शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

४२६ गावांत तंटामुक्त समित्या अध्यक्षाविना

By admin | Updated: August 6, 2014 23:58 IST

गावातील तंटे गावात मिटावेत, शांतता प्रस्थापित होऊन गावे समृद्ध व्हावीत यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली़ २००७ मध्ये सुरू झालेले हे अभियान काही

मोहिमेला बसली खीळ : गावस्तरावर अल्प सहभाग व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे योजना अडचणीचीप्रशांत हेलोंडे - वर्धागावातील तंटे गावात मिटावेत, शांतता प्रस्थापित होऊन गावे समृद्ध व्हावीत यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली़ २००७ मध्ये सुरू झालेले हे अभियान काही वर्षे यशस्वीरित्या राबविण्यात आले; पण सध्या यशस्वी मोहिमेलाही घरघर लागली आहे़ जिल्ह्यातील ४२६ गावांत तंटामुक्त गाव समितीला अध्यक्ष नाही़ शिवाय समित्यांचा कार्यकाळही संपला़ अध्यक्षपदासाठी कुणी उत्सूक नसल्याने तंटामुक्त गावेही तंट्यांच्या वाटेवर असल्याचे दिसते़गावातील तंटे पोलीस ठाण्यात जाऊ नये, महागाईच्या काळात ग्रामस्थांना न्यायालयीन खर्च करावा लागू नये या उद्देशाने सुरू झालेल्या तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यात समित्या गठित करण्यात आल्या़ याद्वारे तंटे गावातच मिटविले जाऊ लागले़ यामुळे अनेक गावे तंटामुक्त झाली व तत्सम गावांना पुरस्कृतही केले गेले़ या मोहिमेतील पुरस्काराच्या रकमेचा विनियोग कसा करावा, याचे नियमही शासनाने दिले होते; पण त्यानुसार गावातील विकास कामांवर रक्कम खर्च होत नसल्याने विकास कामे झालीच नाहीत़ कालांतराने ही मोहिमही थंडावली़ सध्या वर्धा जिल्ह्यातील ४२६ तंटामुक्त गाव समित्यांचा कार्यकाळ संपलेला आहे़ या समितीचे नवीन अध्यक्षपद घेण्यास कुणीही उत्सूक नाही़ गृहमंत्री आऱआऱ पाटील यांनी सुरू केलेल्या तंटामुक्त गाव मोहिमेला प्रारंभीच्या दोन-तीन वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला; पण कालांतराने गावांतील गटातटाचे राजकारण, गुन्हेगारीमध्ये झालेली वाढ, स्टेशनरी साहित्य व मानधनाचा अभाव या प्रमुख कारणांनी ती थंडावली़ २०१२ पर्यंत समितीच्या काही प्रमाणात सभा होत होत्या; पण मागील दोन वर्षांत सभा तर दूरच कागदोपत्री अहवाल तयार करणेही बंदच आहे़ आजपर्यंत वर्धा जिल्ह्यात ४२६ गावांतील समित्यांना हक्काचे अध्यक्ष मिळत नाही, ही गृहखात्यासाठी चिंतेची बाब आहे़ जिल्ह्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास आर्वी तालुक्यात ८५ गावे, आष्टी तालुक्यात ३७ गावे, कारंजा ४७, देवळी ३९, सेलू ४५, वर्धा ६९, हिंगणघाट ७२ व समुद्रपूर तालुक्यातील ३२ अशा ४२६ गावांमध्ये कुणीही अध्यक्ष बनण्यास तयार नाहीत़ तंटामुक्त गाव मोहिमेमध्ये तहसीलदार आणि ठाणेदार हे महत्त्वाचा दुवा होते; पण संबंधित अधिकाऱ्यांना तंटे मिटविण्यात रस नसल्याचे दिसते़ शिवाय महसूल व पोलीस विभागाचे अधिकार संपुष्टात येऊ नये, अशी भीतीही आहे़ यामुळेच शासनाचे अधिकारी ही मोहीम राबविण्याबाबत ग्रामस्थांना प्रोत्साहित करीत नसल्याचे दिसते़ यशस्वी झालेली ही मोहीम पुनर्जीवित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणेच गरजेचे झाले आहे़