शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषिपंपाकरिता ३१४ शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर

By admin | Updated: August 28, 2016 00:30 IST

विजेचा वाढता वापर व चढे दर यातून शेतकऱ्यांची सुटका करण्याकरिता शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सौर कृषी पंप देण्याची

जिल्ह्यात २२ पंप सुरू : ६४ शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभारणीच्या कामाला प्रारंभ रूपेश खैरी वर्धाविजेचा वाढता वापर व चढे दर यातून शेतकऱ्यांची सुटका करण्याकरिता शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सौर कृषी पंप देण्याची योजा राबविण्यात आली. याकरिता वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ५०६ शेतकऱ्यांनी अर्ज केले. मात्र यात असलेल्या अटींचे कारण काढत महावितरणद्वारे आतापर्यंत ३१४ शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. यामुळे ही योजना शेतकऱ्यांकरिता अडचणीची ठरत आहे. या पंपाकरिता असलेल्या अटी शिथील करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या वर्धा जिल्ह्याला एकूण ९२० पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र सौर कृषी पंप देण्याकरिता असलेल्या जाचक अटी शेतकऱ्यांकरिता मारक ठरत असल्याचे दिसून आले आहे. या अटींमुळे व महावितरणसह शासनाच्या लेटलतीफीमुळे वर्धेत १० टक्केही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. प्रारंभी योजनेची माहितीच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली नव्हती. जसजसा वेळ गेला तसतशी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत गेल्याने अर्ज येणे सुरू झाले. आतापर्यंत ५०६ अर्ज दाखल झाले आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार सर्व्हे केला असता त्यातील १९२ अर्जच मंजूर करण्यात आले आहे. इतर अर्ज नियमात बसत नसल्याचे सांगत ते नामंजूर करण्यात आले. मंजूर झालेल्या अर्जातून २२ शेतकऱ्यांच्या शेतात कृषिपंप उभारण्यात आले असून त्याचा वापर सुरू आहे, तर ६४ शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभारणीचे काम सुरू आहे. सदर शेतकऱ्यांच्या शेतात लवकरच सौरउर्जेचे पंप मिळणार असून त्यातून ओलीत करणे सोईचे होणार आहे. उर्वरीत शेतकऱ्यांनी आवश्यक अनामत रक्कम भरली असून त्यांच्या शेतातही लवकरच काम सुरू होणार असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता असलेल्या जाचक अटी शिथील करण्याची गरज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रकमेत मिळणार पंपयोजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना परवडणारी असल्याने योजना यशस्वी ठरण्याचे संकेत असले तरी अटींच्या जाचात ही योजना शेतकऱ्यांकरिता अडचणीची ठरत आहे. या योजनेत केंद्र शासन ३० टक्के, राज्य शासन पाच टक्के व शेतकरी पाच टक्के यातून गोळा झालेल्या रकमेतून कृषीपंप मिळणार आहे. उर्वरीत ६० टक्के रक्कम वित्तीय संस्थेकडून उभारण्यात येणार आहे. त्याची परतफेड शेतकऱ्यांना करावी लागणार नाही.