शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीव्र पाणीटंचाईने पळाले उमेदवारांच्या तोंडचे पाणी

By admin | Updated: January 29, 2017 03:13 IST

लोकसंख्येच्या गरजेपेक्षा अधिक पाणीपुरवठा होऊनही उल्हासनगरमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठवडयातून फक्त दोन-तीन दिवस कमी दाबाने

उल्हासनगर : लोकसंख्येच्या गरजेपेक्षा अधिक पाणीपुरवठा होऊनही उल्हासनगरमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठवडयातून फक्त दोन-तीन दिवस कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेकांनी टँकर मागवून त्यावर उतारा शोधला आहे. पाणीयजोना पूर्ण न झाल्याने, त्यातील कामे विस्कळीत स्वरूपात पूर्ण केल्याने आणि सध्याच्या पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांना वाट्टेल तशा अवैध जोडण्या दिल्याने पावसाळा संपताच महिनाभरात शहरात पाणीटंचाईने डोेके वर काढले आहे. दरवर्षी फक्त रस्ते, नाले, पायवाटा यांच्यावरच कोट्यवधींचा खर्च झाला आहे. त्यामुळे पाणीयजोना पूर्ण करण्यासाठी पुन्हा कोट्यवधी रूपये खर्च करण्याचा मुद्दा आयुक्तांनी मांडला आहे. सध्या तरी वेळ ठरवून विभागवार पाणीवाटपाचा पर्याय त्यांनी पुढे आणला आहे, पण तो अंमलात आलेला नाही. त्यामुळे मतदारांना तोंड देता देता उमेदवारांची दमछाक होत आहे.गेल्या वर्षी पाण्यावरून नागरिकांनी आणीबाणीची परिस्थिती अनुभवली. पाण्याच्या टाक्यांना संरक्षण पुरवण्याची वेळ आली. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षणात पाण्याची राखण करावी लागली होती. नगरसेवक, नागरिकही आपापल्या परिसरात पाण्यासाठी पहारा देत होते. त्यामुळे पाण्याचा मुद्दा हाच यंदाच्या निवडणुकीत कळीच मुद्दा बनला आहे. वितरणाचे जाळे ५० वर्षापूर्वीचे आहे. ३५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी वाया जात असल्याचा अहवाल पालिकेने प्रसिद्ध केला. आधी १३२ कोटींचा खर्च असलेल्या या योजनेचा खर्च ३०० कोटींवर गेला. (प्रतिनिधी)झोपडपट्ट्या कोरड्याच ३०० कोटींची पाणीवितरण योजना राबवूनही शहरातील ४८ अधिकृत आणि १०५ झोपडपट्ट्यांत जलवाहिन्याच टाकण्यात आल्या नाहीत. तेथे पाणीटंचाई तीव्र आहे. त्यामुळे तेथील मतदार इतर भागांपेक्षा अधिक आक्रमक आहेत. एमएमआरडीएकडून कर्ज ही योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेने एमएमआरडीएकडून ६० कोटींचे कर्ज घेतले. जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीवर आणखी ५० कोटी खर्च केले. तरीही योजना अपूर्ण आहे. ती पूर्ण करण्यासाठी अजून ५० कोटींची गरज असल्याचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले आहे. या योजनेच्या आॅडिटचे काम सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यावर अनेकांचे घसे कोरडे पडण्याची शक्यता आहे. एकाच कंपनीची मक्तेदारी महापालिकेतील बहुतांश मोठी कामे एकाच कंपनीकडे कशी, असा प्रश्न करून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सत्ताधारी व विरोध पक्षांच्या कामकाजाच्या पध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. २५ कोटीची श्रमसाफल्य गृह योजना, ३०० कोटीची पाणी वितरण योजना, रस्ते बांधणी, कचरा उचलण्याचा ठेका एकाच कंपनाला देण्यात आला आहे. तोही वाढीव दराने, हे कसे? असा प्रश्नही त्यांनी विचारून त्याची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे ही सर्व कामे वादात सापडली आहेत.