शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

ठाण्यातील २५२ झोपडपट्ट्यांना वालीच नाही!

By admin | Updated: January 9, 2016 02:11 IST

मुंबईत धारावीच्या पुनर्विकासासाठी प्राधिकरणाने जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे

अजित मांडके,  ठाणेमुंबईत धारावीच्या पुनर्विकासासाठी प्राधिकरणाने जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परंतु, ठाणे शहरात असे एकही नियोजन प्राधिकरण नसल्याने ठाणे शहरातील २५२ झोपडपट्ट्यांचा विकास रखडला आहे. त्यासाठी अनेक योजना राबविल्या गेल्या. परंतु, त्या अपुऱ्याच ठरल्या. शहरात एसआरडी, म्हाडा आणि आता एसआरए, एमएमआरडीए अशा विविध प्लॅनिंंग अ‍ॅथॉरिटी असल्याने शहरातील झोपडपट्टीचा विकास नेमका कोणत्या माध्यमातून करायचा, यावर अद्यापही तोडगा निघू न शकल्याने पुनर्विकास रखडला आहे.एका बाजूला डोंगर, वन विभाग, एमआयडीसी, खाडीकिनारा यांची सोबत घेत ठाणे शहर उभे आहे. शहराचा परिसर १२६.२३ चौरस किलोमीटर असून यात ६२ चौरस किमीचा हरित पट्टा आहे. ठाणे पालिकेने झोपडपट्टीमुक्त ठाण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून शहराचा विकास करताना वाल्मीकी विकास एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प योजना (वॅम्बे), शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा पुरविणे (बीएसयूपी), झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरडी), राजीव आवास योजना (आरएवाय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना, सार्वजनिक-खाजगी सहभाग, बांधकाम हक्क हस्तांतरण, संक्रमण निवारे, रात्रनिवारे, परवडणारी घरे आणि एसआरए असे पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नागपूर ही शहरेवगळता अन्यत्र झोपड्यांच्या विकासासाठी झोपु योजनेपलीकडचे नेमके कोणते पर्याय राबविता येऊ शकतात, याचा अभ्यास दोन वर्षे सुरू आहे, पण त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही. आजघडीला ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील ५३ टक्के जनता आजही झोपडपट्टीत राहते. लोकसंख्या वाढीचा दर पाहता २०३१ मध्ये हीच लोकसंख्या ३४ लाखांच्या घरात जाईल. हा विचार करून पालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यात सध्याची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार गृहीत धरण्यात आली असून यातील नऊ लाख ८३ हजार जनता झोपडपट्टीत राहते. त्यात दोन लाख ४५ हजार ७०९ कुटुंबांचे वास्तव्य आहे. शहरातील २५२ झोपडपट्ट्यांचा विकास मधल्या काळात एसआरएच्या माध्यमातून करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार, शहराला दोन लाख ३० हजार घरांची गरज आहे. यासाठी तब्बल २१ हजार ९२० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. परंतु, गेल्या वर्षभरात या योजनेचे एकही पाऊल पुढे पडू शकलेले नाही.विविध योजनेतून दिलेली घरे...आतापर्यंत पालिकेने बॉम्बे या योजनेतून १,२४० पैकी ३२० घरे बांधली आहेत. तसेच एसआरडी योजनेतून १७,४९२ पैकी तीन हजार, पीपीपी माध्यमातून ३३८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून २७४, बांधकाम हस्तांतरण ६१६, संक्रमण निवारे १५,०२० पैकी १,४४८, रात्रनिवारे ७५, परवडणारी ३,४२० घरे बांधली आहेत. बीएसयूपीच्या ६,५४९ घरांपैकी ३,४२३ घरे बाधंण्यात आली असून ३,१२६ घरांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही योजना आता बंद झाली आहे. एकूणच वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून झोपड्यांचा विकास फसल्याने रहिवाशी हताश आहेत.