शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

प्रकल्पग्रस्तांची जोरदार धडक

By admin | Updated: March 22, 2016 02:10 IST

गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाही या प्रकल्पात बाधित झालेल्या रहिवाशांचे कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुनर्वसन केलेले नाही.

कल्याण : गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाही या प्रकल्पात बाधित झालेल्या रहिवाशांचे कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुनर्वसन केलेले नाही. बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या घरकुलांमध्ये तातडीने त्यांचे पुनर्वसन करा, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी महापालिका मुख्यालयावर सोमवारीधडक मोर्चा काढला.पश्चिमेकडील दुर्गाडी चौक ते शिवाजी चौक ादरम्यान होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून महापालिका प्रशासनाने २००५ मध्ये गोविंदवाडी बायपास मार्गाचे काम हाती घेतले. त्या वेळी प्रकल्पात बाधित होणाऱ्या रहिवाशांना बीएसयूपी योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरकुलांमध्ये पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, त्या आश्वासनाला ११ वर्षे उलटूनही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेच नाही, याकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले. प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाच्या अनुषंगाने सांगितल्या जात असलेल्या अटी जाचक असल्याचा आरोप त्यांनी केला. २६ जुलै २००५ ला प्रलंयकारी महापुरात मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे नष्ट झाली. त्यामुळे पुरावा सादर करू शकत नसल्याने बहुतांश प्रकल्पग्रस्तांना हक्काच्या घराला मुकावे लागत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकताच शिष्टमंडळाने बीएसयूपी पुनर्वसन समितीचे सहायक आयुक्त प्रकाश ढोले यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. गोविंदवाडी प्रकल्पग्रस्तांची यादी ७५० जणांची असताना हजारोंच्या आसपास लाभार्थी पावत्या कशा दिल्या गेल्या, असा सवालही या वेळी करण्यात आला. (प्रतिनिधी)