शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

घाऊकला फटका, किरकोळ विक्रेत्यांची चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ एप्रिलपासून कल्याण डोंबिवलीत लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ एप्रिलपासून कल्याण डोंबिवलीत लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका आंबा व्यापाऱ्यांना बसला आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी दिलेल्या कमी वेळेमुळे व्यापारी माल कमी मागवीत आहे. त्यामुळे बाजारात हापूस असला तरी कर्नाटकचा हापूस आंब्याची विक्री जास्त होत आहे. घाऊक बाजारात आंब्याचा भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत दीडपटीने कमी झाला आहे, तर किरकोळ बाजारात आंबा विक्रेत्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात जास्त भावाने हापूस विकला जात आहे. घाऊकला फटका, तर किरकोळ विक्रेत्यांची चलती आहे. तरीही हापूसचा दर हा ग्राहकाला महागच आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याचा व्यापार करणारे घाऊक व्यापारी किशोर घनश्यामदास यांनी सांगितले की, त्यांच्याकडून सहा डझन हापूस आंब्याची एक पेटी दोन हजार १०० रुपये किमतीला विकली जाते. किरकोळ व्यापारी त्यांच्याकडून ही पेटी घेऊन जातात. किरकोळ बाजारात एक डझन हापूस आंबा हा ४५० ते ५०० रुपये दराने विकला जात आहे. बाजारात कर्नाटक हापूस आंबाही आहे. तो घाऊक बाजारात ३० ते ५० रुपये किलो दराने विकला जात असला तरी किरकोळ बाजारात त्याला ५० ते ७० रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे हापूसचे भाव आजही जास्त असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

लक्ष्मी भाजीपाला व फळ बाजारातील व्यापारी बिसमिल्ला शेख यांनी सांगितले की, मागच्यावर्षी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होते. त्यावेळी अत्यंत कडक लॉकडाऊन असल्याने आंब्याचा व्यापार जास्त झाला नाही. त्यानंतर जानेवारी महिन्यात लॉकडाऊऩ शिथिल झाले. तेव्हा व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली त्यामुळे मार्च महिन्यापासूनच कल्याण-डोंबिवली महापालिकेने कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर राज्याच्या आदेशाने एप्रिलपासून लॉकडाऊन आहे. त्यात व्यापाऱ्यांना व्यापारासाठी दिलेली वेळही कमी आहे. चार तासांत व्यापार कसा होणार, ग्राहक बाजारात जास्त प्रमाणात दिसून येत नाही. त्यामुळे मालाला उठाव नाही. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील शेतकरी हे आंबा पाठवू का अशी विचारणा करतात. माल मागवून काय करणार. बाजारात मालाला उठावच नाही. त्यामुळे आम्ही व्यापारी कमीच माल मागवितो.

--------------

सामान्यांची या आंब्याला पसंती

हापूसच्या जोडीला केशर, पायरी, गावरान आंब्यांचीही विक्री केली जात आहे. त्याचबरोबर दशेरी हा आंबा उत्तर भारतातून येतो. त्यालाही मागणी आहे. सध्या बाजारात केशर आणि दशेरी आंब्यांची चलती आहे. त्याच्या जोडीला तोतापुरी, अलिबाग, बदाम या आंब्याची विक्री होत आहे. सामान्यांना हापूस परवडत नसल्याने त्यांच्याकडून तोतापुरी, बदाम आणि अलिबाग आंब्याला पसंती दिली जात आहे.

------------

खरा आंबा रायवळ

या आंब्यांच्या जातीसह रायवळ आंबाही बाजारात आसपासच्या गाव खेड्यातून येतो. त्यात ठाणे आणि नाशिकच्या जंगल आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोरीतून येतो. हा रायवळ आंबा हा आदिवासी बांधव विक्रीला आणतात. त्यात शेऱ्या आंबा आणि चोख्या आंबा, खोबऱ्या आंबा अशा रायवळ जाती आहे. रायवळ आंबा हा टिकला पाहिजे. कारण खरा आंबा तोच आहे. हापूस हा कलमी आंबा आहे. रायवळ टिकविण्यासाठी कॉस्मॉस इकॉलॉजीलिक संस्थेचे प्रमुख डॉ. प्रा. उदयकुमार पाध्ये प्रयत्नशील आहेत.

-----------

आंब्याचे दर

हापूस (रत्नागिरी)-४५० ते ५०० रुपये डझन

हापूस (कर्नाटक)- ७० रुपये प्रति किलो

-------------

किरकाेळ बाजारातील आंब्याचे प्रति किलो दर

केशर- १०० रुपये

पायरी- ८० रुपये

गावरान- ६० रुपये

-------------

घाऊक बाजारातील आंब्याचे प्रति किलो दर

केशर- ७० रुपये

पायरी- ४० रुपये

गावरान- ३० रुपये

-------------