासियांचे लक्ष लागले आहे. या बंधाऱ्यात अडणारे पाणी दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन हा प्रकार थांबवावा अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)