शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

घाऊकला फटका, किरकोळ विक्रेत्यांची चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ एप्रिलपासून कल्याण डोंबिवलीत लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ एप्रिलपासून कल्याण डोंबिवलीत लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका आंबा व्यापाऱ्यांना बसला आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी दिलेल्या कमी वेळेमुळे व्यापारी माल कमी मागवीत आहे. त्यामुळे बाजारात हापूस असला तरी कर्नाटकचा हापूस आंब्याची विक्री जास्त होत आहे. घाऊक बाजारात आंब्याचा भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत दीडपटीने कमी झाला आहे, तर किरकोळ बाजारात आंबा विक्रेत्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात जास्त भावाने हापूस विकला जात आहे. घाऊकला फटका, तर किरकोळ विक्रेत्यांची चलती आहे. तरीही हापूसचा दर हा ग्राहकाला महागच आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याचा व्यापार करणारे घाऊक व्यापारी किशोर घनश्यामदास यांनी सांगितले की, त्यांच्याकडून सहा डझन हापूस आंब्याची एक पेटी दोन हजार १०० रुपये किमतीला विकली जाते. किरकोळ व्यापारी त्यांच्याकडून ही पेटी घेऊन जातात. किरकोळ बाजारात एक डझन हापूस आंबा हा ४५० ते ५०० रुपये दराने विकला जात आहे. बाजारात कर्नाटक हापूस आंबाही आहे. तो घाऊक बाजारात ३० ते ५० रुपये किलो दराने विकला जात असला तरी किरकोळ बाजारात त्याला ५० ते ७० रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे हापूसचे भाव आजही जास्त असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

लक्ष्मी भाजीपाला व फळ बाजारातील व्यापारी बिसमिल्ला शेख यांनी सांगितले की, मागच्यावर्षी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होते. त्यावेळी अत्यंत कडक लॉकडाऊन असल्याने आंब्याचा व्यापार जास्त झाला नाही. त्यानंतर जानेवारी महिन्यात लॉकडाऊऩ शिथिल झाले. तेव्हा व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली त्यामुळे मार्च महिन्यापासूनच कल्याण-डोंबिवली महापालिकेने कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर राज्याच्या आदेशाने एप्रिलपासून लॉकडाऊन आहे. त्यात व्यापाऱ्यांना व्यापारासाठी दिलेली वेळही कमी आहे. चार तासांत व्यापार कसा होणार, ग्राहक बाजारात जास्त प्रमाणात दिसून येत नाही. त्यामुळे मालाला उठाव नाही. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील शेतकरी हे आंबा पाठवू का अशी विचारणा करतात. माल मागवून काय करणार. बाजारात मालाला उठावच नाही. त्यामुळे आम्ही व्यापारी कमीच माल मागवितो.

--------------

सामान्यांची या आंब्याला पसंती

हापूसच्या जोडीला केशर, पायरी, गावरान आंब्यांचीही विक्री केली जात आहे. त्याचबरोबर दशेरी हा आंबा उत्तर भारतातून येतो. त्यालाही मागणी आहे. सध्या बाजारात केशर आणि दशेरी आंब्यांची चलती आहे. त्याच्या जोडीला तोतापुरी, अलिबाग, बदाम या आंब्याची विक्री होत आहे. सामान्यांना हापूस परवडत नसल्याने त्यांच्याकडून तोतापुरी, बदाम आणि अलिबाग आंब्याला पसंती दिली जात आहे.

------------

खरा आंबा रायवळ

या आंब्यांच्या जातीसह रायवळ आंबाही बाजारात आसपासच्या गाव खेड्यातून येतो. त्यात ठाणे आणि नाशिकच्या जंगल आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोरीतून येतो. हा रायवळ आंबा हा आदिवासी बांधव विक्रीला आणतात. त्यात शेऱ्या आंबा आणि चोख्या आंबा, खोबऱ्या आंबा अशा रायवळ जाती आहे. रायवळ आंबा हा टिकला पाहिजे. कारण खरा आंबा तोच आहे. हापूस हा कलमी आंबा आहे. रायवळ टिकविण्यासाठी कॉस्मॉस इकॉलॉजीलिक संस्थेचे प्रमुख डॉ. प्रा. उदयकुमार पाध्ये प्रयत्नशील आहेत.

-----------

आंब्याचे दर

हापूस (रत्नागिरी)-४५० ते ५०० रुपये डझन

हापूस (कर्नाटक)- ७० रुपये प्रति किलो

-------------

किरकाेळ बाजारातील आंब्याचे प्रति किलो दर

केशर- १०० रुपये

पायरी- ८० रुपये

गावरान- ६० रुपये

-------------

घाऊक बाजारातील आंब्याचे प्रति किलो दर

केशर- ७० रुपये

पायरी- ४० रुपये

गावरान- ३० रुपये

-------------