शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

२० नामांकन दाखल

By admin | Updated: July 18, 2014 00:15 IST

नगराध्यक्षांना वाढीव कालावधी देण्याचा निर्णय रद्द होताच जिल्ह्यात नगराध्यक्षपदाकरिता इच्छुकांनी फिल्डींग लावणे सुरू केले. नगराध्यक्षाच्या निवडीकरिता गुरुवारी अर्ज दाखल करावयाचे होते.

देवळीत एकच अर्ज : सहा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी वर्धा : नगराध्यक्षांना वाढीव कालावधी देण्याचा निर्णय रद्द होताच जिल्ह्यात नगराध्यक्षपदाकरिता इच्छुकांनी फिल्डींग लावणे सुरू केले. नगराध्यक्षाच्या निवडीकरिता गुरुवारी अर्ज दाखल करावयाचे होते. यानुसार गुरुवारी जिल्ह्यातील सहाही पालिकांकरिता एकूण २० नामांकन दाखल झाले. यात सर्वाधिक सहा अर्ज हिंगणघाट पालिकेत दाखल झाले तर देवळी पालिकेत भाजपच्या शोभा तडस यांचा एकच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविरोध निश्चित मानली जात आहे.विधानसभेच्या तोंडावर होत असलेल्या या निवडणुकीत आपलीच सत्ता राहावी, याकरिता सारेच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यातील सहाही पालिकांच्या नगराध्यक्षाची निवडणूक २२ जुलै रोजी होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणानुसार सदस्यांनी आपणही नगराध्यक्ष होवू शकतो असे म्हणत तयारी सुरू केली तर काही अपक्षांनीही नगराध्यक्षपदाची अपेक्षा ठेवत अर्ज सादर केला. वर्धा पालिकेचे नराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाकरिता राखीव असून तीन अर्ज सादर केले आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व बसप सदस्यांनी आपली उमेदवारी दाखल केली. सिंदी (रेल्वे) पालिकेत नामाप्र महिलेकरिता नगराध्यक्षपद राखीव असल्याने येथे महिलींची गर्दी आहे. येथे चार अर्ज सादर करण्यात आले आहे. यातील तीन अर्ज काँग्रेसचे असून एकाच उमेदवाराने दोन अर्ज तर एक अर्ज भाजपकडून सादर करण्यात आला आहे. पुलगाव पालिकेचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या इतर मागास म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. या पालिकेत नगराध्यक्षपदाकरिता जिल्ह्यात सर्वाधिक सहा अर्ज सादर झाले आहेत. यात काँग्रेसच्या तीन सदस्यांनी अर्ज सादर केले तर भाजपकडून एक व दोन अपक्षांनी उमेदवारी दाखल केली आहे. पुलगाव प्रमाणे हिंगणघाट येथेही नगराध्यक्षपद नागरिकांच्या इतर मागास म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. येथे पाच सदस्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. एक अपक्ष तर चार राष्ट्रवादीच्या सदस्यांचा समावेश आहे. देवळी येथील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव असल्यामुळे येथे केवळ एकच अर्ज सादर करण्यात आला आहे. आर्वी येथील नगराध्यक्षपद हे खुला प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. येथे असलेल्या राजकीय समीकरणामुळे ही निवडणूक महत्त्वाची मानल्या जात आहे. आवीज्ञत आजी-माजी आमदार समोरासमोर असलेल्या या पालिकेत दोघांनीच उमेदवारी दाखल केली असून एक भाजपचा व दुसरा काँग्रेसचा आहे. यामुळे येथील निवडणूक अतीतटीची होणार असल्याचे बोलले जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)