शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

विनय साहूचा स्वच्छता संदेश

By admin | Updated: March 21, 2016 01:29 IST

स्वच्छ भारत अभियान’ राबवावे लागते, ही देशातील नागरिकांची शोकांतिका असून प्रत्येक नागरिकाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सध्या या अभियानाच्या नावाखाली अनेक

डोंबिवली : ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवावे लागते, ही देशातील नागरिकांची शोकांतिका असून प्रत्येक नागरिकाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सध्या या अभियानाच्या नावाखाली अनेक ठिकाणी केवळ फोटोसेशन केले जाते. प्रत्यक्षात अस्वच्छता तशीच राहते. हे देखावे करून आपण कोणाला फसवत आहोत, असा सवाल मणिपूरच्या (इम्फाळ) विनय साहू याने केला. ‘स्वच्छता राखा’, असा संदेश देत साहू सायकलने देशभ्रमंती करतोय.२००० मध्ये दुचाकीच्या अपघातात त्याला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे डावा हात काम करेनासा झाला. पण, तरीही आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या जोरावर त्याने सायकलभ्रमंती करत देशवासीयांना संदेश देण्याचा चंग बांधला. तो रविवारी डोंबिवलीत आला होता. साहूने १ मार्चला बंगळुरू येथून सायकलवरून देशभ्रमंती सुरू केली. त्या दौऱ्यात बंगळुरू, हैदराबाद, जहिराबाद, उमरगंज, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, पुणे, लोणावळा, पनवेल आणि डोंबिवली असा त्याचा प्रवास झाला. आता पुढे तो सुरत, राजस्थान, दिल्ली, काश्मीर असा प्रवास करणार आहे. या दौऱ्यात जेथे रात्र होते, तेथे तो वास्तव्य करतो. दौऱ्यातील अनुभवाबद्दल साहू म्हणाला की, काही जणांनी त्याच्या उपक्रमाची खिल्ली उडवली, तर बहुतांश लोकांनी त्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. विनय जेथे थांबतो, तेथे स्वच्छतेचा संदेश देतो. अनेक ठिकाणी स्वत: सफाई करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतो.महाराष्ट्रात त्याला योगदान फाउंडेशनने साहाय्य केले. विनयला पुणे-लोणावळा, पनवेल आणि डोंबिवलीत वास्तव्यासाठी आणि नागरिकांशी संवाद साधण्यासाठी या संस्थेने सहकार्य केले. त्याच्या या जिद्दीला सलाम करत एका पुणेकराने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ५० हजारांची सायकल भेट दिल्याचे किरण पाटील यांनी सांगितले.दिवसात ६ ते ८ तास सायकल चालवायची. प्रवासात जेवणाऐवजी लिंबूपाणी किंवा तत्सम पेय घेतल्याने अधिक काळ सायकल चालवणे सोपे जाते, असे तो सांगतो. त्याच्यासोबत तंबू, स्लिपिंग बॅग, सायकल ठेवण्यासाठी आवश्यक ते सामान आणि भारताचा तिरंगा एवढेच सामानसुमान आहे. * पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची त्याची इच्छा आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवून त्यांनी देशातील बकालीकडे लक्ष वेधले. राजस्थानच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घडवून देण्याचा शब्द दिला असल्याचे साहू सांगतो.* सिव्हील क्षेत्रात काम करत होतो, त्यानंतर शारीरिक आपत्ती आल्याने ते काम थांबले. लग्न झाले असून पत्नीसह दोन मुले व अन्य परिवार सध्या बंगळुरू येथे वास्तव्याला आहे. घरून फारसे प्रोत्साहन मिळत नाही, पण या उपक्रमाला ना देखील नाही, असे विनय म्हणाला. * -----------फोटो : २० डोंबिवली विनय सायकलअनिकेत घमंडी