शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

सांगा कसं जगायचं..

By admin | Updated: March 14, 2017 23:38 IST

मराठवाड्यात पावसाळ्यात साधारण ४२ दिवस पाऊस पडायचा. पुढे काही वर्षे तो ५४ दिवस होऊ लागला. आता तेवढाच पाऊस केवळ २८ ते ३१ दिवसांत पडत आहे.

मराठवाड्यात पावसाळ्यात साधारण ४२ दिवस पाऊस पडायचा. पुढे काही वर्षे तो ५४ दिवस होऊ लागला. आता तेवढाच पाऊस केवळ २८ ते ३१ दिवसांत पडत आहे. पावसाचे हे पाणी एक तर मुरते, वाहून जाते किंवा बाष्पीभवन होते. पाणी मुरण्याचे हे प्रमाण अधिकतर भूभागावरच अवलंबून असते. वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीपासून जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. त्यामुळे उरला प्रश्न बाष्पीभवनाचा. एका संशोधनानुसार पावसाचे तब्बल ५६ टक्के पाणी हे बाष्पीभवनातून जाते. म्हणजे साधारण आपल्याकडे ६५ लाख लिटर पाऊस पडतो. यातला १८ ते २० लाख लिटर पाऊस बाष्पीभवनातून जातो. वाळवंटात हे प्रमाण ६५ टक्के इतके असते. याचा अर्थ आपण वाळवंटाच्या मार्गानेच जात आहोत.हे सारे दुष्काळपुराण उगाळण्याचे कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी सत्यवान यशवंत यांनी डॉ. एस.एल. सनान्से यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठवाड्यातील पावसाचे संख्याशास्त्रीय विश्लेषण आणि पाऊसमानाचे पीक उत्पादनावर होणारे परिणाम’ यावर संशोधन केले आहे. जून ते आॅक्टोबर या काळातील १९७८-७९ ते २०१४-१५ या ३६ वर्षांच्या पावसाचे विश्लेषण ‘अ‍ॅव्हरेज लिकेंज मेथड’ने केले. यासाठी पुण्यातील भारतीय हवामान विभागाचा डाटा वापरला आहे. या संशोधनानुसार मराठवाड्यात सतत चार, सहा, आठ, दहा दिवस दडी मारण्याचे (ड्राय स्पेल) प्रमाण प्रचंड वाढ आहे. याचा गंभीर परिणाम पिकांची वाढ व उत्पादकतेवर होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सलग चार दिवस पाऊस न पडण्याची शक्यता प्रतिवर्षी ९९ टक्के एवढी, सहा दिवसांची ९६ टक्के, ८ दिवसांची ८६ टक्के, १० दिवस पावसाने दांडी मारण्याची शक्यता ६८ टक्के एवढी आढळून आली आहे. या दडीचा परिणाम प्रत्यक्षात पिकांवर होत आहे. १९७८ ते २०१४ या ३६ वर्षांच्या काळात पिकांच्या उत्पादनात सरासरी ८ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन सात टक्क्यांनी घटले आहे. हिंगोलीत ८.२ टक्क्यांनी, परभणीत ५.८ टक्क्यांनी, तर बीड जिल्ह्यात कापसाचे उत्पादन तब्बल ८.६ टक्क्यांनी घटले आहे. हे असेच सुरू राहिले तर दरडोई उत्पन्नाच्या दीड टक्का नुकसान हे शेतीत होऊ शकते. मग एक शेतकरी म्हणून मी काय करायचे? कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात, सांगा कसं जगायचं,कण्हत कण्हत की गाणं म्हणत...पेला अर्धा सरला आहे असंसुद्धा म्हणता येतंपेला अर्धा भरला आहे असंसुद्धा म्हणता येतंसरला आहे म्हणायचं कीभरला आहे म्हणायचंतुम्हीच ठरवा !औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादसारख्या चांगल्या पाऊस होणाऱ्या तालुक्यात आधी एक हजार मि.मी. पाऊस व्हायचा. आता तो ५०० मि.मी.वर आला आहे. याचा अर्थ या तालुक्यावर फार मोठे आकाश कोसळले, असा होत नाही. हा पाऊसदेखील कमी नाही. भारतात वा बाहेर जिथे कोठे या प्रमाणात पाऊस पडतो तेथील जलव्यवस्थापनाचा अभ्यास करून येथील शेतकऱ्यांनी तसा बदल करायला हवा. तसे जलव्यवस्थापन करायला हवे. प्रत्येक जिल्हा-तालुक्याला दुष्काळावर हीच मात्रा लागू पडते. शिवाय बाष्पीभवन रोखण्यासाठी जैविक कुंपण वाढविणे आणि झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करणे एवढेच आपल्या हातात आहे. दक्षिण-पश्चिम बाजूला अधिकाधिक झाडे लावून बाष्पीभवन रोखता येऊ शकते. कसदार जमीन परत मिळविण्यासाठी निंदण-खुरपणाच्या पद्धती बदलाव्या लागतील. सरकार काय करेल, याची वाट पाहत बसण्यापेक्षा परिसरात पडणारा पाऊस आणि त्याचे व्यवस्थापन याचा विचार प्रत्येक शेतकऱ्याने केला तरच भविष्यकाळ चांगला आहे. अन्यथा ढगात कितीही गोळ्या घालून पाऊस पाडला तरी तो पाऊस पुरवणी पडणार नाही. - सुधीर महाजन