शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

१०४९ गावांवर दुष्काळाची गडद छाया

By admin | Updated: November 22, 2014 01:31 IST

दरवर्षीपेक्षा यंदाची दुष्काळी स्थिती भीषण आहे. दुष्काळ काळात पिकांना भाव असतो. यंदा पिकांनाही भाव नाही. जिल्ह्यात १,३८७ गावे खरीप हंगाम पिकाखालील आहे.

राजेश भोजेकर वर्धादरवर्षीपेक्षा यंदाची दुष्काळी स्थिती भीषण आहे. दुष्काळ काळात पिकांना भाव असतो. यंदा पिकांनाही भाव नाही. जिल्ह्यात १,३८७ गावे खरीप हंगाम पिकाखालील आहे. पैकी प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणाने तसेच लागवडयोग्य नसल्यामुळे पेरणी केली न जाणारी ४६ गावे वगळता खरीप पिकास पात्र १,३४१ पैकी १,०४९ गावांची खरीप पिकांची सुधारीत हंगामी पैसेवारी ५० व त्यापेक्षा आत आहे, तर केवळ २९२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक असली तरी तीसुद्धा ५१ ते ६० च्या घरातच आहे. ही स्थिती बघता संपूर्ण वर्धा जिल्हाच यंदा दुष्काळाच्या गदड छायेत आहे. ही भीषण स्थिती असलेला वर्धा जिल्हा विदर्भातील एकमेव आहे.समुद्रपूर तालुक्यातील २२२ पैकी खरीपाखालील सर्व २१९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. या पाठोपाठ आर्वी तालुक्याचा क्रमांक लागतो. आर्वी तालुक्यातील खरीप पिकाखालील २१९ पैकी १७२ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. हिंगणघाट तालुक्यातील १८८ पैकी खरीपाखालील सर्व १८७ गावांची पैसेवारीही ५० पेक्षा कमी आहे. देवळी तालुक्यातील १५० पैकी खरीप पिकाखालील १४९ गावांमध्येही दुष्काळी स्थिती आहे. या सर्व गावांची पैसेवारी ५० च्या आत आहे. सेलू तालुक्यातील १७५ पैकी खरीपाच्या सर्व १६८ गावांमध्ये भीषण दुष्काळी स्थिती आहे. या सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. वर्धा तालुक्यातील १५५ पैकी खरीप पिकाखालील १५४ गावांची पैसेवारी ५० च्या आत आहे. कारंजा आणि आष्टी तालुक्यात मात्र शासनाच्या लेखी दुष्काळी स्थिती नसल्याचे शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये कारंजातील १२० आणि आष्टीतील १३६ यासोबतच आर्वीतील ३६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त असल्याचे दर्शविण्यात आले आहे.