शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

१०४९ गावांवर दुष्काळाची गडद छाया

By admin | Updated: November 22, 2014 01:31 IST

दरवर्षीपेक्षा यंदाची दुष्काळी स्थिती भीषण आहे. दुष्काळ काळात पिकांना भाव असतो. यंदा पिकांनाही भाव नाही. जिल्ह्यात १,३८७ गावे खरीप हंगाम पिकाखालील आहे.

राजेश भोजेकर वर्धादरवर्षीपेक्षा यंदाची दुष्काळी स्थिती भीषण आहे. दुष्काळ काळात पिकांना भाव असतो. यंदा पिकांनाही भाव नाही. जिल्ह्यात १,३८७ गावे खरीप हंगाम पिकाखालील आहे. पैकी प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणाने तसेच लागवडयोग्य नसल्यामुळे पेरणी केली न जाणारी ४६ गावे वगळता खरीप पिकास पात्र १,३४१ पैकी १,०४९ गावांची खरीप पिकांची सुधारीत हंगामी पैसेवारी ५० व त्यापेक्षा आत आहे, तर केवळ २९२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक असली तरी तीसुद्धा ५१ ते ६० च्या घरातच आहे. ही स्थिती बघता संपूर्ण वर्धा जिल्हाच यंदा दुष्काळाच्या गदड छायेत आहे. ही भीषण स्थिती असलेला वर्धा जिल्हा विदर्भातील एकमेव आहे.समुद्रपूर तालुक्यातील २२२ पैकी खरीपाखालील सर्व २१९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. या पाठोपाठ आर्वी तालुक्याचा क्रमांक लागतो. आर्वी तालुक्यातील खरीप पिकाखालील २१९ पैकी १७२ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. हिंगणघाट तालुक्यातील १८८ पैकी खरीपाखालील सर्व १८७ गावांची पैसेवारीही ५० पेक्षा कमी आहे. देवळी तालुक्यातील १५० पैकी खरीप पिकाखालील १४९ गावांमध्येही दुष्काळी स्थिती आहे. या सर्व गावांची पैसेवारी ५० च्या आत आहे. सेलू तालुक्यातील १७५ पैकी खरीपाच्या सर्व १६८ गावांमध्ये भीषण दुष्काळी स्थिती आहे. या सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. वर्धा तालुक्यातील १५५ पैकी खरीप पिकाखालील १५४ गावांची पैसेवारी ५० च्या आत आहे. कारंजा आणि आष्टी तालुक्यात मात्र शासनाच्या लेखी दुष्काळी स्थिती नसल्याचे शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये कारंजातील १२० आणि आष्टीतील १३६ यासोबतच आर्वीतील ३६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त असल्याचे दर्शविण्यात आले आहे.