शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

४२६ गावांत तंटामुक्त समित्या अध्यक्षाविना

By admin | Updated: August 6, 2014 23:58 IST

गावातील तंटे गावात मिटावेत, शांतता प्रस्थापित होऊन गावे समृद्ध व्हावीत यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली़ २००७ मध्ये सुरू झालेले हे अभियान काही

मोहिमेला बसली खीळ : गावस्तरावर अल्प सहभाग व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे योजना अडचणीचीप्रशांत हेलोंडे - वर्धागावातील तंटे गावात मिटावेत, शांतता प्रस्थापित होऊन गावे समृद्ध व्हावीत यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली़ २००७ मध्ये सुरू झालेले हे अभियान काही वर्षे यशस्वीरित्या राबविण्यात आले; पण सध्या यशस्वी मोहिमेलाही घरघर लागली आहे़ जिल्ह्यातील ४२६ गावांत तंटामुक्त गाव समितीला अध्यक्ष नाही़ शिवाय समित्यांचा कार्यकाळही संपला़ अध्यक्षपदासाठी कुणी उत्सूक नसल्याने तंटामुक्त गावेही तंट्यांच्या वाटेवर असल्याचे दिसते़गावातील तंटे पोलीस ठाण्यात जाऊ नये, महागाईच्या काळात ग्रामस्थांना न्यायालयीन खर्च करावा लागू नये या उद्देशाने सुरू झालेल्या तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यात समित्या गठित करण्यात आल्या़ याद्वारे तंटे गावातच मिटविले जाऊ लागले़ यामुळे अनेक गावे तंटामुक्त झाली व तत्सम गावांना पुरस्कृतही केले गेले़ या मोहिमेतील पुरस्काराच्या रकमेचा विनियोग कसा करावा, याचे नियमही शासनाने दिले होते; पण त्यानुसार गावातील विकास कामांवर रक्कम खर्च होत नसल्याने विकास कामे झालीच नाहीत़ कालांतराने ही मोहिमही थंडावली़ सध्या वर्धा जिल्ह्यातील ४२६ तंटामुक्त गाव समित्यांचा कार्यकाळ संपलेला आहे़ या समितीचे नवीन अध्यक्षपद घेण्यास कुणीही उत्सूक नाही़ गृहमंत्री आऱआऱ पाटील यांनी सुरू केलेल्या तंटामुक्त गाव मोहिमेला प्रारंभीच्या दोन-तीन वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला; पण कालांतराने गावांतील गटातटाचे राजकारण, गुन्हेगारीमध्ये झालेली वाढ, स्टेशनरी साहित्य व मानधनाचा अभाव या प्रमुख कारणांनी ती थंडावली़ २०१२ पर्यंत समितीच्या काही प्रमाणात सभा होत होत्या; पण मागील दोन वर्षांत सभा तर दूरच कागदोपत्री अहवाल तयार करणेही बंदच आहे़ आजपर्यंत वर्धा जिल्ह्यात ४२६ गावांतील समित्यांना हक्काचे अध्यक्ष मिळत नाही, ही गृहखात्यासाठी चिंतेची बाब आहे़ जिल्ह्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास आर्वी तालुक्यात ८५ गावे, आष्टी तालुक्यात ३७ गावे, कारंजा ४७, देवळी ३९, सेलू ४५, वर्धा ६९, हिंगणघाट ७२ व समुद्रपूर तालुक्यातील ३२ अशा ४२६ गावांमध्ये कुणीही अध्यक्ष बनण्यास तयार नाहीत़ तंटामुक्त गाव मोहिमेमध्ये तहसीलदार आणि ठाणेदार हे महत्त्वाचा दुवा होते; पण संबंधित अधिकाऱ्यांना तंटे मिटविण्यात रस नसल्याचे दिसते़ शिवाय महसूल व पोलीस विभागाचे अधिकार संपुष्टात येऊ नये, अशी भीतीही आहे़ यामुळेच शासनाचे अधिकारी ही मोहीम राबविण्याबाबत ग्रामस्थांना प्रोत्साहित करीत नसल्याचे दिसते़ यशस्वी झालेली ही मोहीम पुनर्जीवित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणेच गरजेचे झाले आहे़