शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

चोर, दरोडेखोर पोलिसांच्या हाताबाहेर !

By admin | Updated: August 21, 2015 02:18 IST

सर्वसामान्यांवर थेट आघात करणारे पाकिटमारी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, लूटमार ते सशस्त्र दरोडे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या संघटीत टोळया महाराष्ट्र पोलिसांच्या हाताबाहेर गेल्या आहेत.

मुंबई : सर्वसामान्यांवर थेट आघात करणारे पाकिटमारी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, लूटमार ते सशस्त्र दरोडे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या संघटीत टोळया महाराष्ट्र पोलिसांच्या हाताबाहेर गेल्या आहेत. बहुधा पोलिसांचा धाक नसल्याने या गंभीर गुन्हयांची महाराष्ट्रात सर्वाधिक नोंद झाली आहे. इतकेच नव्हे तर लोकसंख्येच्या मानाने ही गुन्हेगारी राज्यात झपाटयाने वाढते आहे. पर्यायाने चोरी झालेल्या मालमत्तेतही राज्य पहिल्या स्थानी येऊन पाहोचले आहे.मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये सोनसाखळी चोरीचे सर्वात मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुंबईत तर दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडतात. प्रत्येक गुन्हयात सरासरी तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मारले जातात. विशेषत: या गुन्हयांमधले लक्ष्य हे रस्त्यांवरून पायी चालणाऱ्या स्त्रीया आहेत. आज एक तोळे सोन्याची किंमत २६ हजारांच्या आसपास आहे. तीन तोळयाचा दागिना चोरी झाला तर तो फटका कोणत्याही स्तरातल्या कुटुंबाला सोसणारा नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी महाराष्ट्रात सोनसाखळी चोरीसोबत अन्य जबरी चोरीचे ९४६६ गुन्हे घडले. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली असून तिथे ६४६४ तर तिसऱ्या स्थानी असलेल्या उत्तरप्रदेशात ३९२० गुन्हे घडले आहेत. विशेष म्हणजे एक लाख लोकसंख्येमागे ३ जबरी चोरीचे गुन्हे हा संपूर्ण देशभरातील सरासरी दर आहे. हाच दर महाराष्ट्रात ८ इतका आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र दरोडेही महाराष्ट्रात सर्वाधिक पडले. गेल्यावर्षी दरोडयांचे ८८५ गुन्हे घडले. त्यातल्या १३ गुन्हयांमध्ये दरोडेखोरांनी १५ जणांची हत्या केली. देशातला दर ०.४ इतका असून राज्यात तो दुप्पट म्हणजेच ०.८ इतका आहे. महाराष्ट्रानंतर ओडीशात ४८४, कर्नाटक-उत्तरप्रदेशात २९० दरोडयाचे गुन्हे नोंद झाले. महाराष्ट्रात घरफोडयांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत मोठे आहे. गेल्यावर्षी राज्यात ३७२५ इतक्या घरफोडया घडल्या. दिल्लीत ३४२६, गुजरातेत २८३९ घरफोडीच्या गुन्हयांची नोंद झाली. चोरी या प्रकारात एनसीआरबीने मोबाईल चोरी, पाकिटमारीपासून वाहनचोरीपर्यंतचे गुन्हे एकत्रित केले आहेत. चोरीत दिल्ली देशात सर्वोच्च आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ७८७५३ तर महाराष्ट्रात ५६२८३ चोरीच्या गुन्हयांची नोंद झाली. या दोन्ही राज्यांमधील चोरीचा दर हा दरलाख लोकसंख्येमागे अनुक्रमे ३८८.३, ४७.८ इतका आहे. मात्र देशातील चोरीच्या गुन्हयांचा दर हा ३५.४ इतका आहे. चोरीच्या उददेशाने घरात घुसणे, चोरी करणे या गुन्हयातही महाराष्ट्रच एक नंबरवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीत महाराष्ट्राच्या तुलनेत निम्म्याहून कमी गुन्हे घडले आहेत. या गुन्हेगारीचा दर पाहिल्यास दिल्ली महाराष्ट्रापेक्षा जास्त असुरिक्षत आहे. देशातील सरासरी दरापेक्षा महाराष्ट्रातलीही गुन्हेगारीही वाढली आहे.