शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

जिल्ह्यात १८.३९ टक्केच जलसाठा

By admin | Updated: July 12, 2014 01:37 IST

जुलै महिना अर्ध्यावर आला आहे. पावसाचे चारही नक्षत्र कोरडे जाण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्या; मात्र त्याला पाऊस आला असे म्हणता येणार नाही.

रूपेश खैरी वर्धाजुलै महिना अर्ध्यावर आला आहे. पावसाचे चारही नक्षत्र कोरडे जाण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्या; मात्र त्याला पाऊस आला असे म्हणता येणार नाही. पावसाच्या दडीने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस आला नसल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यांचीही पातळी खाली जात आहे. जिल्ह्यात असलेल्या छोट्या मोठ्या अशा एकूण १३ जलसाठ्यात सरासरी १८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील मदन (उन्नई) येथील जलसाठा पूरता आटला आहे. यामुळे पाण्याची समस्या बिकट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आहेत. या दिवसात कुठेच जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६१४.२ मिलीमिटर पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे गणित तर बिघडलेच शिवाय येत्या दिवसात पाऊस आला नाही सर्वच गणित बिघडणार असल्याचे चित्र आहे. पाऊस येत नसल्याने जलाशयातील पाण्याची पातळी खालावत आहे. गत वर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जलाशये ओव्हरफ्लो झाली असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात त्या जलसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सध्या जलसाठ्या असलेल्या पाण्यामुळे टंचाईसदृृश्य स्थिती नसली तरी येत्या दिवसात पाण्याची टंचाई भासणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील तीन धरणातील जलसाठा दोन दलघमी मिटरच्या आत आले आहे. यामुळे काही दिवसात पाऊस आला नाही तर या धरणातील पाणीही संपण्याच्या मार्गावर आले आहे. यात पंचधरा, पोथरा, डोंगरगाव या धरणांचा समावेश आहे. या धरणातून शेतीकरिता पाणी सोडण्यात येते.