शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
2
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
3
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
4
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी संकटमोचक ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
5
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
6
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
7
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
8
आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
9
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
10
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
11
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
12
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
13
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
14
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
15
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
16
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
17
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
18
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
19
मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
20
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत ई-बीटमार्शलद्वारे पेट्रोलिंग

By admin | Updated: January 13, 2017 06:32 IST

अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे पोलीस दलापुढे एक मोठे आव्हान आहे.

आकाश गायकवाड / डोंबिवलीअपुऱ्या मनुष्यबळामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे पोलीस दलापुढे एक मोठे आव्हान आहे. ते लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी सध्या अत्याधुनिक उपकरणांचा आधार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण परिमंडळ-३ च्या पोलिसांनी ई-बीटमार्शल पेट्रोलिंग संकल्पना राबवली आहे. त्यासाठी त्यांनी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस (आरएफआयडी) आधार घेतला आहे. परिमंडळाच्या आठही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ७०० ठिकाणी सेन्सर टॅग पॉइंट बसवले आहेत. यामुळे पेट्रोलिंगची थेट नोंद पोलीस ठाण्यात होत आहे. कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी रत्नागिरीत पोलीस अधीक्षक असताना ही संकल्पना राबवली होती. ती यशस्वी झाल्याने आता ती त्यांनी कल्याणमध्येही अमलात आणली आहे. पोलीस कर्मचारी, बीटमार्शल नीट गस्त घालत नाहीत, मनमानी करतात, आदी प्रकारच्या नागरिकांच्या नेहमीच तक्रारी असतात. शिवाय, वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, या उद्देशाने शिंदे यांनी गस्तीवर भर दिला. त्यासाठी त्यांनी आरएफआयडीचा आधार घेतला आहे. वायरलेस इन्फोटेक या कंपनीने आरएफआयडी या उपकरणाचे सेन्सर टॅग पॉइंट शहरात ७०० ठिकाणी माफक दरात बसवून दिले आहे. परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाण्यात तीन ते चार बीटमार्शल आहेत. एका बीटमार्शलला किमान २५ ठिकाणी भेट देणे बंधनकारक आहे. हे टॅग पॉइंट शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांचा परिसर, मंदिर, मशिदी, बँका, एटीएम मशीनबाहेर, टपाल कार्यालयांजवळ, सोनेचांदीच्या पेढ्यांजवळ, प्रत्येक चौक, गर्दीच्या ठिकाणी बसवले आहेत. या नवीन प्रणालीमुळे बीटमार्शल पोलिसांना स्वत:च्या मर्जीनुसार पेट्रोलिंग करता येत नाही. त्यांना वरिष्ठांनी दिलेल्या मार्गानुसारच पेट्रोलिंग करावे लागते. सेन्सर टॅग पॉइंट बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांच्याकडील मोबाइल डिव्हाइस मशीन त्या टॅग पॉइंटला स्पर्श करावा लागतो. त्याची नोंद थेट पोलीस ठाण्यात होते. टॅग पॉइंट बसवलेल्या ठिकाणी संबंधित पोलिसाने किमान १० मिनिटे थांबून नागरिकांशी संवाद साधणेही आवश्यक आहे. पोलीस ठाण्याच्या संगणकात जमा झालेल्या माहितीचा तपशीलवार अहवाल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कल्याण पोलीस उपायुक्तांकडे सकाळी आणि रात्री पाठवला जातो. त्यामुळे बीटमार्शलने आपल्या कामात कामचुकारपणा केला, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. पूर्वी बीटमार्शल पोलिसांवर नियंत्रण ठेवणे मुश्कील होते. आता त्यांच्यावर सेन्सर टॅग पॉइंट मशीनमुळे नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. गस्त घालणाऱ्यास कोणताही पॉइंट टाळता येत नाही. दिवसभरात दोन ते तीन वेळा हमखास पोलीस संपूर्ण शहरात गस्त घालतात. त्यामुळे चोऱ्या, घरफोड्या, वाहनचोरी, मुलींची छेड, सोनसाखळी, कारटेपचोरी अशा गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय घट झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.