शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषिपंपाकरिता ३१४ शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर

By admin | Updated: August 28, 2016 00:30 IST

विजेचा वाढता वापर व चढे दर यातून शेतकऱ्यांची सुटका करण्याकरिता शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सौर कृषी पंप देण्याची

जिल्ह्यात २२ पंप सुरू : ६४ शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभारणीच्या कामाला प्रारंभ रूपेश खैरी वर्धाविजेचा वाढता वापर व चढे दर यातून शेतकऱ्यांची सुटका करण्याकरिता शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सौर कृषी पंप देण्याची योजा राबविण्यात आली. याकरिता वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ५०६ शेतकऱ्यांनी अर्ज केले. मात्र यात असलेल्या अटींचे कारण काढत महावितरणद्वारे आतापर्यंत ३१४ शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. यामुळे ही योजना शेतकऱ्यांकरिता अडचणीची ठरत आहे. या पंपाकरिता असलेल्या अटी शिथील करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या वर्धा जिल्ह्याला एकूण ९२० पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र सौर कृषी पंप देण्याकरिता असलेल्या जाचक अटी शेतकऱ्यांकरिता मारक ठरत असल्याचे दिसून आले आहे. या अटींमुळे व महावितरणसह शासनाच्या लेटलतीफीमुळे वर्धेत १० टक्केही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. प्रारंभी योजनेची माहितीच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली नव्हती. जसजसा वेळ गेला तसतशी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत गेल्याने अर्ज येणे सुरू झाले. आतापर्यंत ५०६ अर्ज दाखल झाले आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार सर्व्हे केला असता त्यातील १९२ अर्जच मंजूर करण्यात आले आहे. इतर अर्ज नियमात बसत नसल्याचे सांगत ते नामंजूर करण्यात आले. मंजूर झालेल्या अर्जातून २२ शेतकऱ्यांच्या शेतात कृषिपंप उभारण्यात आले असून त्याचा वापर सुरू आहे, तर ६४ शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभारणीचे काम सुरू आहे. सदर शेतकऱ्यांच्या शेतात लवकरच सौरउर्जेचे पंप मिळणार असून त्यातून ओलीत करणे सोईचे होणार आहे. उर्वरीत शेतकऱ्यांनी आवश्यक अनामत रक्कम भरली असून त्यांच्या शेतातही लवकरच काम सुरू होणार असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता असलेल्या जाचक अटी शिथील करण्याची गरज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रकमेत मिळणार पंपयोजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना परवडणारी असल्याने योजना यशस्वी ठरण्याचे संकेत असले तरी अटींच्या जाचात ही योजना शेतकऱ्यांकरिता अडचणीची ठरत आहे. या योजनेत केंद्र शासन ३० टक्के, राज्य शासन पाच टक्के व शेतकरी पाच टक्के यातून गोळा झालेल्या रकमेतून कृषीपंप मिळणार आहे. उर्वरीत ६० टक्के रक्कम वित्तीय संस्थेकडून उभारण्यात येणार आहे. त्याची परतफेड शेतकऱ्यांना करावी लागणार नाही.