शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार करणाऱ्यांवरील कारवाईचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:57 IST

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मात्र, आता त्यावरील कारवाई मंदावलेली आहे. तरीदेखील त्यातील सहभागी

ठाणे : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मात्र, आता त्यावरील कारवाई मंदावलेली आहे. तरीदेखील त्यातील सहभागी असणाºयांवर पोलीस कारवाई करीत असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण, भ्रष्टाचारातील सहभागी अभियंत्यांसह संबंधित ग्रामपंचायत सदस्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली असून त्याविरोधात तर्कवितर्कही काढले जात आहे.लोकांच्या अत्यंत गरजेचा व जिव्हाळ्याचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आहे. हा विभाग नाजूकतेने हाताळण्यासाठी मागील काही वर्षांपासून जबाबदार कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदेकडे नाही. शाखा अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याची जबाबदारी आहे. त्यातही या विभागातील भ्रष्टाचार वाढत असल्यामुळे काही अभियंते या आधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य योजनेंतर्गत ११० कोटी खर्च करून नळपाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या. मात्र, तत्कालीन तालुका अभियंत्यांच्या पाठबळावर ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार झाला. यामुळे बहुतांशी गावांच्या पाणीपुरवठा योजना आजही धूळखात पडून आहेत.ग्रामीण भागात एका व्यक्तीस सुमारे ९५ लीटर पाणी देण्याचे मानदंड आहे. पण तो पूर्ण करताच आलेला नाही. सुमारे ११७ ग्रामपंचायतींमध्ये जलस्वराज्य योजना राबवली. त्यासाठी ११० कोटी रुपये खर्च झाले. यातून यामध्ये २२९ पैकी २१२ विहिरींची कामे करण्यात आली. त्यातील सुमारे २०० विहिरींची कामे पूर्ण आहेत. ११ विहिरींची कामे झाली नाहीत. २१६ जुन्या विहिरींच्या दुरुस्तींपैकी केवळ २०५ चे कामे झाली. उर्वरित कामेच झालीच नाही. २१६ हातपंपांपैकी २१३ हातपंप घेण्यात आले.