शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

घाऊकला फटका, किरकोळ विक्रेत्यांची चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ एप्रिलपासून कल्याण डोंबिवलीत लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ एप्रिलपासून कल्याण डोंबिवलीत लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका आंबा व्यापाऱ्यांना बसला आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी दिलेल्या कमी वेळेमुळे व्यापारी माल कमी मागवीत आहे. त्यामुळे बाजारात हापूस असला तरी कर्नाटकचा हापूस आंब्याची विक्री जास्त होत आहे. घाऊक बाजारात आंब्याचा भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत दीडपटीने कमी झाला आहे, तर किरकोळ बाजारात आंबा विक्रेत्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात जास्त भावाने हापूस विकला जात आहे. घाऊकला फटका, तर किरकोळ विक्रेत्यांची चलती आहे. तरीही हापूसचा दर हा ग्राहकाला महागच आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याचा व्यापार करणारे घाऊक व्यापारी किशोर घनश्यामदास यांनी सांगितले की, त्यांच्याकडून सहा डझन हापूस आंब्याची एक पेटी दोन हजार १०० रुपये किमतीला विकली जाते. किरकोळ व्यापारी त्यांच्याकडून ही पेटी घेऊन जातात. किरकोळ बाजारात एक डझन हापूस आंबा हा ४५० ते ५०० रुपये दराने विकला जात आहे. बाजारात कर्नाटक हापूस आंबाही आहे. तो घाऊक बाजारात ३० ते ५० रुपये किलो दराने विकला जात असला तरी किरकोळ बाजारात त्याला ५० ते ७० रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे हापूसचे भाव आजही जास्त असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

लक्ष्मी भाजीपाला व फळ बाजारातील व्यापारी बिसमिल्ला शेख यांनी सांगितले की, मागच्यावर्षी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होते. त्यावेळी अत्यंत कडक लॉकडाऊन असल्याने आंब्याचा व्यापार जास्त झाला नाही. त्यानंतर जानेवारी महिन्यात लॉकडाऊऩ शिथिल झाले. तेव्हा व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली त्यामुळे मार्च महिन्यापासूनच कल्याण-डोंबिवली महापालिकेने कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर राज्याच्या आदेशाने एप्रिलपासून लॉकडाऊन आहे. त्यात व्यापाऱ्यांना व्यापारासाठी दिलेली वेळही कमी आहे. चार तासांत व्यापार कसा होणार, ग्राहक बाजारात जास्त प्रमाणात दिसून येत नाही. त्यामुळे मालाला उठाव नाही. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील शेतकरी हे आंबा पाठवू का अशी विचारणा करतात. माल मागवून काय करणार. बाजारात मालाला उठावच नाही. त्यामुळे आम्ही व्यापारी कमीच माल मागवितो.

--------------

सामान्यांची या आंब्याला पसंती

हापूसच्या जोडीला केशर, पायरी, गावरान आंब्यांचीही विक्री केली जात आहे. त्याचबरोबर दशेरी हा आंबा उत्तर भारतातून येतो. त्यालाही मागणी आहे. सध्या बाजारात केशर आणि दशेरी आंब्यांची चलती आहे. त्याच्या जोडीला तोतापुरी, अलिबाग, बदाम या आंब्याची विक्री होत आहे. सामान्यांना हापूस परवडत नसल्याने त्यांच्याकडून तोतापुरी, बदाम आणि अलिबाग आंब्याला पसंती दिली जात आहे.

------------

खरा आंबा रायवळ

या आंब्यांच्या जातीसह रायवळ आंबाही बाजारात आसपासच्या गाव खेड्यातून येतो. त्यात ठाणे आणि नाशिकच्या जंगल आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोरीतून येतो. हा रायवळ आंबा हा आदिवासी बांधव विक्रीला आणतात. त्यात शेऱ्या आंबा आणि चोख्या आंबा, खोबऱ्या आंबा अशा रायवळ जाती आहे. रायवळ आंबा हा टिकला पाहिजे. कारण खरा आंबा तोच आहे. हापूस हा कलमी आंबा आहे. रायवळ टिकविण्यासाठी कॉस्मॉस इकॉलॉजीलिक संस्थेचे प्रमुख डॉ. प्रा. उदयकुमार पाध्ये प्रयत्नशील आहेत.

-----------

आंब्याचे दर

हापूस (रत्नागिरी)-४५० ते ५०० रुपये डझन

हापूस (कर्नाटक)- ७० रुपये प्रति किलो

-------------

किरकाेळ बाजारातील आंब्याचे प्रति किलो दर

केशर- १०० रुपये

पायरी- ८० रुपये

गावरान- ६० रुपये

-------------

घाऊक बाजारातील आंब्याचे प्रति किलो दर

केशर- ७० रुपये

पायरी- ४० रुपये

गावरान- ३० रुपये

-------------