शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

गावे होणार टंचाईमुक्त, साकडबावमध्ये जागृती, ‘वसुंधरा’चे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:20 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात एप्रिल आणि मे हे महिने पाणीटंचाईचे. त्यामुळेच धरणे असूनही पाण्यासाठी वणवण करणे ग्रामस्थांच्या नशिबी येते

अश्विनी भाटवडेकर ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात एप्रिल आणि मे हे महिने पाणीटंचाईचे. त्यामुळेच धरणे असूनही पाण्यासाठी वणवण करणे ग्रामस्थांच्या नशिबी येते. दरवर्षीचा हा त्रास दूर करण्याचे वसुंधरा संजीवनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवले. आणि त्याप्रमाणे गावकऱ्यांमध्ये जागृती करून वनराई बंधारे बांधले देखील. आता या बंधाऱ्यातील पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत तरी निश्चितच पुरेल, असे ‘वसुंधरा’चे पवन वाडे सांगतात.

शहापूर तालुक्यातील धरणांना लागूनच असलेले एक गाव, साकडबाव. गावाची लोकसंख्या जवळपास दोन हजार. यंदा तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाण्याचा त्रास सुरू झाला. येथेही टंचाई भेडसावू लागली. विद्यादान सहाय्यक मंडळाच्या मदतीने शिकणाºया विद्यार्थ्यांनी ही बाब वसुंधरा संजीवनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या कानावर घातली. त्यांनी देखील याची दखल घेत परिस्थितीची पाहणी केली. आणि सुरुवातीला तात्पुरता उपाय म्हणून वनराई बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी लोकांकडूनच श्रमदान करून घेण्याचे ठरवले. त्यादृष्टीने लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, याबाबत त्यांना माहिती दिली. आणि मग लोकांच्या मदतीने सिमेंटच्या पिशव्यांच्या सहाय्याने या कार्यकर्त्यांनी येथे ३ वनराई बंधारे बांधले. ज्यायोगे येथे पाणी साठून रहायला लागले. हेच पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत तरी निश्चितच पुरेल असा विश्वास वसुंधराच्या कार्यकर्त्यांना आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्तचा प्रश्न तरी सध्या थोड्याफार प्रमाणात सुटल्याचे वाडे यांचे म्हणणे आहे.

यापुढचा टप्पा म्हणजे चेक डॅम. वनराई बंधाऱ्यांच्या तुलनेत हा अधिक भक्कम असतो. आणि जास्त पाणी साठून राहण्यास मदत होते. वास्तविक, शहापूर तालुक्यातील प्रमुख व्यवसाय शेती. वर्षभर ही शेती करता यावी, लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. यादृष्टीने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, त्यांना अशाप्रकारे पाणी साठवून ठेवण्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम सुरू असून ग्रामस्थांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे ते सांगतात.

शहापूर तालुक्यात हे काम सुरू करण्यापूर्वी या संस्थेने मुरबाड तालुक्यातही काम केले.शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस पडतो. पण येथे पाण्याचे कोणतेही नियोजन नाही. हे वाहते पाणी अडवण्याची काही ना काही सोय हवी. अनेक सरकारी योजना तर लोकांना ठाऊकच नाहीत. त्याबाबतही जनजागृती व्हायला हवी.अलीकडे सर्रास बोरवेल खोदल्या जातात. यासाठी ड्रिलिंग करावे लागत असल्याने हे पर्यावरणाला हानीकारक आहे. त्यामुळेच हा बंधाºयांचा पर्याय अत्यंत उत्तम आणि तुलनेने सोपा आहे.