शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सांडपाण्याने बंधारा दूषित

By admin | Updated: April 24, 2015 01:57 IST

गावालगत असलेल्या बोरनदीवरील बंधाऱ्यात सेलू शहरातील सांडपाणी साचले असले आहे.

सेलू : गावालगत असलेल्या बोरनदीवरील बंधाऱ्यात सेलू शहरातील सांडपाणी साचले असले आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.सेलू येथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बंधण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बोर नदी प्रवाह बंद होतो. त्यामुळे या बंधाऱ्यात अडणारे पाणी सेलू शहराची तहान भागवत असते. शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा धोरणाचा पुरेपूर अवलंब येथे होत असला तरी या बंधाऱ्यात अडणारे पाणी कोणते याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे.गावाचे रूपांतर आता शहरात झाले. गावाचा विकास झपाट्याने झाला. रस्ते, नाल्याचे बांधकाम झाले. पण गावातील संपूर्ण सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीच्या पात्रात सोडण्यात येते. असे पाणी बंधाऱ्यात अडून राहात असल्याने पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पाण्यावर शेवाळीची झालर पसरली असल्याने ते आणखी दूषित होत आहे. या बोरतिरावर सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी सार्वजनिक विहीर आहे. याच तिरावर आठवडी बाजारही भरतो. मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात भाजीपाला ताजा राहावा म्हणून याच नदीचे पाणी त्यावर शिंपडल्या जाते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या नदीचे सेलू शहरालगत असलेले संपूर्ण पात्र बेशरमच्या झाडांनी व शेवाळाने व्यापले आहे. ग्रामपंचायतद्वारे नदी स्वच्छता अभियान राबवून पात्राचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याच्या हालचाली सुरू असताना सेलू ग्रामपंचायत बरखास्त करून नगर पंचायतीची स्थापना झाली. सध्या प्रशासक नियुक्त असून नगर पंचायतच्या निवडणुका झाल्यानंतर गावातील सांडपाणी नदीच्या पात्रात येणार नाही यासाठी प्रयत्न होणार काय याकडे सेलू वासियांचे लक्ष लागले आहे. या बंधाऱ्यात अडणारे पाणी दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन हा प्रकार थांबवावा अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)