शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

सांगाव, सांगर्लीत पाणीटंचाईवरून वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:41 IST

डोंबिवली : भोपर, नांदिवलीपाठोपाठ आता सांगाव, सांगर्ली भागातही पाणीटंचाई भेडसावत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागातून कमी ...

डोंबिवली : भोपर, नांदिवलीपाठोपाठ आता सांगाव, सांगर्ली भागातही पाणीटंचाई भेडसावत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागातून कमी दाबाने पाणी सोडण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली. पाण्यावरून आपापसात बाचाबाचीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही समस्या तातडीने सुटावी, अशी मागणी रहिवाशांनी केली.

पाणीसमस्येमुळे बुधवारी व गुरुवारी तेथे तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे प्रभागाच्या माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी रहिवाशांची संवाद साधून आपापसात वाद घालू नका, असे आवाहन केले. रहिवाशांनी पाटील यांच्यापुढे समस्येचा पाढा वाचल्यावर त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. पाणी कमी दाबाने येत आहे याबाबत महापालिका व एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांना पत्र दिल्याचे सांगण्यात आले.

उन्हाळा सुरू झाला असून, पाणीटंचाई भेडसावणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर नागरिक शांत झाले. पाणीसमस्या सुटावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

-----------------