शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भ्रष्टाचार करणाऱ्यांवरील कारवाईचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:57 IST

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मात्र, आता त्यावरील कारवाई मंदावलेली आहे. तरीदेखील त्यातील सहभागी

ठाणे : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मात्र, आता त्यावरील कारवाई मंदावलेली आहे. तरीदेखील त्यातील सहभागी असणाºयांवर पोलीस कारवाई करीत असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण, भ्रष्टाचारातील सहभागी अभियंत्यांसह संबंधित ग्रामपंचायत सदस्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली असून त्याविरोधात तर्कवितर्कही काढले जात आहे.लोकांच्या अत्यंत गरजेचा व जिव्हाळ्याचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आहे. हा विभाग नाजूकतेने हाताळण्यासाठी मागील काही वर्षांपासून जबाबदार कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदेकडे नाही. शाखा अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याची जबाबदारी आहे. त्यातही या विभागातील भ्रष्टाचार वाढत असल्यामुळे काही अभियंते या आधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य योजनेंतर्गत ११० कोटी खर्च करून नळपाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या. मात्र, तत्कालीन तालुका अभियंत्यांच्या पाठबळावर ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार झाला. यामुळे बहुतांशी गावांच्या पाणीपुरवठा योजना आजही धूळखात पडून आहेत.ग्रामीण भागात एका व्यक्तीस सुमारे ९५ लीटर पाणी देण्याचे मानदंड आहे. पण तो पूर्ण करताच आलेला नाही. सुमारे ११७ ग्रामपंचायतींमध्ये जलस्वराज्य योजना राबवली. त्यासाठी ११० कोटी रुपये खर्च झाले. यातून यामध्ये २२९ पैकी २१२ विहिरींची कामे करण्यात आली. त्यातील सुमारे २०० विहिरींची कामे पूर्ण आहेत. ११ विहिरींची कामे झाली नाहीत. २१६ जुन्या विहिरींच्या दुरुस्तींपैकी केवळ २०५ चे कामे झाली. उर्वरित कामेच झालीच नाही. २१६ हातपंपांपैकी २१३ हातपंप घेण्यात आले.