शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
4
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
5
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
7
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
8
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
9
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
10
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
11
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
12
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
14
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
15
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
16
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
17
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
18
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
19
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
20
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल

ठाण्यातील २५२ झोपडपट्ट्यांना वालीच नाही!

By admin | Updated: January 9, 2016 02:11 IST

मुंबईत धारावीच्या पुनर्विकासासाठी प्राधिकरणाने जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे

अजित मांडके,  ठाणेमुंबईत धारावीच्या पुनर्विकासासाठी प्राधिकरणाने जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परंतु, ठाणे शहरात असे एकही नियोजन प्राधिकरण नसल्याने ठाणे शहरातील २५२ झोपडपट्ट्यांचा विकास रखडला आहे. त्यासाठी अनेक योजना राबविल्या गेल्या. परंतु, त्या अपुऱ्याच ठरल्या. शहरात एसआरडी, म्हाडा आणि आता एसआरए, एमएमआरडीए अशा विविध प्लॅनिंंग अ‍ॅथॉरिटी असल्याने शहरातील झोपडपट्टीचा विकास नेमका कोणत्या माध्यमातून करायचा, यावर अद्यापही तोडगा निघू न शकल्याने पुनर्विकास रखडला आहे.एका बाजूला डोंगर, वन विभाग, एमआयडीसी, खाडीकिनारा यांची सोबत घेत ठाणे शहर उभे आहे. शहराचा परिसर १२६.२३ चौरस किलोमीटर असून यात ६२ चौरस किमीचा हरित पट्टा आहे. ठाणे पालिकेने झोपडपट्टीमुक्त ठाण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून शहराचा विकास करताना वाल्मीकी विकास एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प योजना (वॅम्बे), शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा पुरविणे (बीएसयूपी), झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरडी), राजीव आवास योजना (आरएवाय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना, सार्वजनिक-खाजगी सहभाग, बांधकाम हक्क हस्तांतरण, संक्रमण निवारे, रात्रनिवारे, परवडणारी घरे आणि एसआरए असे पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नागपूर ही शहरेवगळता अन्यत्र झोपड्यांच्या विकासासाठी झोपु योजनेपलीकडचे नेमके कोणते पर्याय राबविता येऊ शकतात, याचा अभ्यास दोन वर्षे सुरू आहे, पण त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही. आजघडीला ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील ५३ टक्के जनता आजही झोपडपट्टीत राहते. लोकसंख्या वाढीचा दर पाहता २०३१ मध्ये हीच लोकसंख्या ३४ लाखांच्या घरात जाईल. हा विचार करून पालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यात सध्याची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार गृहीत धरण्यात आली असून यातील नऊ लाख ८३ हजार जनता झोपडपट्टीत राहते. त्यात दोन लाख ४५ हजार ७०९ कुटुंबांचे वास्तव्य आहे. शहरातील २५२ झोपडपट्ट्यांचा विकास मधल्या काळात एसआरएच्या माध्यमातून करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार, शहराला दोन लाख ३० हजार घरांची गरज आहे. यासाठी तब्बल २१ हजार ९२० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. परंतु, गेल्या वर्षभरात या योजनेचे एकही पाऊल पुढे पडू शकलेले नाही.विविध योजनेतून दिलेली घरे...आतापर्यंत पालिकेने बॉम्बे या योजनेतून १,२४० पैकी ३२० घरे बांधली आहेत. तसेच एसआरडी योजनेतून १७,४९२ पैकी तीन हजार, पीपीपी माध्यमातून ३३८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून २७४, बांधकाम हस्तांतरण ६१६, संक्रमण निवारे १५,०२० पैकी १,४४८, रात्रनिवारे ७५, परवडणारी ३,४२० घरे बांधली आहेत. बीएसयूपीच्या ६,५४९ घरांपैकी ३,४२३ घरे बाधंण्यात आली असून ३,१२६ घरांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही योजना आता बंद झाली आहे. एकूणच वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून झोपड्यांचा विकास फसल्याने रहिवाशी हताश आहेत.